शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईलाही पावसाने झोडपले; जनजीवन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 23:53 IST

महापालिका कार्यक्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. दोन दिवसांत तब्बल २२ वृक्ष कोसळले असून, तीन ठिकाणी संरक्षण भिंत कोसळली आहे. शनिवारी पहाटेपासून पाऊस वाढल्याने सकाळच्या सत्रातील शाळांना सुट्टी देण्यात आली होती.

नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. दोन दिवसांत तब्बल २२ वृक्ष कोसळले असून, तीन ठिकाणी संरक्षण भिंत कोसळली आहे. शनिवारी पहाटेपासून पाऊस वाढल्याने सकाळच्या सत्रातील शाळांना सुट्टी देण्यात आली होती.नवी मुंबईमध्ये २६ जुलैला २४ तासामध्ये तब्बल सरासरी २२१ मिमी. एवढी पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत ७८ मिमी. पावसाची नोंद झाली होती. एकाच दिवशी १५ वृक्ष कोसळले. शनिवारीही शहरवासीयांना पाऊसाने झोडपले. यामुळे हजारो नागरिकांना नोकरी व व्यवसायाच्या ठिकाणी पोहोचता आले नाही. सायंकाळपर्यंत वाशीमध्ये २ व सीबीडीमध्ये ४ वृक्ष कोसळले. नेरूळ सेक्टर ११ मध्ये संरक्षण भिंत कोसळली असून, दोन दिवसांतील ही तिसरी घटना आहे. सुरक्षेची उपाययोजना म्हणून शाळांना सुट्टी देण्यात आली होती, परंतु सुट्टीची माहिती न मिळाल्यामुळे अनेक विभागामध्ये शाळा सुरूच ठेवण्यात आल्या होत्या.जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नवी मुंबईमध्ये ३३ ठिकाणी पाणी साचले होते. यामुळे महापालिका प्रशासनावर चौफेर टीका झाली होती. यानंतर, प्रशासनाने पाणी साचणाऱ्या ठिकाणी आवश्यक कामे केल्यामुळे दोन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी कुठेच साचले नाही.मुसळधार पाऊस सुरू असूनही मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील व्यवहार सुरळीत होते. भाजी व फळ मार्केटच्या प्रवेशद्वारावर काही प्रमाणात पाणी साचले होते, पण त्याचा खरेदी-विक्रीवर फारसा परिणाम झालेला नाही. भाजी मार्केटमध्ये १०० ट्रक व ४४३ टेम्पो अशी एकूण ५४३ वाहनांची आवक झाली असून, ५६२ वाहनांमधील भाजीपाला मुंबई व नवी मुंबईमधील किरकोळ मार्केटमध्ये वितरित झाला आहे. दिवसभर सर्व व्यवहार सुरळीत होते, अशी माहिती बाजारसमिती अधिकाऱ्यांनी दिली.उरणमध्ये मुसळधार पाऊसमुसळधार पावसामुळे उरण येथील बोकडवीरा गावातील रहिवाशाच्या घराचे मोठे नुकसान झाले. जयवंत रोहिदास डाकी यांच्या घराचे पत्रे उडून नुकसान झाले आहे. केगाव येथे झाड कोसळल्याने त्या ठिकाणच्या काही घरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. रांजणपाडा येथील गावात पावसाचे पाणी शिरले असल्याची माहिती तहसीलदार कल्पना गोडे यांनी दिली. जोरदार पावसामुळे मोरा भाऊचा धक्का दरम्यानची सागरी प्रवासी वाहतूकही संध्याकाळनंतर बंद करण्यात आली होती.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई