शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई महापालिकेच्या ४३ शाळांत मुख्याध्यापक नसल्याचे चित्र; आरटीआयअंतर्गत उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 00:23 IST

शिक्षणावर होतोय केवळ १.२ टक्के खर्च

नवी मुंबई : दर्जेदार आणि आधुनिक शिक्षणाचा टेंभा मिरविणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या ४३ शाळांत मुख्याध्यापकच नसल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे. त्याशिवाय शिक्षकांची अपुरी संख्या, वर्गखोल्यांची कमी व इतर साधनसामग्रीचा प्रकर्षाने अभाव असल्याचे महापालिकेने दिलेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे.

समाजसेवक सुधीर दाणी यांनी महापालिकेच्या शाळांची स्थिती, वर्ग खोल्या, विद्यार्थी व शिक्षकांची संख्या तसेच सध्या कार्यरत असलेले मुख्याध्यापक आदींची आरटीआयअंतर्गत माहिती मागितली होती. संबंधित विभागाने दाणी यांना दिलेल्या माहितीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या शैक्षणिक वर्षात शिक्षकांचा पगार, इमारत निर्मित्ती, देखभाल खर्च व विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मोफत शैक्षणिक साहित्यांपोटी २०१९-२० या शैक्षणिक वर्षात ५५ करोड ८२ लाख ४४ हजार १३३ रुपये खर्च केले आहेत.

महापालिकेच्या एकूण अर्थसंकल्पापैकी हे प्रमाण केवळ १.२ टक्के इतके असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या एकूण ७४ शाळा आहेत. यापैकी राज्य शिक्षण मंडळाच्या ७३ तर सीबीएसई बोर्डाची एक शाळा आहे. ४२ मराठी माध्यमाच्या ४२, तर इंग्रजी माध्यमाच्या २० आहेत. हिंदी माध्यमाच्या ९ तर उर्दू माध्यमाच्या २ शाळा आहेत. मराठी माध्यमासाठी एकूण ४६० शिक्षक व शिक्षिका आहेत. यात तर इंग्रजी माध्यमासाठी २०८, हिंदी माध्यमासाठी १५६, तर उर्दू माध्यमासाठी १५ शिक्षक आहेत. विशेष म्हणजे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार ७४ शाळांपैकी तब्बल ४३ शाळांत मुख्याध्यापकाची नियुक्तीच केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यात मराठी माध्यमाच्या २५, इंग्रजी माध्यमाच्या १३, हिंदी माध्यमाच्या ५ शाळेत मुख्याध्यापक नाहीत. उर्दू माध्यमाच्या दोनपैकी एका शाळेत मुख्याध्यापक नाही. एकूणच महापालिकेच्या एकूण शाळांपैकी ३२ शाळांत मुख्याध्यापक कार्यरत आहेत. तर ४३ शाळांत मुख्याध्यापकांची अद्याप नियुक्तीच केली नसल्याचे उघड झाले आहे.

चार हजार कोटी रुपयांचा वार्षिक अर्थसंकल्प असणारी महापालिका शैक्षणिक उपक्रमांवर केवळ १.२ टक्के इतकाच खर्च करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा परिणाम म्हणून महापालिकेच्या शाळांत अत्यावश्यक सुविधांचा अभाव आहे. अनेक शाळांमध्ये स्टाफ रूम व मुख्याध्यापक रूम नाहीत. तर काही शाळांत विज्ञान प्रयोगशाळा नसल्याचे समोर आले आहे. त्याशिवाय शिक्षक वर्गही अपुरा आहे. महापालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांसाठी स्वतंत्र शिक्षक असणे अभिप्रेत आहे. किमान जितके वर्ग तितके शिक्षक असणे गरजेचे आहे. परंतु शिक्षक कमी असल्याने अनेक शाळेत दोन वर्ग एकत्रित भरविले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे दाणी यांनी म्हटले आहे.

दर्जेदार शिक्षणासाठी शिक्षण विभागात ठोस उपाययोजनांची गरज आहे. त्यानुसार पायाभूत सुविधांबरोबरच जितक्या इयत्ता किमान तेवढ्या वर्ग खोल्या, प्रत्येक वर्गाला स्वतंत्र एक शिक्षक, प्रत्येक शाळेला मुख्याध्यापकाची नियुक्ती, गणित, विज्ञान व इंग्रजी या महत्त्वाच्या विषयांसाठी तज्ज्ञ शिक्षकांची नियुक्ती तसेच एकूण अर्थसंकल्पाच्या ६ टक्के निधी केवळ शिक्षणावर खर्च करणे अपेक्षित आहे. - सुधीर लक्ष्मीकांत दाणी, आरटीआय कार्यकर्ता

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाSchoolशाळा