शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

तुर्भे नाका येथील रेल्वे पादचारी पूल : प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 1:33 AM

तुर्भे नाका येथे रेल्वेरुळावर पादचारी पूल उभारण्यास होत असलेल्या दिरंगाईमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. त्या ठिकाणी पादचारी पूल मंजूर होऊनही प्रत्यक्षात अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. यामुळे जीव मुठीत धरून पादचाºयांना रूळ ओलांडावा लागत असल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत.

नवी मुंबई : तुर्भे नाका येथे रेल्वेरुळावर पादचारी पूल उभारण्यास होत असलेल्या दिरंगाईमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. त्या ठिकाणी पादचारी पूल मंजूर होऊनही प्रत्यक्षात अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. यामुळे जीव मुठीत धरून पादचाºयांना रूळ ओलांडावा लागत असल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत.तुर्भे नाका येथे ठाणे-बेलापूर मार्गावर पादचा-यांकडून रस्ता ओलांडण्याच्या प्रकारात अपघात घडत होते. यामुळे त्या ठिकाणी पादचारी पूल बांधून दुभाजकावर लोखंडी तारेचे कुंपण घालण्यात आले आहे. मात्र, रस्त्यावरील अपघात थांबले असले तरीही त्या ठिकाणी रेल्वे रुळावर मात्र अपघातांची मालिका सुरूच आहे. जनता मार्केटच्या दिशेला जाण्यासाठी रेल्वे रुळावरही पुलाची आवश्यकता आहे. त्याकरिता खासदार राजन विचारे यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करून त्यास मंजुरी मिळवली. जानेवारीमध्ये कार्यादेश मिळाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली जाणार होती; परंतु ठरवलेली तारीख सातत्याने पुढे ढकलली जात आहे. यामुळे अद्यापपर्यंत प्रत्यक्षात पादचारी पूल बांधणीच्या कामाला सुरुवात झालेली नाही. यामुळे तिथे अपघातांची मालिका सुरूच आहे. प्रत्येक रविवारी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाजार भरत असल्याने रेल्वे रुळाच्या दुतर्फा फेरीवाले बसतात. यासाठी काहींनी रुळाभोवती बांधलेली भिंत पाडून पाऊलवाट तयार केलेली आहे. त्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात पादचाºयांची ये-जा होत असल्याने बेसावध अवस्थेत त्यांना रेल्वेची धडक लागून अपघात घडत आहेत. अशाच प्रकारातून रविवारी एका व्यक्तीला रेल्वेची धडक लागल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे सातत्याने घडणाºया अशा घटनांना आळा घालण्यासाठी त्या ठिकाणी लवकरात लवकर पादचारी पूल उभारला जाण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.या पादचारी पुलासाठी पालिका निधी देणार असून, पुलाचे बांधकाम रेल्वेमार्फत केले जाणार आहे. त्यानुसार पालिका व रेल्वे अधिकाºयांनी प्रत्यक्षात ठिकाणाची पाहणीदेखील केलेली आहे.या वेळी ज्या ठिकाणी पुलाचा पिलर ज्या ठिकाणी उभारला जाणार होता, त्या ठिकाणी भूमिगत गॅसवाहिनी असल्याचे समोर आले. यामुळे पिलर उभारण्यासाठी अधिकाºयांना नव्या जागेचा शोध घेण्यास अधिक कालावधी लागत असल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र, या कामासंदर्भात दोन्ही प्रशासनाच्या अधिकाºयांकडे चौकशी केल्यास एक-दुसºयावर टोलवा टोलवी होत असल्याचा आरोप शाखाप्रमुख महेश कोटीवाले यांनी केला आहे. तर केवळ श्रेय लाटण्याच्या उद्देशाने काही व्यक्तींकडून पालिका अधिकाºयांना हाताशी धरून कामात दिरंगाई केली जात असल्याचाही त्यांचा आरोप आहे.ठाणे-बेलापूर मार्गावर उभारण्यात आलेला पादचारी पुलाचे दुसरे टोल रेल्वे रुळाच्या दुसºया बाजूला घेणे आवश्यक होते. मात्र, नियोजनाच्या अभावामुळे तसे झाले नसल्याने रस्ता ओलांडण्यासाठी पूल वापरणाºया पादचाºयांना जनता मार्केटच्या दिशेला जाण्यासाठी रूळ ओलांडावा लागत आहे. त्यामुळे घडणाºया दुर्घटनांना नियोजनाचा अभाव हादेखील कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई