शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिसादात नवी मुंबईकर देशात सर्वोत्तम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 23:39 IST

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये यावर्षीही नवी मुंबईने ठसा उमटवला आहे.

नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये यावर्षीही नवी मुंबईने ठसा उमटवला आहे. नागरिकांच्या प्रतिसादामध्ये देशातील सर्वोत्तम शहर पुरस्कार प्राप्त झाला आहे. गतवर्षी स्वच्छ शहरामधील नवव्या क्रमांकावरून या वर्षी सातव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. राज्यातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून पुन्हा एकदा गौरव मिळविला असून, टॉप टेन अमृत शहरांमध्येही नवी मुंबई हे राज्यातील एकमेव शहर आहे.स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नवी मुंबईने स्वच्छतेमध्येही नावलौकिक मिळवला आहे. यापूर्वी राज्य शासनाने घेतलेल्या संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानामध्ये तीन वेळा नवी मुंबईने यश मिळविले होते. केंद्र शासनाने स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरू केल्यानंतर त्यामध्येही महापालिकेने सहभागी होण्यास सुरुवात केली. तीन वर्षांपासून सातत्याने स्वच्छतेसाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. देशातील सर्वोत्तम घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा नवी मुंबईने उभारली आहे. शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे. ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे प्रमाणही वाढविले आहे. झोपडपट्टीमध्येही मलनि:सारण वाहिन्या टाकणारी नवी मुंबई एकमेव महापालिका आहे. शहरातील कचराकुंड्यांची संख्याही कमी केली आहे. हागणदारीमुक्त शहर यापूर्वीच घोषित झाले असून, जास्तीत जास्त प्रसाधनगृहांची उभारणी व त्यांची देखभाल करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्यात महापालिकेला यश आले आहे. अभियान काळात शहरातील भिंती रंगविण्यात आल्या. पडीक जागांची साफसफाई करून त्यांचे सुशोभीकरण केले. स्वच्छतेसाठी आयोजित चित्रकला स्पर्धेमध्ये तब्बल १६ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.यापूर्वीच्या दोन वर्षांमध्ये स्वच्छतेसाठी प्रचंड मेहनत घेतली होती; परंतु नागरिकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. यामुळे यावर्षी नागरिकांचा प्रतिसाद वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले होते. पथनाट्यांच्या माध्यमातूनही जनजागृती करण्यात आली. स्वच्छ सोसायटी, रुग्णालये, शाळा-महाविद्यालये, हॉटेल्ससाठीही स्पर्धा ठेवण्यात आली. शहरात पथनाट्य, सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. या सर्वांमुळे नागरिकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात वाढला. नागरिकांच्या प्रतिसादासाठी देशातील सर्वोत्तम शहर म्हणून पुरस्कार मिळाला आहे. नवी दिल्लीमधील विज्ञान भवन येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये केंद्रीय गृहनिर्माण व शहर विकास मंत्रालयाचे केंद्रीय सचिव दुर्गाशंकर मिश्रा, स्वच्छ भारत मिशनचे संचालक व्ही. के. जिंदाल यांच्या हस्ते उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., स्वच्छ नवी मुंबई मिशन तदर्थ समितीच्या सभापती नेत्रा शिर्के यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या वेळी अतिरिक्त आयुक्त महावीर पेंढारी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तुषार पवार, अमरिश पटनिगिरे, दादासाहेब चाबूकस्वार उपस्थित होते. अधिक वृत्त /४>अशा घेतल्या प्रतिक्रियाकेंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशनमार्फत सुरू केलेल्या स्वच्छता अ‍ॅपवरील नागरिकांच्या प्रतिसादाची नोंद घेण्यात आली. केंद्रामधून नागरिकांना थेट फोन करून त्यांना स्वच्छतेविषयी विचारणा केली जात होती. १९६९ या टोल फ्री क्रमांकावरही नागरिकांचे अभिप्राय जाणून घेण्यात आले होते. यामध्ये नवी मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला.>या गोष्टींसाठी पालिकेचा गौरवस्वच्छता अभियानामध्ये नागरिकांच्या प्रतिसादामध्ये देशातील सर्वोत्तम शहर म्हणून निवडदेशातील स्वच्छ शहरांमध्ये सातवा क्रमांकस्वच्छ शहरामध्ये राज्यातील प्रथम क्रमांकाचे शहरकेंद्रीय निरीक्षण पथकाने कागदपत्र व प्रत्यक्ष तपासणीमध्ये थ्री स्टार रेटिंग दिलेहागणदारीमुक्त शहरांमध्ये ओडीएफ डबल प्लस रेटिंग प्राप्तअमृत शहरांमध्ये टॉप टेनमध्ये असलेले राज्यातील एकमेव शहर>अभियानातील कामगिरीदेशातील सर्वोत्तम घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा उभारण्यात यशदेशातील अत्याधुनिक डम्पिंग ग्राउंड असलेले शहरओला व सुका कचरा वेगळा करण्याचे प्रमाण वाढविण्यात यशझोपडपट्टी परिसरामध्येही मलनि:सारण वाहिन्या टाकण्यास सुरुवातअत्याधुनिक मलप्रक्रिया केंद्रांची उभारणी व प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरप्रसाधनगृहांची उभारणी व देखभालीसाठी सक्षम यंत्रणा उभारण्यात यशशहरातील सर्व भिंती, चौकांची रंगरंगोटी व सुशोभीकरणउद्याने, शाळा व मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये खतनिर्मिती प्रकल्प>केंद्र शासनाने स्वच्छता अभियान सुरू केल्यापासून प्रत्येक वर्षी महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेचा आलेख उंचावत आहे. प्रत्येक नागरिकाने यामध्ये सहभाग नोंदविला हे महत्त्वाचे. स्वच्छतेची चळवळ उभी करण्यात यश मिळविले आहे. सर्वांनी केलेल्या प्रयत्नामुळे नवी मुंबईचे नाव देशपातळीवर उंचविण्यात यश आले असून, स्वच्छतेचा हा आलेख असाच वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.- विजय चौगुले,विरोधी पक्ष नेते>स्वच्छता अभियानामध्ये नवी मुंबईमधील नागरिकांनी चांगला सहभाग दर्शविला. शहराविषयी प्रेम व्यक्त केलेच शिवाय अभियानामध्ये सक्रिय सहभाग घेतला, यामुळेच राज्यातील पहिल्या क्रमांकाचे व देशातील सातव्या क्रमांकाचे यश मिळाले आहे. हा पुरस्कार सर्व शहरवासीयांच्या मेहनतीमुळे मिळाला आहे.- मंदाकिनी म्हात्रे,उपमहापौर, नवी मुंबई

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका