शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

नवी मुंबईलाही पावसाने झोडपले; जनजीवन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 23:53 IST

महापालिका कार्यक्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. दोन दिवसांत तब्बल २२ वृक्ष कोसळले असून, तीन ठिकाणी संरक्षण भिंत कोसळली आहे. शनिवारी पहाटेपासून पाऊस वाढल्याने सकाळच्या सत्रातील शाळांना सुट्टी देण्यात आली होती.

नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. दोन दिवसांत तब्बल २२ वृक्ष कोसळले असून, तीन ठिकाणी संरक्षण भिंत कोसळली आहे. शनिवारी पहाटेपासून पाऊस वाढल्याने सकाळच्या सत्रातील शाळांना सुट्टी देण्यात आली होती.नवी मुंबईमध्ये २६ जुलैला २४ तासामध्ये तब्बल सरासरी २२१ मिमी. एवढी पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत ७८ मिमी. पावसाची नोंद झाली होती. एकाच दिवशी १५ वृक्ष कोसळले. शनिवारीही शहरवासीयांना पाऊसाने झोडपले. यामुळे हजारो नागरिकांना नोकरी व व्यवसायाच्या ठिकाणी पोहोचता आले नाही. सायंकाळपर्यंत वाशीमध्ये २ व सीबीडीमध्ये ४ वृक्ष कोसळले. नेरूळ सेक्टर ११ मध्ये संरक्षण भिंत कोसळली असून, दोन दिवसांतील ही तिसरी घटना आहे. सुरक्षेची उपाययोजना म्हणून शाळांना सुट्टी देण्यात आली होती, परंतु सुट्टीची माहिती न मिळाल्यामुळे अनेक विभागामध्ये शाळा सुरूच ठेवण्यात आल्या होत्या.जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नवी मुंबईमध्ये ३३ ठिकाणी पाणी साचले होते. यामुळे महापालिका प्रशासनावर चौफेर टीका झाली होती. यानंतर, प्रशासनाने पाणी साचणाऱ्या ठिकाणी आवश्यक कामे केल्यामुळे दोन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी कुठेच साचले नाही.मुसळधार पाऊस सुरू असूनही मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील व्यवहार सुरळीत होते. भाजी व फळ मार्केटच्या प्रवेशद्वारावर काही प्रमाणात पाणी साचले होते, पण त्याचा खरेदी-विक्रीवर फारसा परिणाम झालेला नाही. भाजी मार्केटमध्ये १०० ट्रक व ४४३ टेम्पो अशी एकूण ५४३ वाहनांची आवक झाली असून, ५६२ वाहनांमधील भाजीपाला मुंबई व नवी मुंबईमधील किरकोळ मार्केटमध्ये वितरित झाला आहे. दिवसभर सर्व व्यवहार सुरळीत होते, अशी माहिती बाजारसमिती अधिकाऱ्यांनी दिली.उरणमध्ये मुसळधार पाऊसमुसळधार पावसामुळे उरण येथील बोकडवीरा गावातील रहिवाशाच्या घराचे मोठे नुकसान झाले. जयवंत रोहिदास डाकी यांच्या घराचे पत्रे उडून नुकसान झाले आहे. केगाव येथे झाड कोसळल्याने त्या ठिकाणच्या काही घरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. रांजणपाडा येथील गावात पावसाचे पाणी शिरले असल्याची माहिती तहसीलदार कल्पना गोडे यांनी दिली. जोरदार पावसामुळे मोरा भाऊचा धक्का दरम्यानची सागरी प्रवासी वाहतूकही संध्याकाळनंतर बंद करण्यात आली होती.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई