शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

नेरूळ मलप्रक्रिया केंद्रातील गाळ काढला; नागरिकांची दुर्गंधीपासून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 1:19 AM

महापालिकेने परिसरात स्वच्छता करण्याची मागणी

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २ येथील नवी मुंबई महापालिकेच्या मलनि:सारण प्रक्रिया केंद्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नागरिक दुर्गंधीने त्रस्त होते. महापालिकेच्य माध्यमातून मलप्रक्रिया केंद्रातील गाळ काढण्यात आल्याने स्थानिकांची दुर्गंधीतून सुटका झाली आहे. मलप्रक्रिया केंद्रातील परिसराची नियमित स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

नेरूळ पूर्व आणि पश्चिम भागातीत मलवाहिन्यांतील सांडपाणी नेरूळ सेक्टर २ येथील मलनि:सारण प्रक्रिया केंद्रात सोडण्यात आले आहे. या ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. सदर मलप्रकिया केंद्र जुने झाले असून परिसरातील नागरिकांना दुर्गंधीसारख्या विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. मलप्रकिया केंद्र स्थलांतरणाच्या प्रक्रिया २०१२ मध्ये पूर्ण झाल्या होत्या. या कामाला पालिकेच्या महासभेची मंजुरी मिळून कामदेखील सुरू झाले होते. काम अंतिम टप्प्यात आले असताना खारफुटीचा अडथळा येत असल्याने हे काम रखडले होते. त्यानंतर सदर कामाला पुन्हा मंजुरी मिळाली होती, परंतु ते काम पूर्ण होऊ शकले नाही. सदर केंद्र स्थलांतरित होणार असल्याचे सांगून गेल्या काही वर्षांपासून डागडुजीची कामे करण्यात आलेली नाहीत.

मलप्रक्रिया केंद्रातील गाळ काढण्याकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. मलप्रकिया केंद्रातील गाळाची पातळी वाढल्याने परिसरात दुर्गंधीचे प्रमाणदेखील वाढले आहे. मलनि:सारण केंद्राच्या परिसरात मोकळी जागा मोठ्या प्रमाणावर असून शहरात स्वच्छता अभियान राबविताना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून जप्त केलेले साहित्य, बॅनर, भंगार वाहने, डेब्रिज टाकण्यात आले आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरलेली आहे. या ठिकाणी सापांचा वावरही वाढला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

कोरोना काळात मलनि:सारण केंद्रातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्याअनुषंगाने माजी नगरसेविका स्नेहा पालकर यांनी महापालिकेकडे पत्रव्यवहार करून मलनि:सारण केंद्रातील गाळ काढण्याची आणि परिसर स्वच्छ करण्याची मागणी केली होती.

च्नवी मुंबई महानगरपालिकेने घटनेची तत्काळ दखल घेत शुक्रवारी २९ मे रोजी मलनि:सारण केंद्रातील गाळ काढण्याचे कामसुरू के ले आहे. गाळ काढल्याने परिसरातील दुर्गंधीचे प्रमाण कमी होणार असून स्वच्छतेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई