शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईचा निकाल ९३.७४ टक्के, मुलींनी मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 02:35 IST

दहावीच्या परीक्षेमध्ये नवी मुंबईमधील ९३.७४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तब्बल ३,९२८ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले असून ३६ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे.

नवी मुंबई : दहावीच्या परीक्षेमध्ये नवी मुंबईमधील ९३.७४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तब्बल ३,९२८ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले असून ३६ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये ९२.४८ टक्के निकालासह पनवेल अव्वल स्थानी आहे. दोन्ही ठिकाणी मुलींनीच बाजी मारली आहे.नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील १४० शाळांमधून १४,४०३ विद्यार्थी दहावी परीक्षेला बसले होते. यामधील १३,५०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्यांमध्ये ९५.१४ टक्के मुली व ९२.५० टक्के मुलांचा समावेश आहे. मनपा क्षेत्रामधून तब्बल ३,०२८ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले आहे. ४५९५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ३६ शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. याशिवाय तब्बल ६४ शाळांचा ९० ते ९९ टक्के निकाल लागला आहे. पनवेल तालुक्यातील विद्यार्थ्यांनीही लक्षणीय यश मिळविले आहे. ११४ शाळांमधून १०,४१९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामधील ९,६३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. रायगड जिल्ह्याचा निकाल ८९.३७ टक्के लागला असून सर्वाधिक ९२.४८ टक्के निकाल पनवेलचा लागला आहे. यामध्येही ९४.४८ टक्के निकाल मुलींचा आहे. पनवेल व नवी मुंबईमध्ये बारावीनंतर दहावीमध्येही मुलींनी चांगले गुण मिळविले आहेत.दहावीच्या निकालाकडे विद्यार्थी, पालक, शिक्षक व शाळा व्यवस्थापनाचेही लक्ष लागले होते. दुपारी १ वाजता संकेतस्थळावर निकाल जाहीर होताच सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. शाळा, गृहनिर्माण सोसायटींमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी पेढे वाटून आनंद साजरा केल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. अनेक विशेष मुलांनीही चांगले यश मिळविले.ईटीसी केंद्राचे यशमहापालिकेच्या ईटीसी अपंग शिक्षण व प्रशिक्षण केंद्राचा १०० टक्के निकाल लागला आहे. सलाह मुकादम या कर्णबधिर विद्यार्थ्याने ८० टक्के गुण मिळविले आहेत. प्रदीप चौधरी याने ७४ टक्के, सूर्या पणीकर याने ७९ टक्के गुण मिळविले आहेत. अध्ययन अक्षम दिव्यांग प्रवर्गातील केतन शर्मा या विद्यार्थ्याने ८५ टक्के गुण मिळविले आहेत. जिशान जेसानी याने ७४ टक्के गुण मिळविले असून विद्यार्थ्यांचे यश प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रिया केंद्र संचालिका वर्षा भगत यांनी दिली आहे.४४ विद्यार्थ्यांनीपरीक्षा दिली नाहीनवी मुंबईमधून १४,४२२ विद्यार्थ्यांनी व पनवेलमधून १०,४४४ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. नवी मुंबईमधून १९ व पनवेलमधील २५ विद्यार्थ्यांनी परीक्षाच दिलेली नव्हती. नवी मुंबईमधील ९०१ व पनवेलमधील ७४८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी खचून जावू नये, असे आवाहन शिक्षकांसह तज्ज्ञांनी केले आहे.सायबर कॅफेमध्ये गर्दीपनवेलमध्ये निकाल पाहण्यासाठी १२ वाजल्यापासून अनेकांनी सायबर कॅफेमध्ये गर्दी केली होती. मोबाइलवर निकाल पाहताना वारंवार मोबाइल हॅक होत असल्यामुळे व नेटवर्कची समस्या असल्याने सायबर कॅफेमध्ये निकाल पाहण्यासाठी गर्दी केली होती. अनेकांनी निकालासाठी जादा मनुष्यबळ उपलब्ध केले होते.महापालिका शाळांचा ८९ टक्के निकालनवी मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांनीही दहावीच्या निकालामध्ये लक्षणीय यश मिळविले आहे. नेरूळ शाळेतील वैष्णव कोंडाळकर याने ९४.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे.करावेमधील रिश्वकुमार रवींद्र झा याने ९२.६०, कोपरखैरणे सेक्टर ७ मधील पूनम पांडुरंग शिंदे हिने ९०.८० टक्के गुण मिळविले आहेत.महापालिकेने मनपा शाळांमधील गुणवत्ता वाढीसाठी सुट्यांच्या कालावधीमध्ये जादा तासिका घेण्यात आल्या होत्या.याशिवाय महापालिकेने नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजनाही सुरू केली असल्यामुळे त्याचा लाभ झाला आहे.या सर्वांमुळे निकाल चांगला लागण्यास मदत झाली आहे. महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.पालिका शाळांचा निकाल पुढीलप्रमाणेशाळा निकाल %दिघा १००दिवाळे १००सानपाडा ९५.४५वाशी ९५.३१शिरवणे ९४.२४घणसोली ९४.४नेरूळ ९३.२२कोपरखैरणे ९२.९८करावे ९२.८५ऐरोली ९०.१७तुर्भे गाव ८९.३९को.खै. सेक्टर ५ ८३.७७राबाडा ८३.३३खैरणे ८२.८९महापे ८१.१३तुर्भे स्टोअर्स ७५.९२श्रमिक नगर ७२

टॅग्स :Studentविद्यार्थी