शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

गांभीर्य नसल्याने पुनर्विकास रखडला, मंदा म्हात्रे यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 00:18 IST

शहरातील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास व्हावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शासन आणि महापालिकेकडे पाठपुरावा करत आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील अनेक इमारती मोडकळीस आल्या असून, धोकादायक स्थितीमध्ये आहेत. राज्य सरकार, महापालिका प्रशासन आणि सिडको यांना गांभीर्य नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक इमारतींचा पुनर्विकास रखडला असल्याचा आरोप आमदार मंदा म्हात्रे यांनी शुक्रवारी केला.नवी मुंबई महापालिकेने या वर्षी शहरातील सुमारे ४००हून अधिक इमारती धोकादायक असल्याचे घोषित केले आहे, परंतु शहरात मुंबईसारखी दुर्घटना घडल्यास, एखादी दुर्घटना किंवा नैसर्गिक आपत्ती आल्यास, महापालिकेने नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था कोठे केली आहे? तसेच महापालिकेकडे संक्रमण शिबिरांची संख्या किती आहे? याबाबत विचारणा करण्यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची शुक्रवारी भेट घेतली. त्यानंतर, आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार म्हात्रे बोलत होत्या.शहरातील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास व्हावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शासन आणि महापालिकेकडे पाठपुरावा करत आहे. नागरिकांच्या या प्रश्नाबाबत कोणतेही सरकार, महापालिका आणि सिडकोला याचे गांभीर्य नसल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला. शहरातील नागरिक महापालिकेला कर भरत असल्याने, त्यांना सुविधा पुरविण्याची नैतिक जबाबदारी महापालिकेची असल्याचे त्यांनी सांगितले. आयुक्त बांगर यांची नव्याने नियुक्ती झाली असून, त्यांना या समस्येबाबत माहिती देण्यात आली असून, संक्रमण शिबिरांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची सूचना केली आहे. पामबीच लागत असलेल्या मोकळ्या इमारतींमध्ये पाणी आणि लाइटची सुविधा उपलब्ध करून दिल्यास, त्या ठिकाणीही संक्रमण शिबिर सुरू करता येणार असल्याचे सूचित करण्यात आले असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. संक्रमण शिबिराच्या मुद्द्यावर येत्या आठ दिवसांत कार्यवाही न केल्यास, आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला. पत्रकार परिषदेला भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी नगरसेवक दीपक पवार, सुनील पाटील, महामंत्री विजय घाटे, भाजपचे युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे आदी उपस्थित होते.इमारतींचा पुनर्विकास हा कळीचा मुद्दा : नवी मुंबई शहरातील अनेक इमारती गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक स्थितीमध्ये आहेत. या इमारतींच्या पुनर्विकासासाठी शासन, महापालिकेकडे गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे. पुनर्विकासाची कामे कोणाला मिळतील, हा कळीचा मुद्दा बनला असून, यामुळेच पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागला नसल्याची टीका आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईManda Mhatreमंदा म्हात्रे