शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

नवी मुंबई महापालिकेच्या ४३ शाळांत मुख्याध्यापक नसल्याचे चित्र; आरटीआयअंतर्गत उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 00:23 IST

शिक्षणावर होतोय केवळ १.२ टक्के खर्च

नवी मुंबई : दर्जेदार आणि आधुनिक शिक्षणाचा टेंभा मिरविणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या ४३ शाळांत मुख्याध्यापकच नसल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे. त्याशिवाय शिक्षकांची अपुरी संख्या, वर्गखोल्यांची कमी व इतर साधनसामग्रीचा प्रकर्षाने अभाव असल्याचे महापालिकेने दिलेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे.

समाजसेवक सुधीर दाणी यांनी महापालिकेच्या शाळांची स्थिती, वर्ग खोल्या, विद्यार्थी व शिक्षकांची संख्या तसेच सध्या कार्यरत असलेले मुख्याध्यापक आदींची आरटीआयअंतर्गत माहिती मागितली होती. संबंधित विभागाने दाणी यांना दिलेल्या माहितीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या शैक्षणिक वर्षात शिक्षकांचा पगार, इमारत निर्मित्ती, देखभाल खर्च व विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मोफत शैक्षणिक साहित्यांपोटी २०१९-२० या शैक्षणिक वर्षात ५५ करोड ८२ लाख ४४ हजार १३३ रुपये खर्च केले आहेत.

महापालिकेच्या एकूण अर्थसंकल्पापैकी हे प्रमाण केवळ १.२ टक्के इतके असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या एकूण ७४ शाळा आहेत. यापैकी राज्य शिक्षण मंडळाच्या ७३ तर सीबीएसई बोर्डाची एक शाळा आहे. ४२ मराठी माध्यमाच्या ४२, तर इंग्रजी माध्यमाच्या २० आहेत. हिंदी माध्यमाच्या ९ तर उर्दू माध्यमाच्या २ शाळा आहेत. मराठी माध्यमासाठी एकूण ४६० शिक्षक व शिक्षिका आहेत. यात तर इंग्रजी माध्यमासाठी २०८, हिंदी माध्यमासाठी १५६, तर उर्दू माध्यमासाठी १५ शिक्षक आहेत. विशेष म्हणजे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार ७४ शाळांपैकी तब्बल ४३ शाळांत मुख्याध्यापकाची नियुक्तीच केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यात मराठी माध्यमाच्या २५, इंग्रजी माध्यमाच्या १३, हिंदी माध्यमाच्या ५ शाळेत मुख्याध्यापक नाहीत. उर्दू माध्यमाच्या दोनपैकी एका शाळेत मुख्याध्यापक नाही. एकूणच महापालिकेच्या एकूण शाळांपैकी ३२ शाळांत मुख्याध्यापक कार्यरत आहेत. तर ४३ शाळांत मुख्याध्यापकांची अद्याप नियुक्तीच केली नसल्याचे उघड झाले आहे.

चार हजार कोटी रुपयांचा वार्षिक अर्थसंकल्प असणारी महापालिका शैक्षणिक उपक्रमांवर केवळ १.२ टक्के इतकाच खर्च करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा परिणाम म्हणून महापालिकेच्या शाळांत अत्यावश्यक सुविधांचा अभाव आहे. अनेक शाळांमध्ये स्टाफ रूम व मुख्याध्यापक रूम नाहीत. तर काही शाळांत विज्ञान प्रयोगशाळा नसल्याचे समोर आले आहे. त्याशिवाय शिक्षक वर्गही अपुरा आहे. महापालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांसाठी स्वतंत्र शिक्षक असणे अभिप्रेत आहे. किमान जितके वर्ग तितके शिक्षक असणे गरजेचे आहे. परंतु शिक्षक कमी असल्याने अनेक शाळेत दोन वर्ग एकत्रित भरविले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे दाणी यांनी म्हटले आहे.

दर्जेदार शिक्षणासाठी शिक्षण विभागात ठोस उपाययोजनांची गरज आहे. त्यानुसार पायाभूत सुविधांबरोबरच जितक्या इयत्ता किमान तेवढ्या वर्ग खोल्या, प्रत्येक वर्गाला स्वतंत्र एक शिक्षक, प्रत्येक शाळेला मुख्याध्यापकाची नियुक्ती, गणित, विज्ञान व इंग्रजी या महत्त्वाच्या विषयांसाठी तज्ज्ञ शिक्षकांची नियुक्ती तसेच एकूण अर्थसंकल्पाच्या ६ टक्के निधी केवळ शिक्षणावर खर्च करणे अपेक्षित आहे. - सुधीर लक्ष्मीकांत दाणी, आरटीआय कार्यकर्ता

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाSchoolशाळा