शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

विज्ञान, तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतीसह उद्योगांना गती- केंद्रीय खाद्य उद्योगमंत्र्यांचं प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 11:37 PM

भारतातील शेतकरी आता पारंपरिक पद्धतीने शेती न करता तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा आधार घेत शेती करीत आहेत.

नवी मुंबई : भारतातील शेतकरी आता पारंपरिक पद्धतीने शेती न करता तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा आधार घेत शेती करीत आहेत. यामुळे शेती उत्पादनात वाढ होण्याबरोबरच शेती आणि त्यावर आधारित सर्व उद्योगांचा विकास झाला आहे. तंत्रज्ञानामुळे भारतातील सर्वच क्षेत्रातील उद्योग आणि व्यवसायाला गती मिळत असून, भारताच्या दृष्टीने क्र ांतिकारी बदल असल्याचे प्रतिपादन केंद्रीय खाद्य प्रसंस्कारण उद्योगमंत्री हरिसमरत कौर बादल यांनी केले. १९ व्या जागतिक फूड परिषदेचा उद्घाटन सोहळा बुधवार, २४ आॅक्टोबर रोजी वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात पार पडला, त्या वेळी त्या बोलत होत्या.भारताची लोकसंख्या युरोपच्या लोकसंख्येपेक्षा दुप्पट असतानाही आपल्या देशातील सर्व लोकांची अन्नाची गरज भागविण्याची क्षमता आपल्या शेतकऱ्यांमध्ये असल्याचे सांगत, दूध उत्पादनात भारताचा जगात पहिला क्र मांक लागत असून फळे, भाज्या, मांस, मासे उत्पादनात भारताचा दुसरा क्र मांक लागत आल्याचे मंत्री हरिसमरत कौर बादल यांनी सांगितले. भारताच्या शेतकºयांची अन्नधान्य उत्पादनाची खूप मोठी क्षमता आहे; परंतु देशातील अनेक लोकांना पोटभर अन्न मिळत नसून, हे दुर्भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले.अन्नधान्य साठविण्यासाठी लागणारी साधन सामुग्री, वाहतूक अशा अनेक गोष्टींची असलेली कमतरता यामुळेच अन्नाचा अपव्यय होत असल्याचे त्यांनी सांगितले. इतर देशांकडून असे तंत्रज्ञान शिकण्याचा प्रयत्न केला तर अन्नाचा अपव्यय होणार नाही आणि भारत देश अन्नधान्याची फॅक्ट्री म्हणून नावारूपाला येईल, असे त्या म्हणाल्या. या उद्घाटन समारंभाला आययूओपीएसटीचे अध्यक्ष डॉ. डित्रीच नॉर, आययूएफओएसटी २०१८ चे संयोजक डॉ. व्ही. प्रकाश, जगदीश पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.