शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

Russia Ukraine War: खारकीव्हमध्ये भारतीयांचा जीव धोक्यात, पालकांची भारत सरकारला आर्त हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 18:31 IST

भारत सरकारकडून तातडीचे पाऊल उचलण्याची मागणी

सूर्यकांत वाघमारे 

नवी मुंबई : खारकीव्ह शहरात अडकलेले विद्यार्थी प्राण धोक्यात घालून खारकीव्ह रेल्वेस्थानक पर्यंत पोहोचले आहेत. मात्र, त्याठिकाणी भारतीयांसह इतरांची अडवणूक करून स्थानिकांना शहराबाहेर काढण्यात प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे सात तासाहून अधिक वेळ तिथे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांचा धोका अधिक वाढला असून त्यात नवी मुंबईच्याही विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

युक्रेनमधील युद्धाच्या परिस्थितीमुळे खारकीव्ह शहरात नवी मुंबईचे अनेक विद्यार्थी अडकून पडले आहेत. बुधवारी पहाटे त्यांना राहत्या हॉस्टेल मधून बाहेर निघून सुरक्षित ठिकाणी जाण्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे सुमारे १२०० विद्यार्थ्यांनी गोळीबार व मिसाईल हल्ले यातून स्वतःला वाचवत खारकीव्ह रेल्वेस्थानक गाठले आहे. त्याठिकाणावरून त्यांना हंगेरी बॉर्डरपर्यंत सोडले जाईल अशी अपेक्षा होती. मात्र, खारकीव्ह स्थानकात पोहोचून देखील त्यांना रेल्वेने प्रवासात अडवले जात असल्याचे तिथे अडकलेल्या दक्षा कानडे हिने पालकांना कळवले आहे. अशातच खारकीव स्थानकाच्या आवारात देखील गोळीबार व स्फोटाचे आवाज घुमू लागले आहेत. यामुळे वेळीच त्या विद्यार्थ्यांना त्याठिकाणावरून रेल्वेने हलवले न गेल्यास त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो अशी चिंता तिचे पालक प्रदीप कानडी यांनी व्यक्त केली आहे. 

भारत सरकारने पुढाकार घेऊन खारकीव्ह स्थानकात अडकलेल्या विद्यार्थ्यांना रेल्वेने प्रवासासाठी आवश्यक मदत करून त्यांना सुखरूप शहराबाहेर काढण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. मात्र, सात तासाहून अधिक वेळ सुमारे १२०० विद्यार्थी खारकीव्ह स्थानकात अडकून पडलेले असतानाही त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ठोस पाऊल उचलले जात नसल्याचा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे. परिणामी खारकीव्ह व लगतच्या शहरात अडकून पडलेल्या नवी मुंबईतल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या चिंतेत अधिकच भर पडत चालली आहे.

खारकीव्हमध्ये विद्यार्थ्यांच जीव धोक्यात

खारकीव्ह मध्ये अडकलेल्यांना तात्काळ शहर खाली करण्याचे सूचित करण्यात आले आहे. शहरावर मोठा हल्ला होण्याच्या शक्यतेवरून भारतीय दूतावासांकडून तशी सूचना करण्यात आली आहे. मात्र खारकीव्ह शहर सोडण्यासाठी विद्यार्थ्यांना बस किंवा रेल्वेत घेतले जात नाहीये. यामुळे स्वतःच्या सुरक्षेसाठी भारतीयांनी पायी चालत जाण्याचा अजब सल्ला देण्यात आला आहे. त्यासाठी तीन शहरे सुचवण्यात आली असून ती सर्व शहरे 10 ते 13 किमी लांब अंतरावरील आहेत. आज पहाटेपासून विद्यार्थी चालत खारकीव्ह स्थानक पर्यंत पोचले असताना, पुन्हा त्यांना जीव धोक्यात घालून चालत सुरक्षित ठिकाणी जाण्याचे सुचवले जात आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाAir Indiaएअर इंडियाGovernmentसरकार