शहरं
Join us  
Trending Stories
1
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
2
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
3
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
4
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
5
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
6
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
7
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
8
“जिकडे बॉम्बे असेल तिकडे मुंबई करू, शाळेची नावेही बदलू”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला निर्धार
9
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
10
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
11
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
12
VIDEO : "उपकार विसरू नका! नाहीतर…" बेताल वक्तव्य करणाऱ्या SA कोचला गावसकरांनी दिली ताकीद
13
IND vs SA : अनुभवी फलंदाजांनी पेश केला खास नजराणा; किंग कोहली अन् रोहितसह KL राहुलनं दाखवला क्लास!
14
छेड काढल्याचा आरोप, वैद्यकीय अधिकाऱ्याला नातेवाईकांची मारहाण
15
२४ तासांत ७ स्फोटांनी हादरले बलुचिस्तान! रेल्वे ट्रॅक बॉम्बने उडवला; पोलिस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला
16
गीता जयंती २०२५: सगळी भगवद्गीता नको, सुखी जीवनासाठी ५ उपदेश कायम लक्षात ठेवा; वाचा, गीतासार
17
आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुकल्याला बिबट्या घेऊन गेला, गावात भीतीचे वातावरण...
18
जगाला धक्का! नामिबियात 'एडोल्फ हिटलर' सलग पाचव्यांदा विजयी; वाद वाढताच नेत्याने घेतला मोठा निर्णय...
19
'रनमशिन' कोहलीचा मोठा पराक्रम! क्रिकेटच्या देवाला मागे टाकत बनला वनडेतील शतकांचा 'बादशहा'
20
कॅनडाच्या किनाऱ्यावर 'UFO'? कार्गो जहाजाच्या कॅमेऱ्यात घटना कैद, पाहा VIDEO...
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 06:43 IST

याबाबतचे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी २६ जून २०२५ रोजी पालिका आयुक्त,  जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत. 

नारायण जाधव

नवी मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोग नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदांच्या  निवडणुकीच्या कामाला लागला आहे. यानुसार मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवरील गर्दीला आळा घालण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी एका इमारतीमध्ये १० पेक्षा जास्त मतदान केंद्र ठेवू नये, असे आदेश त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत.

याच अंतर्गत मतदान केंद्राचे ठिकाण निवडताना एका प्रभागातील किंवा गावातील मतदाराला २ किमी. पेक्षा जास्त प्रवास करावा लागू नये अशा रीतीने शक्यतो त्याच प्रभागात किंवा गावात केंद्र असावे. ते मध्यवर्ती ठिकाणी असावे, असेही निर्देश दिले आहेत. याबाबतचे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी २६ जून २०२५ रोजी पालिका आयुक्त,  जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत. 

लोकसभा, विधानसभेला जिथे केले, तिथेच मतदानलोकसभा आणि विधानसभा निवडणुकांकरिता मतदान करताना ज्या मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदार मतदान करतात त्याच इमारतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी देखील मतदान केंद्र असावे. कोणतेही मतदान केंद्र कोणत्याही परिस्थितीत पोलिस स्टेशन, रुग्णालय अथवा धार्मिक स्थळाच्या इमारतीत ठेवता येणार नाही. शिवाय मतदान केंद्र हे शासकीय, धर्मादाय संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इमारतीतच असावे, शक्यतो खासगी इमारतींत ते नसावे, असेही सूचित केले आहे.

गर्दीमुळे होणारा गोंधळ रोखण्यासाठी निर्णयमतदान करताना मतदारांची गर्दी होऊन गोंधळ निर्माण नये, यासाठी मतदान केंद्रनिहाय मतदारांची कमाल संख्या निश्चित केली आहे. यानुसार एक सदस्यीय प्रभाग असलेल्या मुंबई महापालिकेत मतदारांची कमाल संख्या १२०० निश्चित केली आहे. इतर पालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभागात ८०० ते ९००, चार सदस्यीय प्रभागात ७०० ते ८०० इतकी मतदार संख्या असावी असे बजावले आहे. नगरपालिकांसाठीही द्विसदस्यीय ९०० ते १००० आणि त्रिसदस्यीय प्रभागासाठी ७०० ते ८०० संख्या निश्चित केली आहे. शिवाय मतदान केंद्र, मतदारांसाठीच्या  सूचनांसह कायदा व सुव्यवस्थेबाबतच्या नेहमीच्या सूचना कायम ठेवल्या आहेत.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग