रिक्षा-टॅक्सी प्रवास 2 रुपयांनी महागणार
By Admin | Updated: June 21, 2014 01:43 IST2014-06-21T01:43:26+5:302014-06-21T01:43:26+5:30
मे महिन्यात भाडेवाढीची शिफारस असूनही रिक्षा-टॅक्सीचालकांना भाडेवाढ मिळत नाही. पण यंदा रिक्षा-टॅक्सीचालकांना सरसकट 2 रुपयांची भाडेवाढ देण्यात आली आहे.

रिक्षा-टॅक्सी प्रवास 2 रुपयांनी महागणार
पेडणे : पेडणे तालुका हा भुईमूग लागवड व उत्पादनात सातत्याने अग्रेसर आहे. या पिकासाठी शेतकऱ्यांना सरकारच्या आधाराची मात्र गरज आहे. भुईमूग लागवडीत तालुक्यातील महिला शेतकऱ्यांचा सहभाग अधिक आहे. तालुका कृषी अधिकारी प्रसाद परब यांचे भरीव सहकार्य शेतकरी वर्गास मिळते. तालुक्यात पावसाळी भुईमूग लागवडीत या महिला शेतकरी मुळा, लालभाजी, तीळ, मोहरी आदींचे यशस्वी आंतरपिक घेतात. त्यामुळे महिन्यास एकंदरीत लाखो रुपयांची उलाढाल होते.
कृषी खात्यानेही सुरुवातीस मोफत आणि नंतर पाच रुपये किलो दराने (जून २०१३) भुईमूग बियाणे उपलब्ध करून दिले होते. त्यामुळे वाढत्या महागाईत महिला शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला होता. त्यानंतरच्या उन्हाळी भूईमुग लागवडीसाठी हेच दर कृषी खात्याने सुरुवातीस ३५ रुपये किलोप्रमाणे वाढवले. परिणामी शेतक री खूप नाराज झाले होते. सध्या चालू हंगामासाठी हाच दर कृषी खात्याने १७ रुपये केला आहे. दिवसेंदिवस वाढणारी मजुरी, मशागतीचा खर्च, खतांची कमतरता आणि वाढणाऱ्या किमती आदींमुळे शेतकरी मेटाकुटीस येत आहे. उत्पादित भुईमुगास योग्य बाजारभावाची हमी मिळत नाही. तसेच मालाची उचल वेळेवर होणे हा शेतकऱ्यांचा हक्क आहे, याकडे कृषी खात्याने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
गेल्या हंगामात विर्नोडा येथील शेतकऱ्यांच्या भुईमूग पिकाची पाहणी करण्यासाठी कृषी संचालक पी. तुफानी आले होते. त्या वेळी शेतकऱ्यांनी भूईमुगासाठी योग्य खरेदी दर देण्याची मागणी केली होती. तालुक्यात भूईमूग प्रक्रिया उद्योग स्थापन करण्यासाठी महिलांना प्रशिक्षण द्यावे, अशीही मागणी त्यांच्याकडे केली होती. अन्य सुविधांबाबतही चर्चा झाली होती. त्यावर अजूनही काहीही कार्यवाही झालेली नाही. ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ असाच अनुभव आला. शेतकऱ्यांनी वाट तरी किती वर्षे पाहायची, असा प्रश्न आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी भुईमूग लागवडीचा निर्णय घेतलेला नाही.