शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

मुलांमधील स्वमग्नतेचे पालकांपुढे कोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 07:03 IST

स्वमग्नता हा गंभीर आजार नसून, अद्यापही पालकांना न सुटलेले कोडे आहे. लहान मुलाकडून सातत्याने होणारे एकच कृत्य स्वमग्नतेचे लक्षण असू शकते; परंतु मुलांमध्ये काही कमी आहे, याचा पालकच स्वीकार करत नसल्याचा परिणाम त्या मुलाच्या वाढीवर होऊ शकतो. त्यामुळे स्वमग्नतेबाबत जागरूक झालेल्या पालकांनी शनिवारी ठाणे-पनवेल रेल्वेमार्गावर अभियान राबवून इतरांनाही जागरूकतेचा संदेश दिला.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई -  स्वमग्नता हा गंभीर आजार नसून, अद्यापही पालकांना न सुटलेले कोडे आहे. लहान मुलाकडून सातत्याने होणारे एकच कृत्य स्वमग्नतेचे लक्षण असू शकते; परंतु मुलांमध्ये काही कमी आहे, याचा पालकच स्वीकार करत नसल्याचा परिणाम त्या मुलाच्या वाढीवर होऊ शकतो. त्यामुळे स्वमग्नतेबाबत जागरूक झालेल्या पालकांनी शनिवारी ठाणे-पनवेल रेल्वेमार्गावर अभियान राबवून इतरांनाही जागरूकतेचा संदेश दिला.मुलांमधील स्वमग्नता ही जागतिक समस्या होत चालली आहे. काही मुलांमध्ये जन्मत:च असणाऱ्या या अवस्थेचा शोध १९४३ साली लिओ केनर यांनी लावला. मात्र, ७० वर्षांनंतरही अद्याप स्वमग्नतेबाबत पालकांमध्ये फारशी जागरूकता नसल्याचे दिसून येत आहे. अनेकदा लहान मुलांमधील एखादे वेगळे वर्तन पालकांकडून दुर्लक्षित होत असते. लहान आहे, हट्ट करेल, नंतर सुधारेल, असा स्वत:च्या मनाचा समज करून पालकच मुलांच्या दोषांवर पांघरून घालत असतात. मात्र, एखाद्या लहान मुलाचे असे वागणे, म्हणजे त्याच्यातल्या स्वमग्नतेचे लक्षणही असू शकते. अनेकदा स्वमग्नता म्हणजे गतिमंद असा गैरसमज करून मुलांमधील दोष लपवले जातात. परिणामी, अशा मुलांवर वेळीच योग्य उपचार न झाल्यास वाढत्या वयानुसार गंभीर परिणामही होऊ शकतात. त्यामुळे पालकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने २ एप्रिल हा ‘जागतिक स्वमग्नता जनजागृती दिवस’ तर एप्रिल महिना ‘जनजागृती महिना’ म्हणून पाळला जातो. तसेच स्वमग्नता हा मुलांमधील आजार नसून एक लक्षण आहे, ज्यावर उपचाराने मात करता येते. परंतु मुलांमधील अक्षमता उघड करण्यात पालक कमीपणा समजतात. स्वमग्नता म्हणजेच, आॅटिझम हा विषय तारे जमीन पर, ब्लॅक, माय नेम इज खान, बर्फी तसेच कोई मिल गया, अशा चित्रपटांमधून देखील गांभीर्याने हाताळण्यात आलेला आहे. त्यानंतरही तो केवळ चित्रपटापुरताच मर्यादित राहिला आहे.मागील काही वर्षांत नवी मुंबईतही मुलांमधील स्वमग्नता ही पालकांच्या चिंतेची बाब झाली आहे. दोन ते चार वयोगटातील १००पैकी सरासरी दोन मुलांमध्ये कमी-जास्त प्रमाणात स्वमग्नतेचे लक्षण आढळू शकते. डोळ्यांची तसेच हाताची विचित्र हालचाल करणे, एखाद्या संपूर्ण वस्तूऐवजी ठरावीक भागाकडेच एकटक बघत राहणे, शारीरिकवाढीच्या तुलनेत बौद्धिक वाढ कमी असणे, अशी त्याची प्रमुख लक्षणे आहेत. आहारातील बदल, वाढते प्रदूषण, कुटुंब व्यवस्थेतील गंभीर बदल ही मुलांमधील स्वमग्नतेची कारणे असू शकतात, असेही तज्ज्ञांचे मत आहे. सतत एकाकी राहिल्याने मुले स्वत:मध्येच गुंतून राहिलेली असतात, अशा वेळी ती सामान्य आयुष्य जगण्याऐवजी ठरावीक वस्तूकडे आकर्षित होऊन त्यामध्येच गुंतलेली असतात; परंतु आपल्या मुलामध्ये काहीतरी कमी आहे, हे पालक सहज मान्य करत नसल्याने उपचाराकडे पाठ फिरवली जाते. कालांतराने वाढत्या वयानुसार लक्षणे अधिक प्रमाणात दिसू लागल्यानंतर त्याचे गांभीर्य पालकांना समजते.ईटीसी केंद्राचा आधारपालिकेच्या वतीने विविध प्रकारच्या विकलांग मुलांच्या नि:शुल्क शिक्षणासाठी ईटीसी केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. या केंद्रात विविध प्रकारच्या विकलांग मुलांसह ५०हून अधिक स्वमग्न मुलांना सामान्य बनवण्याचे प्रयत्न होत आहेत. त्या ठिकाणी मुलांवर फिजीओ, ओटी-पीटी तसेच स्पिच थेरपीही केल्या जातात. तर ज्या मुलांना ईटीसी केंद्रात प्रवेश न मिळाल्याने खासगी शाळेत शिकतात, त्यांनाही पालिकेच्या वतीने थेरपीसाठी महिना दोन हजारांची मदत होते.पालकांवर आर्थिक भार : वाढत्या वयानुसार स्वमग्न मुलांमध्ये बौद्धिक व शारीरिकवाढीत प्रचंड तफावत असते. त्यांना प्रत्येक आठवड्याला वेगवेगळ्या थेरपीची गरज असते. प्रत्येक थेरपीचे शुल्क एक हजाराच्या घरात असल्याने पालकांवर प्रतिमहिना किमान १५ हजार रुपये खर्चाचा भार पडतो.ंपालकांमध्ये जागरूकता हवीपालिकेतर्फे विविध प्रकारच्या विकलांग मुलांच्या शिक्षणासाठी ईटीसी केंद्र चालविले जाते. त्या ठिकाणी सुमारे ५० स्वमग्न मुलांवर उपचार होत आहेत. लहान मुलांमध्ये एखादी कमतरता दिसून आल्यास पालकांनी त्याचा स्वीकार करायला हवा. वेळीच झालेले निदान उपचाराने दूर करता येऊ शकते. त्याकरिता स्वमग्नतेबाबत पालकांमध्येही जनजागृती आवश्यक आहे.- वर्षा भगत, ईटीसी केंद्र संचालिका

टॅग्स :newsबातम्याMaharashtraमहाराष्ट्र