शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

रेल्वेफाटकावरचा ‘तो’ रस्ता बेकायदेशीरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 23:07 IST

रेल्वेला उशिरा आली जाग : मार्ग बंद करण्याच्या प्रयत्नामुळे परिसरात तणाव

नवी मुंबई : रेल्वेने बसला धडक दिल्याच्या घटनेनंतर तिथला वाहनांचा मार्ग बेकायदेशीर असल्याचा दावा रेल्वेने केला आहे, यामुळे रेल्वेकडून सदर रस्ता बंद करण्याचा प्रयत्न झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जुईनगरमधील रहिवाशांना जुईनगर स्थानकाकडे येण्याचा हा सोयीस्कर ऐकमेव मार्ग असल्याने तो बंद झाल्यास नागरिकांची गैरसोय होणार आहे.

कारशेडच्या रेल्वेमार्गावरील जुईनगर येथील रस्ता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्या ठिकाणी रेल्वेची ये-जा सुरू असतानाही रेल्वेसमोरून वाहने पळवण्याचे प्रकार घडत असल्याने अपघात होत आहेत. अशाच प्रकारातून शनिवारी दुपारी त्या ठिकाणी रेल्वेची एनएमएमटी बसला धडक बसली. यामुळे त्या ठिकाणी फाटक बसवण्याची नागरिकांची मागणी असतानाच तो रस्ताच बेकायदेशीर असल्याचा दावा रेल्वेने केला आहे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने शनिवारी रात्रीच त्या ठिकाणचा मार्ग बंद करण्याचा प्रयत्न केला, याकरिता जेसीबीने रस्ता खोदण्याचा प्रयत्न सुरू असतानाच त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हे काम थांबवून रविवारी त्या ठिकाणी दोन्ही बाजूला रंबलर बसवण्यात आले.

जुईनगरच्या रहिवाशांना सानपाडा अथवा जुईनगर स्थानकाकडे येण्याचा तो एकमेव सोयीस्कर मार्ग आहे. १९८० च्या दरम्यान त्या ठिकाणी स्थानिकांच्या सोयीसाठी छोटासा पूल उभारण्यात आला होता. कालांतराने परिसराचा विकास होत असताना मात्र तिथला रस्ता आराखड्यावर घेण्याचा प्रशासनाला विसर पडला असावा. त्यानंतर सुमारे १५ वर्षांपूर्वी त्या ठिकाणी कारशेडचा रेल्वेमार्ग आल्यानंतरही हा मार्ग वापरात होता. त्याच वेळी रेल्वेने अथवा सिडको किंवा पालिकेने त्या ठिकाणी पुलाची उभारणी करणे आवश्यक होते.काही वर्षांपूर्वी लोकप्रतिनिधींनी महासभेकडे मांडलेला प्रस्ताव मंजूर होऊनही पूल अद्याप कागदावरच असल्याची खंत व्यक्त होत आहे.

 

कारशेडमध्ये ये-जा करणाºया रेल्वेच्या धडकेने होणारे अपघात टाळण्यासाठी क्रॉसिंगच्या ठिकाणी उड्डाणपूल उभारणीची मागणी महापालिकेकडे केली आहे. त्यानुसार मांडलेल्या ठरावाला सभागृहाने सप्टेंबर २०१५ मध्ये मंजुरी देखील दिलेली आहे. परंतु परवानगीच्या लालफितीत अडकल्याने पूल उभारणीचा लांबत चाललेला निर्णय जीवघेणा ठरत आहे.-तनुजा मढवी, स्थानिक नगरसेविका (प्रभाग-८३)जुईनगरच्या फाटकाच्या ठिकाणी ग्रामपंचायतकालीन पूल होता. कारशेडचा रेल्वेरुळ आल्यानंतर त्या ठिकाणी पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यात आला नाही. यामुळे नागरिकांना रहदारीसाठी एकमेव सोयीस्कर असलेला रुळावरील मार्ग वापरावा लागत आहे. तो बंद झाल्यास गैरसोय होणार आहे.- जयेश मढवी, स्थानिक ज्येष्ठ रहिवासी

टॅग्स :Harbour Railwayहार्बर रेल्वे