शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त १४० कर्तृत्ववान महिलांचा भव्य सन्मान सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2025 17:13 IST

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर तेवढ्याच तोलामोलाचे राज्य करणारी एकमेव अद्वितीय स्त्री म्हणून अहिल्यादेवी होळकर ओळखल्या जातात असं माजी आमदार रामहरी रुपनवर यांनी म्हटलं.

नवी मुंबई - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट, कराड आणि ऑल इंडिया धनगर समाज महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबईत भव्य पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १४० कर्तृत्ववान महिलांचा सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाने महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देत समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

अहिल्यादेवींच्या कर्तृत्वाला इतिहासात तोड नाही

माजी आमदार रामहरी रुपनवर यांनी आपल्या भाषणात अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दातृत्व आणि कर्तृत्वाला इतिहासात तोड नाही. त्या मानवता आणि समतेच्या पुरस्कर्त्या होत्या. त्यांचे कार्य केवळ एका समाजापुरतेच मर्यादित नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर तेवढ्याच तोलामोलाचे राज्य करणारी एकमेव अद्वितीय स्त्री म्हणून अहिल्यादेवी होळकर ओळखल्या जातात. त्यांनी देशातील पहिली सैनिकी महिलांची शाळा सुरू केली, ज्यामुळे महिलांना शिक्षण आणि सक्षमीकरणाची संधी मिळाली असं त्यांनी सांगितले.

तर अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टने हा उपक्रम राबवून महिलांना प्रेरणा देण्याचा आणि त्यांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमातून महिलांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळाले असून, समाजात सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा मिळाली आहे असं प्रवीण काकडे यांनी म्हटलं.

दरम्यान, या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त विश्वास मोटे, क्रुगर व्हेंटिलेशन कंपनीचे जनरल मॅनेजर संपतराव शेडगे, म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी शंकरराव विरकर आणि ठाणे पोलीस इन्स्पेक्टर सोमनाथ कर्णवर उपस्थित होते. याशिवाय ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे राष्ट्रीय सचिव बी. डी. मोटे, गोवा प्रदेशाध्यक्ष मनीष लाबोर, उद्योगपती अशोक मोटे, वनविभागाचे अधिकारी संजय वाघमोडे आणि बँकेचे संचालक बाळासाहेब पुकळे यांनीही आपले विचार मांडले. त्यांनी अहिल्यादेवींच्या कार्याला उजाळा देताना महिलांच्या सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.