शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

Russia Ukraine War: खारकीव्हमध्ये भारतीयांचा जीव धोक्यात, पालकांची भारत सरकारला आर्त हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 18:31 IST

भारत सरकारकडून तातडीचे पाऊल उचलण्याची मागणी

सूर्यकांत वाघमारे 

नवी मुंबई : खारकीव्ह शहरात अडकलेले विद्यार्थी प्राण धोक्यात घालून खारकीव्ह रेल्वेस्थानक पर्यंत पोहोचले आहेत. मात्र, त्याठिकाणी भारतीयांसह इतरांची अडवणूक करून स्थानिकांना शहराबाहेर काढण्यात प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे सात तासाहून अधिक वेळ तिथे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांचा धोका अधिक वाढला असून त्यात नवी मुंबईच्याही विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

युक्रेनमधील युद्धाच्या परिस्थितीमुळे खारकीव्ह शहरात नवी मुंबईचे अनेक विद्यार्थी अडकून पडले आहेत. बुधवारी पहाटे त्यांना राहत्या हॉस्टेल मधून बाहेर निघून सुरक्षित ठिकाणी जाण्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे सुमारे १२०० विद्यार्थ्यांनी गोळीबार व मिसाईल हल्ले यातून स्वतःला वाचवत खारकीव्ह रेल्वेस्थानक गाठले आहे. त्याठिकाणावरून त्यांना हंगेरी बॉर्डरपर्यंत सोडले जाईल अशी अपेक्षा होती. मात्र, खारकीव्ह स्थानकात पोहोचून देखील त्यांना रेल्वेने प्रवासात अडवले जात असल्याचे तिथे अडकलेल्या दक्षा कानडे हिने पालकांना कळवले आहे. अशातच खारकीव स्थानकाच्या आवारात देखील गोळीबार व स्फोटाचे आवाज घुमू लागले आहेत. यामुळे वेळीच त्या विद्यार्थ्यांना त्याठिकाणावरून रेल्वेने हलवले न गेल्यास त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो अशी चिंता तिचे पालक प्रदीप कानडी यांनी व्यक्त केली आहे. 

भारत सरकारने पुढाकार घेऊन खारकीव्ह स्थानकात अडकलेल्या विद्यार्थ्यांना रेल्वेने प्रवासासाठी आवश्यक मदत करून त्यांना सुखरूप शहराबाहेर काढण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. मात्र, सात तासाहून अधिक वेळ सुमारे १२०० विद्यार्थी खारकीव्ह स्थानकात अडकून पडलेले असतानाही त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ठोस पाऊल उचलले जात नसल्याचा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे. परिणामी खारकीव्ह व लगतच्या शहरात अडकून पडलेल्या नवी मुंबईतल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या चिंतेत अधिकच भर पडत चालली आहे.

खारकीव्हमध्ये विद्यार्थ्यांच जीव धोक्यात

खारकीव्ह मध्ये अडकलेल्यांना तात्काळ शहर खाली करण्याचे सूचित करण्यात आले आहे. शहरावर मोठा हल्ला होण्याच्या शक्यतेवरून भारतीय दूतावासांकडून तशी सूचना करण्यात आली आहे. मात्र खारकीव्ह शहर सोडण्यासाठी विद्यार्थ्यांना बस किंवा रेल्वेत घेतले जात नाहीये. यामुळे स्वतःच्या सुरक्षेसाठी भारतीयांनी पायी चालत जाण्याचा अजब सल्ला देण्यात आला आहे. त्यासाठी तीन शहरे सुचवण्यात आली असून ती सर्व शहरे 10 ते 13 किमी लांब अंतरावरील आहेत. आज पहाटेपासून विद्यार्थी चालत खारकीव्ह स्थानक पर्यंत पोचले असताना, पुन्हा त्यांना जीव धोक्यात घालून चालत सुरक्षित ठिकाणी जाण्याचे सुचवले जात आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाAir Indiaएअर इंडियाGovernmentसरकार