शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महसूलच्या कारभाराचा प्रकल्पग्रस्तांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 03:39 IST

घर सोडण्याची वेळ : प्रत्यक्ष जागेवर पंचनामे करण्याची मागणी

अलिबाग : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाबतीत महसूल विभागाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनामे न केल्याचा फटका विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांना बसला आहे. कोणताही मोबदला न घेताच आपली घरे सोडून जाण्याची वेळ महसूल विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे पनवेल तालुक्यातील कोंबडभुजे येथील राहणारे अनंता नागा कोळी यांच्यावर आल्याने त्यांनी जिल्हा प्रशासनाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यांनी पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांना निवेदन दिले आहे. कोळी यांच्यासारखे अनेक प्रकल्पग्रस्त आजही न्यायाचा प्रतीक्षेत आहेत.

कोंबडभुजे गावातील घरे क्र .३०५-अ व ३०५-ब या दोन्ही घरांवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी बुलडोझर फिरवला जाणार असल्याने कोळी बेघर होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या राहत्या घरांचे तत्काळ पंचनामे करून भूसंपादन कायदा २०१३ नुसार प्रत्यक्ष जागेवर येऊन पंचनामा करून चारपट मोबदल्यासह पुनर्वसन करण्याचे आदेश सिडको, मेट्रो सेंटर १, तसेच पनवेल तहसीलदार यांना करण्याची मागणी अनंता कोळी यांनी केली आहे.आंतरराष्ट्रीय दर्जाचा नवी मुंबई विमानतळ प्रकल्प रखडण्यामध्ये प्रशासकीय धोरणच जबाबदार असल्याचे कोळी यांनी स्पष्ट केले. सिडकोच्या माध्यमातून केवळ गुगलमार्फत केलेल्या सर्व्हेचा आधार घेऊन सर्वेक्षण करणे हे नुसतेच बेकायदेशीर नाही, तर प्रकल्पग्रस्तांच्या संविधानिक अधिकारावर घातलेला घाला असल्याचा आरोपही त्यांनी निवेदनात केला आहे.प्रकल्पात बाधित होणाऱ्या आगरी, कोळी, कराडी, दलित, शेतकºयांचे पंचनामे न करताच पुनर्वसन नाकारल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष खदखदत आहे. पुनर्वसन कायदा २०१३ नुसार आमच्या घरांचे तत्काळ पंचनामे करून चारपट मोबदल्यासह कुटुंबाचे पुनर्वसन करावे, अशी मागणी कोळी यांनी केली आहे.दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात बाधित कोळी समाजाबरोबरच इतरही प्रकल्पग्रस्तांचे प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनामे करून भूसंपादन तसेच पुनर्वसन कायदा २०१३ नुसार पुनर्वसन करावे, असे पत्र विधान परिषदेचे आमदार रमेश पाटील यांनी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना दिले आहे.पुनर्वसन रखडलेच्कोंबडभुजे गावातील घरे क्र. ३०५-अ व ३०५-ब या दोन्ही घरांवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी बुलडोझर फिरवला जाणार असल्याने कोळी बेघर होणार आहेत. तसेच प्रकल्पात बाधित होणाºया शेतकºयांचे पंचनामे न करताच पुनर्वसन रखडले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMumbaiमुंबई