शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

कांद्यासह भाजीपाल्याचे दर नियंत्रणात, एपीएमसीमध्ये आवक वाढली : कोबी, टोमॅटो सामान्यांच्या आवाक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 11:37 IST

vegetables : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा, बटाटासह भाजीपाल्याची आवक वाढल्याने बाजारभाव घसरू लागले आहेत. किरकोळ मार्केटमध्येही भाजीपाल्याचे दर सामान्य नागरिकांच्या आवाक्यात आले आहेत.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा, बटाटासह भाजीपाल्याची आवक वाढल्याने बाजारभाव घसरू लागले आहेत. किरकोळ मार्केटमध्येही भाजीपाल्याचे दर सामान्य नागरिकांच्या आवाक्यात आले आहेत. टोमॅटो ३० रुपये व कोबीसह दुधी भोपळा ४० रुपये किलो दराने विकला जात आहे. बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये मंगळवारी तब्बल ६०४ वाहनांमधून २,७६० टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. आवक समाधानकारक झाली असल्यामुळे सर्वच  वस्तूंचे दर कमी झाले आहेत. शेवगा शेंग व वाटाणा वगळता सर्वच  भाज्यांचे दर शंभरीच्या आतमध्ये आले आहेत. कांदा व बटाट्याचे दरही नियंत्रणात आले असल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. एक आठवड्यापूर्वी होलसेल मार्केटमध्ये कांदा २० ते ३१ रुपये किलो दराने विकला जात होता. मंगळवारी हे दर १५ ते २६ रुपयांवर आले आहेत. बटाट्याचे दर १५ ते २५ वरून १४ ते २२ रुपयांवर आले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये कांदा ४० व बटाटा ३० रुपये किलो दराने विकला जात आहे. कांदा मार्केटचे संचालक अशोक वाळुंज यांनी सांगितले की, चाळीमधील कांदा शेतकऱ्यांनी विकायला काढला आहे. यामुळे आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. एक हजार टनपेक्षा जास्त कांदा व बटाटा विक्रीसाठी येत असल्यामुळे दर नियंत्रणात आले आहेत. 

टॅग्स :vegetableभाज्याInflationमहागाई