शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

पुनर्बांधणीला मिळणार गती, मुख्यमंत्र्यांचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 01:22 IST

सिडकोनिर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. पुनर्बांधणीसाठी आता फक्त ५१ टक्के रहिवाशांची सहमती लागणार आहे

नवी मुंबई : सिडकोनिर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. पुनर्बांधणीसाठी आता फक्त ५१ टक्के रहिवाशांची सहमती लागणार आहे. त्यामुळे वर्षेनुवर्षे रखडलेल्या शहरातील जवळपास आठ हजार इमारतींच्या पुनर्बांधणीला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सिडकोने शहरात जवळपास दहा हजार इमारती बांधल्या आहेत; परंतु बांधकामाच्या निकृष्ट दर्जामुळे या इमारती अल्पावधीतच मोडकळीस आल्या आहेत. या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न मागील २० वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यातून राहणाºया सुमारे ५५ हजार रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आघाडी सरकारच्या १५ वर्षांच्या कालखंडात पुनर्बांधणीचा विषय केवळ निवडणुकीतील प्रचारासाठीच वापरण्यात आला; परंतु २०१४मध्ये भाजपा शिवसेनेचे सरकार सत्तेवर येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न सोडविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ४ फेब्रुवारी २०१५ रोजी या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी अडीच एफएसआय जाहीर करण्यात आला. इतकेच नव्हे, तर यासंदर्भात अध्यादेशही काढण्यात आले. त्यामुळे रखडलेल्या पुनर्बांधणीच्या कामाला गती मिळेल, असा विश्वास रहिवाशांकडून व्यक्त होत होता; परंतु पुनर्बांधणीसाठी १०० टक्के रहिवाशांच्या सहमतीची अट टाकली गेल्याने या प्रक्रियेला पुन्हा खीळ बसली.शिवसेनेचे नगरसेवक किशोर पाटकर यांनी बेलापूरच्या भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू केला. आमदार मंदा म्हात्रे यांनी वेळोवेळी या प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात १०० टक्के सहमतीची अट शिथिल करून, ती ५१ टक्क्यांवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते.