शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

नागरिकांकडून रेल्वेरूळ ओलांडणे सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 02:24 IST

तुर्भेतील पादचारी पुलाकडे पाठ : भिंतीचे भगदाड बुजवण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

नवी मुंबई : पादचारी पूल असतानाही तुर्भे येथे नागरिकांकडून रेल्वेरूळ ओलांडण्याचा प्रकार सुरूच आहे. चार दिवसांपूर्वीच त्याठिकाणी पालिकेच्या खर्चातून उभारण्यात आलेला पूल पादचाऱ्यांच्या वापरासाठी खुला करण्यात आला आहे. परंतु रेल्वेरुळालगतच्या सुरक्षा भिंतीचे भगदाड बुजवण्याकडे रेल्वे प्रशासनाच्या झालेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा जीवघेणा शॉर्टकट सुरूच असल्याचे दिसून येत आहे.तुर्भे जनता मार्केट येथे रेल्वेरुळावर पालिकेच्या वतीने पादचारी पूल उभारण्यात आला आहे. त्यासाठी सहा कोटी ८४ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. पूलासाठी गेली दहा वर्षापासून लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा सुरू होता. पुलाच्या उभारणीनंतर त्याठिकाणी रेल्वे अपघातांना आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र पुलाच्या उभारणीनंतरही नागरिकांकडून रेल्वेरुळावरील शॉर्टकट मार्गालाच पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे.

तुर्भे नाका व जनता मार्केट या दोन परिसरातील नागरिकांना दोन्ही भागात ये-जा करता यावी यासाठी हा पूल उपयुक्त ठरणार आहे. मात्र सदर ठिकाणी अनेक वर्षांपासूनचा शॉर्टकटचा मार्ग बंद करण्यात रेल्वेप्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. पादचारी पूल उभारणीपूर्वी रूळ ओलांडण्यासाठी जवळचा पर्याय नसल्याने नागरिकांनी रेल्वे रुळाभोवतीची सुरक्षा भिंत पाडून पायवाट तयार केलेली आहे. परंतु पूल उभारल्यानंतर ही पायवाट बंद केली जाणे आवश्यक असतानाही ती बंद करण्यात आलेली नाही. यामुळे पुलावरून चालत जाण्याऐवजी रूळ ओलांडून प्रवास करण्याकडेच काही नागरिकांचा कल दिसून येत आहे. यामध्ये त्यांच्या जीविताला धोका उद्भवत आहे.ठाणे-बेलापूर मार्गाकडील रेल्वेच्या सुरक्षा भिंतीतून आतमध्ये रिक्षा देखील नेल्या जात आहेत. रुळालगतच्या भागात अशा प्रकारे वाहने नेली जात असल्याने भविष्यात रेल्वेच्या दुर्घटनेची देखील शक्यता नाकारता येत नाही. मात्र संपूर्ण प्रकार नजरेसमोर असतानाही रेल्वे प्रशासनाकडून कोणतेच ठोस पाऊल उचलले जात नसल्याचेही आश्चर्य व्यक्त होत आहे. त्याठिकाणी रूळ ओलांडणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू केल्यास तसेच भिंतीचे भगदाड बुजवल्यास पादचाºयांकडून पुलाचा वापर होऊ शकतो. त्याकरिता पुलावर अनधिकृत फेरीवाले ठाण मांडून बसणार नाहीत याचीही खबरदारी घेतली जाणे गरजेचे झाले आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेNavi Mumbaiनवी मुंबई