शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारच्या चहापानावर बहिष्कार; हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधकांचा सरकारवर घणाघाती आरोप
2
Smriti Mandhana : "आता पुढे जाण्याची वेळ आलीय, मला हे प्रकरण..."; स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं!
3
EMI चा भार हलका होणार! RBI च्या निर्णयापाठोपाठ 'या' ४ बँकांकडून कर्जाच्या व्याजदरात मोठी कपात
4
"नवऱ्याने दिला धोका, भारतात दुसरं लग्न..."; पाकिस्तानी महिलेने पंतप्रधान मोदींकडे मागितला न्याय
5
Palash Muchchal : "माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ..."; स्मृती मानधनासोबत लग्न मोडल्यावर पलाश मुच्छलची पोस्ट
6
66 पैशांच्या स्टॉकचा धमाका, एका महिन्यात पैसा डबल...! खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, सातत्यानं लागतंय अप्पर सर्क्रिट
7
Video: मालिका विजयानंतर विराट कोहलीने सिंहाचलम मंदिरात घेतला भगवान विष्णूचा आशीर्वाद...
8
कोण आहे हा २५ जणांची राखरांगोळी करणाऱ्या क्लबचा मालक सौरभ लुथरा? ४ देश आणि २२ शहरांत क्लबची चेन...
9
नाईट क्लबमध्ये बेली डान्स सुरु होता, वरून आगीचे गोळे पडू लागले...; आग सिलिंडरने नाही तर... गोव्याचा धक्कादायक व्हिडिओ आला समोर...
10
फक्त १२% नव्हे! EPFO मध्ये 'या' नियमानुसार जमा करता येतात जास्तीचे पैसे; निवृत्तीनंतर मिळेल मोठा फंड
11
गोवा आग प्रकरणात मोठी कारवाई; क्लबच्या मालकाला अटक, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
12
बनावट कागदपत्रं दाखवून लाटली सरकारी नोकरी, १० वर्षांनंतर फुटलं बिंग, स्टाफ नर्सवर कारवाई
13
गोव्यातील क्लब दुर्घटनेनंतर मोठा प्रश्न! गॅस स्फोटात विम्याचे नियम काय? 'या' चुकीमुळे ५० लाखांचे कवच गमावले!
14
इलॉन मस्कची 'SpaceX' रचणार इतिहास! कंपनीचे मूल्य ७२ लाख कोटींवर पोहोचणार? OpenAI चा रेकॉर्ड मोडणार
15
Video: यशस्वीने विराटला केक भरवला, रोहितकडे येताच हिटमॅन म्हणाला- 'नको रे, परत जाड होईल...'
16
इंडिगोच्या घोळाचा आमदारांनांही फटका, नागपूर अधिवेशनासाठी निघालेल्या अनेक आमदारांची तिकिटं रद्द
17
IND vs SA : टॉस जिंकला नसता तर... विराट-अर्शदीपचा 'सेंच्युरी पे सेंच्युरी' व्हिडिओ व्हायरल
18
अरे व्वा! WhatsApp Call रेकॉर्डिंगसाठी थर्ड-पार्टी Appची गरज नाही! फक्त एक सेटिंग बदला
19
मेट्रोनं प्रवास करणाऱ्या भारतीय युवकाचं एका व्हायरल फोटोनं आयुष्य पालटलं; जाणून घ्या सत्य काय?
20
हायव्होल्टेज ड्रामा! "मी तिच्यासोबत नवरा बनून राहीन"; ३ मुलांच्या आईच्या प्रेमात वेडी झाली तरुणी
Daily Top 2Weekly Top 5

रिलायन्स हॉस्पिटलचे उदघाटन, 50 कोटी जनतेला मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 19:59 IST

ठाणे - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आयुष्यमान भारत योजनेमुळे देशातील 50 कोटी जनतेला उपचारांवरील खर्चातून मोठा दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. रिलायन्ससारख्या रुग्णालयानेही सर्वसामान्य जनतेला उत्तम आणि आधुनिक सेवा देऊन या "मोदी केअर" मध्ये योगदान द्यावे, असे आवाहनही फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवी मुंबईतील कोपरखैरणे ...

ठाणे - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आयुष्यमान भारत योजनेमुळे देशातील 50 कोटी जनतेला उपचारांवरील खर्चातून मोठा दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. रिलायन्ससारख्या रुग्णालयानेही सर्वसामान्य जनतेला उत्तम आणि आधुनिक सेवा देऊन या "मोदी केअर" मध्ये योगदान द्यावे, असे आवाहनही फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील रिलायन्स हॉस्पिटलचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

सरकार उच्च दर्जाच्या व परवडणाऱ्या सार्वजनिक आरोग्याच्या पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. गेल्या काही वर्षांत देशभरातील निदान केंद्रे आणि सुविधांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने विविध रोगांविषयी माहिती होऊन त्यावरील उपचारही उपलब्ध होत आहेत. मुंबईत वैद्यकीय उपचारांसाठी इतर देशांतून रुग्ण येण्याचे प्रमाण वाढले आहे. परवडणारी आणि सहज उपलब्ध असणारी वैद्यकीय सेवा आवश्यक बाब असून हेल्थकेअर क्षेत्रात आणखीही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढणे गरजेचे आहे. त्यामुळे नोकरीच्या संधीही वाढतील, असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच रिलायन्सच्या रुग्णालय सेवेचे कौतूक करताना, रिलायन्सच्या या हॉस्पिटलमध्ये जनरल वार्डसुद्धा इतक्या चांगल्या पद्धतीने सुसज्ज केला आहे की, तेथील रुग्णही हे वातावरण पाहून लवकरच बरा होईल, असे फडणवीस म्हणाले. या हॉस्पिटलमध्ये सर्वाना समान दर्जाच्या सेवा व उपचार मिळणार आहेत. त्यामुळे गरीब असो वा श्रीमंत सर्वांनाच एकसमान उपचारपद्धती मिळेल ही निश्चितच समाधानाची बाब आहे. रिलायन्सच्या या उपक्रमात राज्यातील अगदी छोट्या शहरांतही येणाऱ्या काळात 19 कॅन्सरवरील उपचार केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. कॅन्सरचे वाढते प्रमाण पहाता याची मोठी आवश्यकता आहे आणि या समूहाची ही मोठी झेप ठरेल असे फडणवीस यांनी शेवटी म्हटले. दरम्यान, उत्तरप्रदेशनंतर महाराष्ट्रात कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती आहे. 

रिलायन्स हॉस्पिटलची वैशिष्टये

•    आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुसज्ज •    अत्याधुनिक साधनसामुग्री•    संसर्ग होऊ नये म्हणून सुसज्ज रुम•    36 स्पेशल विभाग•    125 तज्ज्ञ डॉक्टर आणि 225 बेडस्•    4   आंतराष्ट्रीय  गुणवत्तेचे ऑपरेशन थिएटर•    रेडिएशन टेक्नोलॉजिसह अत्याधुनिक सुविधा 

टॅग्स :Relianceरिलायन्सDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसhospitalहॉस्पिटल