शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

शहरात धोकादायक वृक्षांचा प्रश्न गंभीर, १८ वृक्ष कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 02:09 IST

१८ वृक्ष कोसळले : पावसाळ्यात गंभीर अपघात होण्याचीही शक्यता

नवी मुंबई : शहरात धोकादायक वृक्षांचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाऊस सुरू होताच तीन दिवसांमध्ये तब्बल १९ वृक्ष कोसळले आहेत. पावसाळ्यामध्ये रोडवर वृक्ष कोसळून गंभीर अपघात होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये उंच वाढलेल्या व दोन ते तीन दशकांपूर्वी लागवड केलेले वृक्ष कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.

पाऊस सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी दहा ठिकाणी वृक्ष कोसळले. सर्वाधिक सहा घटना नेरुळ परिसरामधील होत्या. तीन दिवसांमध्ये वृक्ष कोसळण्याचा आकडा १८ वर गेला आहे. रोडवर पडलेल्या वृक्षामुळे वाहतूककोंडी झाली होती. अग्निशमन दल व सामाजिक कार्यकर्त्यांनी तत्काळ रोडवरील वृक्षाच्या फांद्या हटविल्या. अद्याप मुसळधार पाऊस व सोसाट्याचा वारा सुटला नसताना एवढ्या घटना घडल्या असतील तर पुढील तीन महिन्यात १०० पेक्षा जास्त वृक्ष कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.महापालिका प्रशासनाने सर्वेक्षण करून अतिधोकादायक असलेले वृक्ष हटविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे, अन्यथा वृक्ष पादचाऱ्यांवर किंवा वाहनांवर पडून गंभीर अपघात होण्याची भीतीही व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRainपाऊस