शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Russia Ukraine War: खारकीव्हमध्ये भारतीयांचा जीव धोक्यात, पालकांची भारत सरकारला आर्त हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 18:31 IST

भारत सरकारकडून तातडीचे पाऊल उचलण्याची मागणी

सूर्यकांत वाघमारे 

नवी मुंबई : खारकीव्ह शहरात अडकलेले विद्यार्थी प्राण धोक्यात घालून खारकीव्ह रेल्वेस्थानक पर्यंत पोहोचले आहेत. मात्र, त्याठिकाणी भारतीयांसह इतरांची अडवणूक करून स्थानिकांना शहराबाहेर काढण्यात प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे सात तासाहून अधिक वेळ तिथे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांचा धोका अधिक वाढला असून त्यात नवी मुंबईच्याही विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

युक्रेनमधील युद्धाच्या परिस्थितीमुळे खारकीव्ह शहरात नवी मुंबईचे अनेक विद्यार्थी अडकून पडले आहेत. बुधवारी पहाटे त्यांना राहत्या हॉस्टेल मधून बाहेर निघून सुरक्षित ठिकाणी जाण्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे सुमारे १२०० विद्यार्थ्यांनी गोळीबार व मिसाईल हल्ले यातून स्वतःला वाचवत खारकीव्ह रेल्वेस्थानक गाठले आहे. त्याठिकाणावरून त्यांना हंगेरी बॉर्डरपर्यंत सोडले जाईल अशी अपेक्षा होती. मात्र, खारकीव्ह स्थानकात पोहोचून देखील त्यांना रेल्वेने प्रवासात अडवले जात असल्याचे तिथे अडकलेल्या दक्षा कानडे हिने पालकांना कळवले आहे. अशातच खारकीव स्थानकाच्या आवारात देखील गोळीबार व स्फोटाचे आवाज घुमू लागले आहेत. यामुळे वेळीच त्या विद्यार्थ्यांना त्याठिकाणावरून रेल्वेने हलवले न गेल्यास त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो अशी चिंता तिचे पालक प्रदीप कानडी यांनी व्यक्त केली आहे. 

भारत सरकारने पुढाकार घेऊन खारकीव्ह स्थानकात अडकलेल्या विद्यार्थ्यांना रेल्वेने प्रवासासाठी आवश्यक मदत करून त्यांना सुखरूप शहराबाहेर काढण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. मात्र, सात तासाहून अधिक वेळ सुमारे १२०० विद्यार्थी खारकीव्ह स्थानकात अडकून पडलेले असतानाही त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ठोस पाऊल उचलले जात नसल्याचा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे. परिणामी खारकीव्ह व लगतच्या शहरात अडकून पडलेल्या नवी मुंबईतल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या चिंतेत अधिकच भर पडत चालली आहे.

खारकीव्हमध्ये विद्यार्थ्यांच जीव धोक्यात

खारकीव्ह मध्ये अडकलेल्यांना तात्काळ शहर खाली करण्याचे सूचित करण्यात आले आहे. शहरावर मोठा हल्ला होण्याच्या शक्यतेवरून भारतीय दूतावासांकडून तशी सूचना करण्यात आली आहे. मात्र खारकीव्ह शहर सोडण्यासाठी विद्यार्थ्यांना बस किंवा रेल्वेत घेतले जात नाहीये. यामुळे स्वतःच्या सुरक्षेसाठी भारतीयांनी पायी चालत जाण्याचा अजब सल्ला देण्यात आला आहे. त्यासाठी तीन शहरे सुचवण्यात आली असून ती सर्व शहरे 10 ते 13 किमी लांब अंतरावरील आहेत. आज पहाटेपासून विद्यार्थी चालत खारकीव्ह स्थानक पर्यंत पोचले असताना, पुन्हा त्यांना जीव धोक्यात घालून चालत सुरक्षित ठिकाणी जाण्याचे सुचवले जात आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाAir Indiaएअर इंडियाGovernmentसरकार