शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

रेल्वेफाटकावरचा ‘तो’ रस्ता बेकायदेशीरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 11:07 PM

रेल्वेला उशिरा आली जाग : मार्ग बंद करण्याच्या प्रयत्नामुळे परिसरात तणाव

नवी मुंबई : रेल्वेने बसला धडक दिल्याच्या घटनेनंतर तिथला वाहनांचा मार्ग बेकायदेशीर असल्याचा दावा रेल्वेने केला आहे, यामुळे रेल्वेकडून सदर रस्ता बंद करण्याचा प्रयत्न झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जुईनगरमधील रहिवाशांना जुईनगर स्थानकाकडे येण्याचा हा सोयीस्कर ऐकमेव मार्ग असल्याने तो बंद झाल्यास नागरिकांची गैरसोय होणार आहे.

कारशेडच्या रेल्वेमार्गावरील जुईनगर येथील रस्ता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्या ठिकाणी रेल्वेची ये-जा सुरू असतानाही रेल्वेसमोरून वाहने पळवण्याचे प्रकार घडत असल्याने अपघात होत आहेत. अशाच प्रकारातून शनिवारी दुपारी त्या ठिकाणी रेल्वेची एनएमएमटी बसला धडक बसली. यामुळे त्या ठिकाणी फाटक बसवण्याची नागरिकांची मागणी असतानाच तो रस्ताच बेकायदेशीर असल्याचा दावा रेल्वेने केला आहे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने शनिवारी रात्रीच त्या ठिकाणचा मार्ग बंद करण्याचा प्रयत्न केला, याकरिता जेसीबीने रस्ता खोदण्याचा प्रयत्न सुरू असतानाच त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हे काम थांबवून रविवारी त्या ठिकाणी दोन्ही बाजूला रंबलर बसवण्यात आले.

जुईनगरच्या रहिवाशांना सानपाडा अथवा जुईनगर स्थानकाकडे येण्याचा तो एकमेव सोयीस्कर मार्ग आहे. १९८० च्या दरम्यान त्या ठिकाणी स्थानिकांच्या सोयीसाठी छोटासा पूल उभारण्यात आला होता. कालांतराने परिसराचा विकास होत असताना मात्र तिथला रस्ता आराखड्यावर घेण्याचा प्रशासनाला विसर पडला असावा. त्यानंतर सुमारे १५ वर्षांपूर्वी त्या ठिकाणी कारशेडचा रेल्वेमार्ग आल्यानंतरही हा मार्ग वापरात होता. त्याच वेळी रेल्वेने अथवा सिडको किंवा पालिकेने त्या ठिकाणी पुलाची उभारणी करणे आवश्यक होते.काही वर्षांपूर्वी लोकप्रतिनिधींनी महासभेकडे मांडलेला प्रस्ताव मंजूर होऊनही पूल अद्याप कागदावरच असल्याची खंत व्यक्त होत आहे.

 

कारशेडमध्ये ये-जा करणाºया रेल्वेच्या धडकेने होणारे अपघात टाळण्यासाठी क्रॉसिंगच्या ठिकाणी उड्डाणपूल उभारणीची मागणी महापालिकेकडे केली आहे. त्यानुसार मांडलेल्या ठरावाला सभागृहाने सप्टेंबर २०१५ मध्ये मंजुरी देखील दिलेली आहे. परंतु परवानगीच्या लालफितीत अडकल्याने पूल उभारणीचा लांबत चाललेला निर्णय जीवघेणा ठरत आहे.-तनुजा मढवी, स्थानिक नगरसेविका (प्रभाग-८३)जुईनगरच्या फाटकाच्या ठिकाणी ग्रामपंचायतकालीन पूल होता. कारशेडचा रेल्वेरुळ आल्यानंतर त्या ठिकाणी पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यात आला नाही. यामुळे नागरिकांना रहदारीसाठी एकमेव सोयीस्कर असलेला रुळावरील मार्ग वापरावा लागत आहे. तो बंद झाल्यास गैरसोय होणार आहे.- जयेश मढवी, स्थानिक ज्येष्ठ रहिवासी

टॅग्स :Harbour Railwayहार्बर रेल्वे