शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

महसूलच्या कारभाराचा प्रकल्पग्रस्तांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 03:39 IST

घर सोडण्याची वेळ : प्रत्यक्ष जागेवर पंचनामे करण्याची मागणी

अलिबाग : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाबतीत महसूल विभागाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनामे न केल्याचा फटका विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांना बसला आहे. कोणताही मोबदला न घेताच आपली घरे सोडून जाण्याची वेळ महसूल विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे पनवेल तालुक्यातील कोंबडभुजे येथील राहणारे अनंता नागा कोळी यांच्यावर आल्याने त्यांनी जिल्हा प्रशासनाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यांनी पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांना निवेदन दिले आहे. कोळी यांच्यासारखे अनेक प्रकल्पग्रस्त आजही न्यायाचा प्रतीक्षेत आहेत.

कोंबडभुजे गावातील घरे क्र .३०५-अ व ३०५-ब या दोन्ही घरांवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी बुलडोझर फिरवला जाणार असल्याने कोळी बेघर होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या राहत्या घरांचे तत्काळ पंचनामे करून भूसंपादन कायदा २०१३ नुसार प्रत्यक्ष जागेवर येऊन पंचनामा करून चारपट मोबदल्यासह पुनर्वसन करण्याचे आदेश सिडको, मेट्रो सेंटर १, तसेच पनवेल तहसीलदार यांना करण्याची मागणी अनंता कोळी यांनी केली आहे.आंतरराष्ट्रीय दर्जाचा नवी मुंबई विमानतळ प्रकल्प रखडण्यामध्ये प्रशासकीय धोरणच जबाबदार असल्याचे कोळी यांनी स्पष्ट केले. सिडकोच्या माध्यमातून केवळ गुगलमार्फत केलेल्या सर्व्हेचा आधार घेऊन सर्वेक्षण करणे हे नुसतेच बेकायदेशीर नाही, तर प्रकल्पग्रस्तांच्या संविधानिक अधिकारावर घातलेला घाला असल्याचा आरोपही त्यांनी निवेदनात केला आहे.प्रकल्पात बाधित होणाऱ्या आगरी, कोळी, कराडी, दलित, शेतकºयांचे पंचनामे न करताच पुनर्वसन नाकारल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष खदखदत आहे. पुनर्वसन कायदा २०१३ नुसार आमच्या घरांचे तत्काळ पंचनामे करून चारपट मोबदल्यासह कुटुंबाचे पुनर्वसन करावे, अशी मागणी कोळी यांनी केली आहे.दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात बाधित कोळी समाजाबरोबरच इतरही प्रकल्पग्रस्तांचे प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनामे करून भूसंपादन तसेच पुनर्वसन कायदा २०१३ नुसार पुनर्वसन करावे, असे पत्र विधान परिषदेचे आमदार रमेश पाटील यांनी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना दिले आहे.पुनर्वसन रखडलेच्कोंबडभुजे गावातील घरे क्र. ३०५-अ व ३०५-ब या दोन्ही घरांवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी बुलडोझर फिरवला जाणार असल्याने कोळी बेघर होणार आहेत. तसेच प्रकल्पात बाधित होणाºया शेतकºयांचे पंचनामे न करताच पुनर्वसन रखडले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMumbaiमुंबई