शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
5
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
6
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
7
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
8
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
9
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
10
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
11
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
12
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
13
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
14
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
15
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
16
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
17
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
18
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
20
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

बीएसएनएलच्या इंटरनेट सेवेला रस्त्याच्या कामांचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 12:37 AM

बँका, खाजगी सेवांसह सरकारी कामकाजावर परिणाम

सिकंदर अनवारेदासगाव : भारत संचार निगम लिमिटेडची दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा गेल्या पाच वर्षांपासून कोलमडलेलीच आहे. सर्वांत गतीने मिळणारे बीएसएनएलचे इंटरनेट विविध रस्त्यांच्या कामात सातत्याने तोडल्या जाणाऱ्या केबलमुळे बंद पडत आहे. यामुळे बँका, खाजगी सेवा पुरवणाऱ्या संस्था, सरकारी कार्यालयांतील व्यवहार वारंवार ठप्प होत आहेत. याबाबत कोणताही राजकीय लोकप्रतिनिधी आजतागायत बीएसएनएल किंवा महामार्ग विभागाला जाब विचारण्यास पुढे आलेला नाही.

महाडसह संपूर्ण देशभरात भारत संचार निगम लिमिटेडकडून दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा पुरवली जाते. भारत संचार निगमची इंटरनेट सेवा अत्यंत गतीने चालणारी सेवा आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून या सेवेचा चांगलाच बोजवारा उडाला आहे. मोबाइलला नेटवर्क मिळत नसल्याने बीएसएनएल मोबाइलधारक कमालीचे संतापले आहेत. बहुतांश ग्रामीण भागात भारत संचार निगमचे मोबाइल ग्राहक आहेत. पूर्वी असलेले घरगुती दूरध्वनी जवळपास ९० टक्के बंद पडले आहेत. त्याऐवजी बीएसएनएलचा मोबाइल वापर सुरू झाला. मात्र, भारत संचार निगमच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामीण भागात या सेवेवरदेखील नाराजी व्यक्त झाली. गेल्या अनेक वर्षांपासून बीएसएनएलची सेवा सातत्याने खंडित होत असल्याने महाड शहरातील खाजगी आणि सरकारी बँकांतून सर्व कारभार ठप्प होत आहे. शिवाय सरकारी कार्यालयातील कारभारदेखील मंदावला आहे. याचा फटका व्यापारी, उद्योजक, कारखाने, खाजगी बँका आदींना बसला आहे. महामार्ग चौपदरीकरण आणि महाबळेश्वर घाटात रस्त्याचे सुरू असलेले काम यामुळे लाइन तोडली जात आहे. मात्र यावर अद्याप ठोस उपाय किंवा कार्यवाही झालेली नाही. यामुळे सातत्याने बी.एस.एन.एल.ची लाइन तुटत आहे. सदर लाइन कोणीतरी तोडत असल्याचा संशयदेखील व्यक्त केला जात आहे.

शासकीय कार्यालयातील इंटरनेट सेवा ठप्प असल्याने विविध कामांचा खोळंबा झाला आहे. गेले काही दिवस नोंदणी कार्यालयातदेखील खरेदी-विक्री व्यवहाराच्या नोंदी होत नसल्याने नागरिकांना फेऱ्या माराव्या लागत आहेत. हीच अवस्था भारतीय विमा निगम कार्यालयातदेखील कायम आहे. एल.आय.सी.ची कोणतीच कामे होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. खाजगी सेवा पुरविणाऱ्या संस्थांमध्येदेखील हीच अवस्था आहे. यामुळे बीएसएनएलच्या सेवेवर नाराजी व्यक्त होत आहे.

महाड मंडळ कार्यालयात केवळ ११ कर्मचारीमहाड शहरात छोट्यामोठ्या अशा जवळपास ३५ ते ४० बँका, पतसंस्था आहेत. या बँकांमधून बीएसएनएलची इंटरनेट सेवा कार्यरत आहे. शिवाय सर्व सरकारी कार्यालये, दुकाने, खाजगी कार्यालये यातूनदेखील बीएसएनएलचेच इंटरनेट वापरले जाते. मात्र सातत्याने खंडित होत असलेल्या या सेवेमुळे ग्राहक वर्गात प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. महाडमधील २१ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. यामध्ये महाड मंडळ कार्यालयातील ११ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर संपूर्ण रायगडमध्ये जवळपास २०० च्या वर कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. याचा फटकादेखील बसला असून महाड शहरातील एका कार्यालयाला वर्षापूर्वी टाळे लागले आहे. यामुळे बिल भरणा, मोबाइल रिचार्ज आदी सुविधादेखील पुरविल्या जात नाहीत.

खाजगी कंपन्यांचीदेखील हीच स्थितीबीएसएनएल वगळता अन्य खाजगी कंपन्यांचीदेखील हीच बोंब आहे. गेले काही दिवस या खाजगी कंपन्यांचेदेखील नेट मिळत नसल्याची तक्रार ग्राहक करीत आहेत. मुंबई, पुणेसारख्या मोठ्या शहरी भागात इंटरनेट आणि इतर सुविधा सुरळीत आहेत, मात्र ग्रामीण भागातील ग्राहक तितकेच पैसे मोजूनदेखील वारंवार खंडित सेवेला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईBSNLबीएसएनएल