शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

नवी मुंबईचा निकाल ९३.७४ टक्के, मुलींनी मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 02:35 IST

दहावीच्या परीक्षेमध्ये नवी मुंबईमधील ९३.७४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तब्बल ३,९२८ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले असून ३६ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे.

नवी मुंबई : दहावीच्या परीक्षेमध्ये नवी मुंबईमधील ९३.७४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तब्बल ३,९२८ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले असून ३६ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये ९२.४८ टक्के निकालासह पनवेल अव्वल स्थानी आहे. दोन्ही ठिकाणी मुलींनीच बाजी मारली आहे.नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील १४० शाळांमधून १४,४०३ विद्यार्थी दहावी परीक्षेला बसले होते. यामधील १३,५०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्यांमध्ये ९५.१४ टक्के मुली व ९२.५० टक्के मुलांचा समावेश आहे. मनपा क्षेत्रामधून तब्बल ३,०२८ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले आहे. ४५९५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ३६ शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. याशिवाय तब्बल ६४ शाळांचा ९० ते ९९ टक्के निकाल लागला आहे. पनवेल तालुक्यातील विद्यार्थ्यांनीही लक्षणीय यश मिळविले आहे. ११४ शाळांमधून १०,४१९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामधील ९,६३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. रायगड जिल्ह्याचा निकाल ८९.३७ टक्के लागला असून सर्वाधिक ९२.४८ टक्के निकाल पनवेलचा लागला आहे. यामध्येही ९४.४८ टक्के निकाल मुलींचा आहे. पनवेल व नवी मुंबईमध्ये बारावीनंतर दहावीमध्येही मुलींनी चांगले गुण मिळविले आहेत.दहावीच्या निकालाकडे विद्यार्थी, पालक, शिक्षक व शाळा व्यवस्थापनाचेही लक्ष लागले होते. दुपारी १ वाजता संकेतस्थळावर निकाल जाहीर होताच सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. शाळा, गृहनिर्माण सोसायटींमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी पेढे वाटून आनंद साजरा केल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. अनेक विशेष मुलांनीही चांगले यश मिळविले.ईटीसी केंद्राचे यशमहापालिकेच्या ईटीसी अपंग शिक्षण व प्रशिक्षण केंद्राचा १०० टक्के निकाल लागला आहे. सलाह मुकादम या कर्णबधिर विद्यार्थ्याने ८० टक्के गुण मिळविले आहेत. प्रदीप चौधरी याने ७४ टक्के, सूर्या पणीकर याने ७९ टक्के गुण मिळविले आहेत. अध्ययन अक्षम दिव्यांग प्रवर्गातील केतन शर्मा या विद्यार्थ्याने ८५ टक्के गुण मिळविले आहेत. जिशान जेसानी याने ७४ टक्के गुण मिळविले असून विद्यार्थ्यांचे यश प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रिया केंद्र संचालिका वर्षा भगत यांनी दिली आहे.४४ विद्यार्थ्यांनीपरीक्षा दिली नाहीनवी मुंबईमधून १४,४२२ विद्यार्थ्यांनी व पनवेलमधून १०,४४४ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. नवी मुंबईमधून १९ व पनवेलमधील २५ विद्यार्थ्यांनी परीक्षाच दिलेली नव्हती. नवी मुंबईमधील ९०१ व पनवेलमधील ७४८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी खचून जावू नये, असे आवाहन शिक्षकांसह तज्ज्ञांनी केले आहे.सायबर कॅफेमध्ये गर्दीपनवेलमध्ये निकाल पाहण्यासाठी १२ वाजल्यापासून अनेकांनी सायबर कॅफेमध्ये गर्दी केली होती. मोबाइलवर निकाल पाहताना वारंवार मोबाइल हॅक होत असल्यामुळे व नेटवर्कची समस्या असल्याने सायबर कॅफेमध्ये निकाल पाहण्यासाठी गर्दी केली होती. अनेकांनी निकालासाठी जादा मनुष्यबळ उपलब्ध केले होते.महापालिका शाळांचा ८९ टक्के निकालनवी मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांनीही दहावीच्या निकालामध्ये लक्षणीय यश मिळविले आहे. नेरूळ शाळेतील वैष्णव कोंडाळकर याने ९४.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे.करावेमधील रिश्वकुमार रवींद्र झा याने ९२.६०, कोपरखैरणे सेक्टर ७ मधील पूनम पांडुरंग शिंदे हिने ९०.८० टक्के गुण मिळविले आहेत.महापालिकेने मनपा शाळांमधील गुणवत्ता वाढीसाठी सुट्यांच्या कालावधीमध्ये जादा तासिका घेण्यात आल्या होत्या.याशिवाय महापालिकेने नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजनाही सुरू केली असल्यामुळे त्याचा लाभ झाला आहे.या सर्वांमुळे निकाल चांगला लागण्यास मदत झाली आहे. महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.पालिका शाळांचा निकाल पुढीलप्रमाणेशाळा निकाल %दिघा १००दिवाळे १००सानपाडा ९५.४५वाशी ९५.३१शिरवणे ९४.२४घणसोली ९४.४नेरूळ ९३.२२कोपरखैरणे ९२.९८करावे ९२.८५ऐरोली ९०.१७तुर्भे गाव ८९.३९को.खै. सेक्टर ५ ८३.७७राबाडा ८३.३३खैरणे ८२.८९महापे ८१.१३तुर्भे स्टोअर्स ७५.९२श्रमिक नगर ७२

टॅग्स :Studentविद्यार्थी