शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

गावठाण विस्ताराच्या मुद्द्यावर प्रकल्पग्रस्त आक्रमक; ५० वर्षांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लावण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 2:42 AM

नवी मुंबई : राज्य सरकारने सिडकोच्या माध्यमातून येथील शेतजमिनी संपादित केल्या. या संपादन प्रक्रियेतून मूळ गावठाणातील जमिनी वगळण्यात आल्या. त्यानंतर नियमानुसार टप्प्याटप्प्याने गावठाण विस्तार करणे गरजेचे होते; परंतु मागील ५० वर्षांत गावठाणांचा विस्तार करण्यात आला नाही, त्यामुळे गरजेपोटीच्या बांधकामांचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार विकसित ...

नवी मुंबई : राज्य सरकारने सिडकोच्या माध्यमातून येथील शेतजमिनी संपादित केल्या. या संपादन प्रक्रियेतून मूळ गावठाणातील जमिनी वगळण्यात आल्या. त्यानंतर नियमानुसार टप्प्याटप्प्याने गावठाण विस्तार करणे गरजेचे होते; परंतु मागील ५० वर्षांत गावठाणांचा विस्तार करण्यात आला नाही, त्यामुळे गरजेपोटीच्या बांधकामांचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार विकसित झालेली बांधकामे गावठाण विस्तार योजनेखाली आरक्षित करून त्यांचा मूळ गावठाणात समावेश करावा, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. प्रकाशझोत सामाजिक संस्थेने या संदर्भात ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.सरकारने नवी मुंबईतील २६ गावांच्या जमिनी संपादित केल्या. मूळ गावठाणाबाहेरील बहुतांशी शेतजमिनी संपादित झाल्याने येथील प्रकल्पग्रस्तांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झाले नाही. दरम्यान, मागील ५० वर्षांत प्रकल्पग्रस्तांची कुटुंबे वाढली, लोकसंख्येत नैसर्गिक वाढ झाली, त्यामुळे अनेकांनी मूळ गावठाणाच्या बाहेरील सिडकोने संपादित केलेल्या; परंतु मूळ मालकी असलेल्या जागांवर बांधकामे उभारली. त्यामुळे काही प्रमाणात या प्रकल्पग्रस्तांच्या निवासाचा आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला. असे असले तरी मूळ गावठाणाबाहेर गरजेपोटी उभारलेल्या बांधकामांवर कारवाईचे सावट निर्माण झाले आहे. ही बांधकामे नियमित करण्यासाठी गावठाण विस्तार करणे हा एकमेव कायदेशीर पर्याय असल्याचे प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे आहे. प्रकल्पग्रस्तांनी मूळ गावठाणाबाहेर गरजेपोटी बांधलेली बांधकामे विस्तारित गावठाणाचे सीमांकन करून मूळ गावठाणात अंतर्भूत करणे गरजेचे असून, यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी प्रकाशझोत संस्थेचे अध्यक्ष विकास पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई