शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
3
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
4
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
5
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
6
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
7
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
8
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
9
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
10
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
11
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
12
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
13
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
14
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
15
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
16
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
17
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
18
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
19
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
20
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या

रखडलेल्या जलवाहतुकीवर कोस्टल शिपिंग सेलचा उतारा

By नारायण जाधव | Updated: May 16, 2023 20:15 IST

बंदरे, जहाज वाहतूक मंत्रालयांशी समन्वय साधून सवलती मिळविणार

नवी मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील जलवाहतुकीचा १ हजार २०० कोटी रुपयांचा आराखडा ठाणे महापालिकेेने २०१६ मध्ये तयार केला होता; मात्र गेल्या सात वर्षांत काही जेट्टींचे बांधकाम सुरू झाले असून बेलापूर ते गेट-वे ऑफ इंडिया या मार्गावरच वाहतूक सुरू झाली आहे. यामुळे रखडलेल्या या जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी गृह विभागाने ९ मे २०२३ रोजी बंदर विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली कोस्टल शिपिंग सेलची स्थापना केली आहे. हा सेल केंद्रीय बंदरे, जहाज वाहतूक मंत्रालयांशी संपर्क साधून गटांगळ्या खाणाऱ्या जलवाहतुकीस वेग देण्याचा प्रयत्न करणार आहे.या समितीत मरिटाईम बोर्डाचे मुख्याधिकारी, मुख्य बंदर अधिकारी, भारतीय कोस्ट गार्डचे प्रतिनिधी, जलवाहतूकदारांचे प्रतिनिधी आणि बंदर विभागाचे सह सचिव यांचा समावेश आहे.

वास्तविक, वाढत्या वाहतूक समस्येला पर्याय म्हणून स्वस्त आणि पर्यावरण पूरक जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई या शहरांना विस्तीर्ण खाडी आणि समुद्र किनारा लाभला असल्याने केंद्रीय जहाज वाहतूक मंत्रालयाने मुंबई महानगर क्षेत्रातील जलवाहतूक प्रकल्पाची चाचपणी करून त्याचा प्रकल्प अहवाल तयार करण्याची जबाबदारी ठाणे महापालिकेवर सोपविली होती. त्यानुसार ठाणे महापालिकेने सल्लागार नेमून हा प्रकल्प अहवाल तयार केला होता. त्यात प्रकल्पासाठी १९ जेटी अन् ५० बोटींची आवश्यकता असल्याचेही नमूद केले होते. याशिवाय काही मार्ग सुचविले होते.

या मार्गांवर सुरू होती जलवाहतूकवसई, मीरा भाईंदर, घोडबंदर, नागला काल्हेर, अंजूर दिवे, पारसिक, डोंबिवली (ठाकुर्ली) व कल्याण या भागातून ही जलवाहतूक जाणार आहे. याठिकाणी जेटी बांधल्या जाणार आहेत. जलवाहतुकीमुळे रस्ते रहदारीचा सुमारे २० टक्के भार हलका होऊन जलमार्गांचा वापर केल्याने ३३ टक्के इंधन बचत आणि ४२ टक्के प्रदूषणास आळा बसेल असा विश्वास व्यक्त केला होता.

११० कोटींची नेरूळ जेट्टी धूळखात२०१६ पासून आता २०२३ पर्यंत बेलापूर ते गेट-वे ऑफ इंडिया वगळता कोणत्याही मार्गावर जलवाहतूक सुरू झालेली नाही. तर नेरूळ येथे सिडकोने ११० कोटी खर्चून बांधलेली जेट्टी धूळखात पडून असून तिला तडे जाऊ लागले आहेत.

कोस्टल सेल करणार हा अभ्यासआता सात वर्षांनंतर जलवाहतुकीस वेेग देण्याविषयी गृहविभागाला जाग आली आहे. त्यानुसार त्यांनी बंदर विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली कोस्टल सेल स्थापन केला आहे. हा सेल महाराष्ट्रातील कोस्टल शिपिंगचा सद्य:स्थितीचा आढावा घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच देशातील इतर किनारी राज्यातील कोस्टल शिपिंगसाठी अवलंबिण्यात आलेल्या धोरणांचा अभ्यास करणार आहे. शिवाय केंद्र शासनाने कोस्टल शिपिंगला चालना देण्यासाठी जाहीर केलेल्या विविध उपाययोजना/ सवलती यांचा महाराष्ट्र राज्यातील कोस्टल शिपिंगच्या वाढीसाठी कशा प्रकारे वापर करता येईल, याचा अभ्यास करून अधिकच्या उपाययोजना / सवलती कशा मिळविता येतील, याचा अहवाल तयार करून त्यानुसार केंद्रीय बंदरे, जहाज वाहतूक मंत्रालयांशी संपर्क साधून त्या मिळविण्याची जबाबदारी या कोस्टलवर सोपविली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई