शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 02:37 IST

नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरामध्येही उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण होऊ लागले आहेत. वाढत्या उकाड्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून प्रत्येक नागरिकाने आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आपत्कालीन विभागाने केले आहे.

नवी मुंबई - नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरामध्येही उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण होऊ लागले आहेत. वाढत्या उकाड्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून प्रत्येक नागरिकाने आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आपत्कालीन विभागाने केले आहे.शहरामधील तापमान सरासरी ३३ डिग्रीपर्यंत गेले आहे. पुढील एक महिन्यामध्ये त्यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता निर्माण झालीआहे.इमारतींची वाढती संख्या व रोडचेही झालेले काँक्रीटीकरण यामुळे तापमानामध्ये भर पडत आहे. आयटी पार्कसह इतर इमारतींना लावण्यात येणारे काचेचे आवरण यामुळेही तापमान वाढत आहे.उरण परिसरामध्ये कंटेनर यार्डचा परिणाम उष्णता वाढण्यावर होत आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कष्टाची कामे करणारे माथाडी कामगार,घरोघरी जाऊन मार्केटिंगचे काम करणारे कर्मचारी व रोडवर उन्हात उभे राहून नोकरी, व्यवसाय करणाऱ्यांना उन्हाचा त्रास होत आहे. अनेकांना उन्हामुळे चक्कर येण्याच्या घटनाही घडत आहेत. त्वचेचे विकारही होऊ लागले आहेत. उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता असल्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वत:ची काळजी घ्यावी अशा सूचना महापालिका प्रशासनाने केल्या आहेत.उकाड्यापासून वाचण्यासाठी नागरिक उद्यान, मॉल व इतर ठिकाणांचा आश्रय घेत असल्याचे चित्र शहरामध्ये दिसू लागले आहे. दुपारी मॉलमध्ये क्षणभर वातानुकूलित यंत्रणेमध्ये घालविण्यासाठी जाणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. रोडवरील रसवंतीगृहेही नागरिकांना दिलासादायक वाटू लागली आहेत. पुढील एक महिना उष्णतेचा त्रास होणार असून या काळात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काय करावे?तहान लागली नसली तरी जास्त पाणी प्यावेघराबाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट व चपलांचा वापर करण्यात यावाशरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, लस्सी, लिंबू पाणी, ताक याचा नियमित वापर करावापहाटेच्या व सायंकाळच्या वेळेत जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावाउष्माघातापासून वाचण्यासाठी पुढील गोष्टी टाळाव्यादुपारी १२ ते ३.३० या कालावधीमध्ये उन्हात बाहेर जाणे टाळावेगडद, घट्ट व जाड कपडेघालण्याचे टाळावेबाहेर तापमान अधिक असल्यासशारीरिक श्रमाची कामे टाळावीत,लहान मुलांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये

टॅग्स :Heat Strokeउष्माघातTemperatureतापमान