शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War: खारकीव्हमध्ये भारतीयांचा जीव धोक्यात, पालकांची भारत सरकारला आर्त हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 18:31 IST

भारत सरकारकडून तातडीचे पाऊल उचलण्याची मागणी

सूर्यकांत वाघमारे 

नवी मुंबई : खारकीव्ह शहरात अडकलेले विद्यार्थी प्राण धोक्यात घालून खारकीव्ह रेल्वेस्थानक पर्यंत पोहोचले आहेत. मात्र, त्याठिकाणी भारतीयांसह इतरांची अडवणूक करून स्थानिकांना शहराबाहेर काढण्यात प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे सात तासाहून अधिक वेळ तिथे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांचा धोका अधिक वाढला असून त्यात नवी मुंबईच्याही विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

युक्रेनमधील युद्धाच्या परिस्थितीमुळे खारकीव्ह शहरात नवी मुंबईचे अनेक विद्यार्थी अडकून पडले आहेत. बुधवारी पहाटे त्यांना राहत्या हॉस्टेल मधून बाहेर निघून सुरक्षित ठिकाणी जाण्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे सुमारे १२०० विद्यार्थ्यांनी गोळीबार व मिसाईल हल्ले यातून स्वतःला वाचवत खारकीव्ह रेल्वेस्थानक गाठले आहे. त्याठिकाणावरून त्यांना हंगेरी बॉर्डरपर्यंत सोडले जाईल अशी अपेक्षा होती. मात्र, खारकीव्ह स्थानकात पोहोचून देखील त्यांना रेल्वेने प्रवासात अडवले जात असल्याचे तिथे अडकलेल्या दक्षा कानडे हिने पालकांना कळवले आहे. अशातच खारकीव स्थानकाच्या आवारात देखील गोळीबार व स्फोटाचे आवाज घुमू लागले आहेत. यामुळे वेळीच त्या विद्यार्थ्यांना त्याठिकाणावरून रेल्वेने हलवले न गेल्यास त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो अशी चिंता तिचे पालक प्रदीप कानडी यांनी व्यक्त केली आहे. 

भारत सरकारने पुढाकार घेऊन खारकीव्ह स्थानकात अडकलेल्या विद्यार्थ्यांना रेल्वेने प्रवासासाठी आवश्यक मदत करून त्यांना सुखरूप शहराबाहेर काढण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. मात्र, सात तासाहून अधिक वेळ सुमारे १२०० विद्यार्थी खारकीव्ह स्थानकात अडकून पडलेले असतानाही त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ठोस पाऊल उचलले जात नसल्याचा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे. परिणामी खारकीव्ह व लगतच्या शहरात अडकून पडलेल्या नवी मुंबईतल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या चिंतेत अधिकच भर पडत चालली आहे.

खारकीव्हमध्ये विद्यार्थ्यांच जीव धोक्यात

खारकीव्ह मध्ये अडकलेल्यांना तात्काळ शहर खाली करण्याचे सूचित करण्यात आले आहे. शहरावर मोठा हल्ला होण्याच्या शक्यतेवरून भारतीय दूतावासांकडून तशी सूचना करण्यात आली आहे. मात्र खारकीव्ह शहर सोडण्यासाठी विद्यार्थ्यांना बस किंवा रेल्वेत घेतले जात नाहीये. यामुळे स्वतःच्या सुरक्षेसाठी भारतीयांनी पायी चालत जाण्याचा अजब सल्ला देण्यात आला आहे. त्यासाठी तीन शहरे सुचवण्यात आली असून ती सर्व शहरे 10 ते 13 किमी लांब अंतरावरील आहेत. आज पहाटेपासून विद्यार्थी चालत खारकीव्ह स्थानक पर्यंत पोचले असताना, पुन्हा त्यांना जीव धोक्यात घालून चालत सुरक्षित ठिकाणी जाण्याचे सुचवले जात आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाAir Indiaएअर इंडियाGovernmentसरकार