चोर्या रोखण्यासाठी पोलीस सरसावले
By Admin | Updated: May 30, 2014 00:30 IST2014-05-30T00:30:28+5:302014-05-30T00:30:28+5:30
सोनसाखळी आणि घरफोडीसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी पनवेल शहर पोलीसांनी कंबर कसली आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी आणि गस्ती वाढविण्यात आल्या आहेत

चोर्या रोखण्यासाठी पोलीस सरसावले
पनवेल : सोनसाखळी आणि घरफोडीसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी पनवेल शहर पोलीसांनी कंबर कसली आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी आणि गस्ती वाढविण्यात आल्या आहेत.त्याचबरोबर शहरात जनजागृतीस सुरूवात केली असून चोरी ट्रेंड कसा आहे याचा अभ्यास करण्यात आला आहे. ठिकठिकाणी पोस्टर्स लावण्याबरोबरच सोसायट्यामध्ये बैठकी घेण्यात येत आहेत.अशा घटनांना पूर्ण आळा घालण्याचा आमचा मानस असल्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक बाजीराव भोसले यांनी सांगितले. या वर्षात पनवेल शहरातील घरफोडया , सोनसाखळी चोरी आणि बतावणी करून करण्यात येणार्या लुटीच्या घटना कमी झाल्या आहेतच. मात्र हे प्रमाण शून्य करण्यासाठी भोसले आणि त्यांच्या सहकार्यांनी संकल्प केला आहे. पोलीस आयुक्त के.एल. प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. असे प्रकार घडू नयेत याकरीता पनवेल शहर पोलीसांकडून दररोज ठाणा नाका, पंचरत्न हॉटेल, बसस्थानक, गार्डन हॉटेल आणि उरण नाका या शहरातून बाहेर पडणार्या नाक्यावर नाका बंदी करण्यात येत आहे. संशयीत वाहनचालकांची कागदपत्रे तपासली जात आहेत. त्याचबरोबर महत्वाच्या ठिकाणी गस्त वाढविण्यात आली असून वेगवेगळे बीट करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे रिक्षामधून घोषणाही सुरू करण्यात आली असून नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी याबाबत माहिती देण्यात येत आहे. इमारतींच्या लिप्टमध्ये पत्र चिकटविण्यात येत आहेत. याशिवाय आम्ही पनवेल नगरपालिकेला पत्र देऊन पदपथ अतिक्रमण मुक्त करण्याच्या सुचना केल्या असल्याचे भोसले यांनी लोकमतला सांगितले. जेणेकरू महिलांना पदपथावरून चालता येईल आणि सोनसाखळी चोरीसारखे प्रकार घडणार नाही. सोनसाखळी चोरीच्या जितक्या घटना घडल्या त्या लग्नसमारंभासारख्या कार्यक्रमावरून येताना महिलांचे दागिने खेचले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार आपला कोणी पाठलाग करतोय काय याची खबरदारी महिलांना घ्यावी आणि त्वरीत नागरिकांना किंवा पोलीसांना सांगावे असे आवाहन पनवेल शहर पोलीसांनी केले आहे. (वार्ताहर)