शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

सीआरझेड क्षेत्रात बालाजी मंदिर बांधण्यास मनाई करा; नवी मुंबईतील पर्यावरणप्रेमींचे चंद्राबाबू नायडूंना पत्र

By नारायण जाधव | Updated: June 13, 2024 17:59 IST

सीआरझेड क्षेत्रात बांधण्यात येत असलेल्या या मंदिराबाबत चिंता व्यक्त करून पर्यावरणवाद्यांनी चंद्राबाबू नायडू यांना तातडीने ई-मेल पाठवले आहे.

नारायण जाधव, नवी मुंबई : आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी चंद्राबाबू नायडू यांनी पदभार स्वीकारताच, नवी मुंबईतील पर्यावरणप्रेमींनी त्यांना पत्र लिहून येथील उवले येथे पूरप्रवण व सीआरझेड क्षेत्रात तिरुपती बालाजी मंदिर बांधण्यास मनाई संबंधित देवस्थानला मनाई करावी, असे साकडे घातले आहे. सीआरझेड क्षेत्रात बांधण्यात येत असलेल्या या मंदिराबाबत चिंता व्यक्त करून पर्यावरणवाद्यांनी चंद्राबाबू नायडू यांना तातडीने ई-मेल पाठवले आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानमचे मंदिर प्रशासन आंध्र प्रदेश सरकारच्या अखत्यारीत येते. यामुळे नायडू या पत्रावर काय भूमिका घेतात, याकडे पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे. सिडकोने अटल सेतूसाठीच्या कास्टिंग यार्डसाठी तात्पुरत्या दिलेल्या ४० हजार चौरस मीटरचा भूखंडाच्या काही क्षेत्रावर हे मंदिर बांधण्यात येत आहे, पूर्वी हा परिसर मासेमारी क्षेत्र होता.

नायडूंना पाठवलेल्या ई-मेलमध्ये, नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी सीआरझेड क्षेत्रात बांधण्यात येत असलेल्या तिरुपती बालाजी मंदिराच्या बांधकामाबाबत आश्चर्य व्यक्त करून एकीकडे जगभर समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे किनारी भागांना धोका निर्माण झाला आहे, अशा वेळी अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर एखादे मोठे मंदिर बांधणे शहाणपणाचे आहे का? असा प्रश्न केला आहे. मंदिराच्या जागेची उंची वाढवण्यासाठी भराव केला तरी आजूबाजूचा परिसर बुडून जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

मंदिराची जागा अत्यंत पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र आहे आणि पूररेषा त्या जागेतून कापली जाते. कुमार यांनी तेलगू देसम पक्षाचे प्रवक्ते नीलयपालम विजयकुमार यांच्या ऑगस्ट २०२१ मध्ये मंदिराच्या प्रकल्पात घाई केल्याबद्दल तत्कालीन राज्य सरकारची निंदा करणाऱ्या बातमीकडेही नायडू यांचे लक्ष वेधले आहे.

मंदिरासाठी इतरत्र भूखंड शोधामंदिराच्या बांधकामास विरोध नाही; परंतु नवी मुंबईतच जिथे जमिनीची कमतरता नाही, अशा पर्यावरणदृष्ट्या सुरक्षित भागात पूजास्थळ बांधावे, अशी सूचना केली आहे. कास्टिंग यार्डच्या बांधकामापूर्वी स्थानिक मासेमारी समुदाय येथे त्यांचे कार्य करत होते, असे सागरी शक्तीसह महाराष्ट्र लघु पारंपरिक मासे कामगार संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार पवार यांनी सांगितले. दरम्यान, नॅटकनेक्टने मंदिराच्या भूखंड वाटपाला आव्हान देणारा अर्ज यापूर्वीच राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे (एनजीटी) दाखल केला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई