शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांकडून रेल्वेरूळ ओलांडणे सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 02:24 IST

तुर्भेतील पादचारी पुलाकडे पाठ : भिंतीचे भगदाड बुजवण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

नवी मुंबई : पादचारी पूल असतानाही तुर्भे येथे नागरिकांकडून रेल्वेरूळ ओलांडण्याचा प्रकार सुरूच आहे. चार दिवसांपूर्वीच त्याठिकाणी पालिकेच्या खर्चातून उभारण्यात आलेला पूल पादचाऱ्यांच्या वापरासाठी खुला करण्यात आला आहे. परंतु रेल्वेरुळालगतच्या सुरक्षा भिंतीचे भगदाड बुजवण्याकडे रेल्वे प्रशासनाच्या झालेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा जीवघेणा शॉर्टकट सुरूच असल्याचे दिसून येत आहे.तुर्भे जनता मार्केट येथे रेल्वेरुळावर पालिकेच्या वतीने पादचारी पूल उभारण्यात आला आहे. त्यासाठी सहा कोटी ८४ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. पूलासाठी गेली दहा वर्षापासून लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा सुरू होता. पुलाच्या उभारणीनंतर त्याठिकाणी रेल्वे अपघातांना आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र पुलाच्या उभारणीनंतरही नागरिकांकडून रेल्वेरुळावरील शॉर्टकट मार्गालाच पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे.

तुर्भे नाका व जनता मार्केट या दोन परिसरातील नागरिकांना दोन्ही भागात ये-जा करता यावी यासाठी हा पूल उपयुक्त ठरणार आहे. मात्र सदर ठिकाणी अनेक वर्षांपासूनचा शॉर्टकटचा मार्ग बंद करण्यात रेल्वेप्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. पादचारी पूल उभारणीपूर्वी रूळ ओलांडण्यासाठी जवळचा पर्याय नसल्याने नागरिकांनी रेल्वे रुळाभोवतीची सुरक्षा भिंत पाडून पायवाट तयार केलेली आहे. परंतु पूल उभारल्यानंतर ही पायवाट बंद केली जाणे आवश्यक असतानाही ती बंद करण्यात आलेली नाही. यामुळे पुलावरून चालत जाण्याऐवजी रूळ ओलांडून प्रवास करण्याकडेच काही नागरिकांचा कल दिसून येत आहे. यामध्ये त्यांच्या जीविताला धोका उद्भवत आहे.ठाणे-बेलापूर मार्गाकडील रेल्वेच्या सुरक्षा भिंतीतून आतमध्ये रिक्षा देखील नेल्या जात आहेत. रुळालगतच्या भागात अशा प्रकारे वाहने नेली जात असल्याने भविष्यात रेल्वेच्या दुर्घटनेची देखील शक्यता नाकारता येत नाही. मात्र संपूर्ण प्रकार नजरेसमोर असतानाही रेल्वे प्रशासनाकडून कोणतेच ठोस पाऊल उचलले जात नसल्याचेही आश्चर्य व्यक्त होत आहे. त्याठिकाणी रूळ ओलांडणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू केल्यास तसेच भिंतीचे भगदाड बुजवल्यास पादचाºयांकडून पुलाचा वापर होऊ शकतो. त्याकरिता पुलावर अनधिकृत फेरीवाले ठाण मांडून बसणार नाहीत याचीही खबरदारी घेतली जाणे गरजेचे झाले आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेNavi Mumbaiनवी मुंबई