शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

रिलायन्स हॉस्पिटलचे उदघाटन, 50 कोटी जनतेला मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 19:59 IST

ठाणे - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आयुष्यमान भारत योजनेमुळे देशातील 50 कोटी जनतेला उपचारांवरील खर्चातून मोठा दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. रिलायन्ससारख्या रुग्णालयानेही सर्वसामान्य जनतेला उत्तम आणि आधुनिक सेवा देऊन या "मोदी केअर" मध्ये योगदान द्यावे, असे आवाहनही फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवी मुंबईतील कोपरखैरणे ...

ठाणे - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आयुष्यमान भारत योजनेमुळे देशातील 50 कोटी जनतेला उपचारांवरील खर्चातून मोठा दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. रिलायन्ससारख्या रुग्णालयानेही सर्वसामान्य जनतेला उत्तम आणि आधुनिक सेवा देऊन या "मोदी केअर" मध्ये योगदान द्यावे, असे आवाहनही फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील रिलायन्स हॉस्पिटलचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

सरकार उच्च दर्जाच्या व परवडणाऱ्या सार्वजनिक आरोग्याच्या पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. गेल्या काही वर्षांत देशभरातील निदान केंद्रे आणि सुविधांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने विविध रोगांविषयी माहिती होऊन त्यावरील उपचारही उपलब्ध होत आहेत. मुंबईत वैद्यकीय उपचारांसाठी इतर देशांतून रुग्ण येण्याचे प्रमाण वाढले आहे. परवडणारी आणि सहज उपलब्ध असणारी वैद्यकीय सेवा आवश्यक बाब असून हेल्थकेअर क्षेत्रात आणखीही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढणे गरजेचे आहे. त्यामुळे नोकरीच्या संधीही वाढतील, असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच रिलायन्सच्या रुग्णालय सेवेचे कौतूक करताना, रिलायन्सच्या या हॉस्पिटलमध्ये जनरल वार्डसुद्धा इतक्या चांगल्या पद्धतीने सुसज्ज केला आहे की, तेथील रुग्णही हे वातावरण पाहून लवकरच बरा होईल, असे फडणवीस म्हणाले. या हॉस्पिटलमध्ये सर्वाना समान दर्जाच्या सेवा व उपचार मिळणार आहेत. त्यामुळे गरीब असो वा श्रीमंत सर्वांनाच एकसमान उपचारपद्धती मिळेल ही निश्चितच समाधानाची बाब आहे. रिलायन्सच्या या उपक्रमात राज्यातील अगदी छोट्या शहरांतही येणाऱ्या काळात 19 कॅन्सरवरील उपचार केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. कॅन्सरचे वाढते प्रमाण पहाता याची मोठी आवश्यकता आहे आणि या समूहाची ही मोठी झेप ठरेल असे फडणवीस यांनी शेवटी म्हटले. दरम्यान, उत्तरप्रदेशनंतर महाराष्ट्रात कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती आहे. 

रिलायन्स हॉस्पिटलची वैशिष्टये

•    आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुसज्ज •    अत्याधुनिक साधनसामुग्री•    संसर्ग होऊ नये म्हणून सुसज्ज रुम•    36 स्पेशल विभाग•    125 तज्ज्ञ डॉक्टर आणि 225 बेडस्•    4   आंतराष्ट्रीय  गुणवत्तेचे ऑपरेशन थिएटर•    रेडिएशन टेक्नोलॉजिसह अत्याधुनिक सुविधा 

टॅग्स :Relianceरिलायन्सDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसhospitalहॉस्पिटल