शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

घणसोली, गोठीवलीतील विहिरींची साफस‌फाईच्या अभावी दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 11:22 PM

नवी मुंबईत बेलापूर ते दिघा या एकूण आठ विभागांच्या कार्यक्षेत्रात एकूण ९४ विहिरी आहेत.

नवी मुंबई : पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षपणामुळे घणसोली आणि गोठीवली गावातील विहिरीची अवस्था गंभीर झाली आहे. दुर्गंधीयुक्त आणि घाण पाण्याच्या वासामुळे या गावच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

नवी मुंबईत बेलापूर ते दिघा या एकूण आठ विभागांच्या कार्यक्षेत्रात एकूण ९४ विहिरी आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून विहिरींच्या साफसफाई, दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने, संपूर्ण विहिरींना शेवाळ आणि पानफुटी, तसेच लहान मोठ्या फांद्यांनी विळखा घातलेला आहे. गोठीवली गावच्या विहिरीच्या समस्यांसंदर्भात समाजसेवक दीपक म्हात्रे यांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. 

सोमवारी ता.२८ डिसेंबर रोजी पालिकेच्या रबाले नागरी आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी विहिरींची पाहणी केली. त्याचप्रमाणे, घणसोली बौद्धवाडी येथील तीन बावडी, गुणाले तलावाच्या मध्यभागी असलेली विहीर आणि घणसोली (चिंचआळी ) येथे असलेल्या विहिरींची पार दुर्दशा झालेली आहे. दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच मोठ्या प्रमाणात असूनही, पाणीपुरवठा विभाग विहिरीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. दरम्यान, परिमंडळ २चे उपायुक्त अमरीश पटनिगीरे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आठवडाभर सुट्टीवर असल्याचे सांगितले. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई