शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

महसूलच्या कारभाराचा प्रकल्पग्रस्तांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 03:39 IST

घर सोडण्याची वेळ : प्रत्यक्ष जागेवर पंचनामे करण्याची मागणी

अलिबाग : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाबतीत महसूल विभागाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनामे न केल्याचा फटका विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांना बसला आहे. कोणताही मोबदला न घेताच आपली घरे सोडून जाण्याची वेळ महसूल विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे पनवेल तालुक्यातील कोंबडभुजे येथील राहणारे अनंता नागा कोळी यांच्यावर आल्याने त्यांनी जिल्हा प्रशासनाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यांनी पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांना निवेदन दिले आहे. कोळी यांच्यासारखे अनेक प्रकल्पग्रस्त आजही न्यायाचा प्रतीक्षेत आहेत.

कोंबडभुजे गावातील घरे क्र .३०५-अ व ३०५-ब या दोन्ही घरांवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी बुलडोझर फिरवला जाणार असल्याने कोळी बेघर होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या राहत्या घरांचे तत्काळ पंचनामे करून भूसंपादन कायदा २०१३ नुसार प्रत्यक्ष जागेवर येऊन पंचनामा करून चारपट मोबदल्यासह पुनर्वसन करण्याचे आदेश सिडको, मेट्रो सेंटर १, तसेच पनवेल तहसीलदार यांना करण्याची मागणी अनंता कोळी यांनी केली आहे.आंतरराष्ट्रीय दर्जाचा नवी मुंबई विमानतळ प्रकल्प रखडण्यामध्ये प्रशासकीय धोरणच जबाबदार असल्याचे कोळी यांनी स्पष्ट केले. सिडकोच्या माध्यमातून केवळ गुगलमार्फत केलेल्या सर्व्हेचा आधार घेऊन सर्वेक्षण करणे हे नुसतेच बेकायदेशीर नाही, तर प्रकल्पग्रस्तांच्या संविधानिक अधिकारावर घातलेला घाला असल्याचा आरोपही त्यांनी निवेदनात केला आहे.प्रकल्पात बाधित होणाऱ्या आगरी, कोळी, कराडी, दलित, शेतकºयांचे पंचनामे न करताच पुनर्वसन नाकारल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष खदखदत आहे. पुनर्वसन कायदा २०१३ नुसार आमच्या घरांचे तत्काळ पंचनामे करून चारपट मोबदल्यासह कुटुंबाचे पुनर्वसन करावे, अशी मागणी कोळी यांनी केली आहे.दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात बाधित कोळी समाजाबरोबरच इतरही प्रकल्पग्रस्तांचे प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनामे करून भूसंपादन तसेच पुनर्वसन कायदा २०१३ नुसार पुनर्वसन करावे, असे पत्र विधान परिषदेचे आमदार रमेश पाटील यांनी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना दिले आहे.पुनर्वसन रखडलेच्कोंबडभुजे गावातील घरे क्र. ३०५-अ व ३०५-ब या दोन्ही घरांवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी बुलडोझर फिरवला जाणार असल्याने कोळी बेघर होणार आहेत. तसेच प्रकल्पात बाधित होणाºया शेतकºयांचे पंचनामे न करताच पुनर्वसन रखडले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMumbaiमुंबई