शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

गांभीर्य नसल्याने पुनर्विकास रखडला, मंदा म्हात्रे यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 00:18 IST

शहरातील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास व्हावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शासन आणि महापालिकेकडे पाठपुरावा करत आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील अनेक इमारती मोडकळीस आल्या असून, धोकादायक स्थितीमध्ये आहेत. राज्य सरकार, महापालिका प्रशासन आणि सिडको यांना गांभीर्य नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक इमारतींचा पुनर्विकास रखडला असल्याचा आरोप आमदार मंदा म्हात्रे यांनी शुक्रवारी केला.नवी मुंबई महापालिकेने या वर्षी शहरातील सुमारे ४००हून अधिक इमारती धोकादायक असल्याचे घोषित केले आहे, परंतु शहरात मुंबईसारखी दुर्घटना घडल्यास, एखादी दुर्घटना किंवा नैसर्गिक आपत्ती आल्यास, महापालिकेने नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था कोठे केली आहे? तसेच महापालिकेकडे संक्रमण शिबिरांची संख्या किती आहे? याबाबत विचारणा करण्यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची शुक्रवारी भेट घेतली. त्यानंतर, आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार म्हात्रे बोलत होत्या.शहरातील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास व्हावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शासन आणि महापालिकेकडे पाठपुरावा करत आहे. नागरिकांच्या या प्रश्नाबाबत कोणतेही सरकार, महापालिका आणि सिडकोला याचे गांभीर्य नसल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला. शहरातील नागरिक महापालिकेला कर भरत असल्याने, त्यांना सुविधा पुरविण्याची नैतिक जबाबदारी महापालिकेची असल्याचे त्यांनी सांगितले. आयुक्त बांगर यांची नव्याने नियुक्ती झाली असून, त्यांना या समस्येबाबत माहिती देण्यात आली असून, संक्रमण शिबिरांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची सूचना केली आहे. पामबीच लागत असलेल्या मोकळ्या इमारतींमध्ये पाणी आणि लाइटची सुविधा उपलब्ध करून दिल्यास, त्या ठिकाणीही संक्रमण शिबिर सुरू करता येणार असल्याचे सूचित करण्यात आले असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. संक्रमण शिबिराच्या मुद्द्यावर येत्या आठ दिवसांत कार्यवाही न केल्यास, आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला. पत्रकार परिषदेला भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी नगरसेवक दीपक पवार, सुनील पाटील, महामंत्री विजय घाटे, भाजपचे युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे आदी उपस्थित होते.इमारतींचा पुनर्विकास हा कळीचा मुद्दा : नवी मुंबई शहरातील अनेक इमारती गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक स्थितीमध्ये आहेत. या इमारतींच्या पुनर्विकासासाठी शासन, महापालिकेकडे गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे. पुनर्विकासाची कामे कोणाला मिळतील, हा कळीचा मुद्दा बनला असून, यामुळेच पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागला नसल्याची टीका आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईManda Mhatreमंदा म्हात्रे