शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भाजप संघटन पर्वात सहभागी व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 23:44 IST

डॉ. अरुण चतुर्वेदी : पनवेलमध्ये पत्रकार परिषद

पनवेल : राष्ट्रभावना, संघटन आणि देशाच्या विकासासाठी सदैव कार्यरत असलेली भारतीय जनता पार्टी हे एक देशाची सेवा करणारे कुटुंब आहे. या कुटुंबातील सदस्य होऊन देशाच्या विकासात योगदान द्यावे, त्यासाठी ‘भाजप संघटन पर्व २०१९’ हे अभियान राबविण्यात येत असून, जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय सदस्य सहप्रमुख डॉ. अरुण चतुर्वेदी यांनी येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केले.

परिषदेस महाराष्ट्र प्रदेश सचिव व महाराष्ट्र अभियानप्रमुख संजय उपाध्याय, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा संघटन सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन, उपमहापौर विक्रांत पाटील, विधानसभा विस्तारक अविनाश कोळी आदी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश, त्या अनुषंगाने सदस्य संख्येत वाढ करण्याचा संकल्प संघटन पर्वाच्या माध्यमातून करण्यात आला असून, राज्यातून ५० लाख सदस्य करण्याचा संकल्प करण्यात आल्याची माहिती चतुर्वेदी यांनी दिली. ज्या ठिकाणी संघटन कमकुवत आहे, तिथे विशेष लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले.