शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात काय?; कारण अद्यापही गुलदस्त्यात
2
रस्ते बंद केले, नेत्यांची धरपकड केली, कार्यकर्त्यांना डांबले तरीही ‘मराठी’ ताकद रस्त्यावर दिसली
3
महामुंबई तापाने फणफणली! खोकून खोकून घसा लाल, ताप-सर्दीची लागण झपाट्याने वाढतेय
4
विधानमंडळ सचिव भोळे यांचे पंख छाटले; अन्य ३ सचिवांना सभापतींनी दिल्या जबाबदाऱ्या
5
बेकायदा लाऊडस्पीकर रोखल्याचा दावा; सरकारवर अवमानाची कारवाई करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
विमानांचे वाढते तिकीट दर नियंत्रित करणार; डीजीसीएनं लोकलेखा समितीच्या बैठकीत दिली हमी
7
लाखभर शाळांचे शाळाबाह्य मूल्यांकन ३१ जुलैपर्यंत; ‘पीएम श्री’ शाळांचाही समावेश
8
संविधान हे देशातील रक्तविरहित क्रांतीचे शस्त्र; सरन्यायाधीश गवई यांचा महाराष्ट्र विधिमंडळातर्फे सत्कार
9
‘एक्स’वर ७० रुपयांत जेवण, स्टेशनवर ‘ढूंढते रह जाओंगे’; रेल्वेची करामत, प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर 
10
टेनिस बॉल क्रिकेटमुळे होणार दादोजी कोंडदेव स्टेडियम ‘बोल्ड’; सीझन बॉल स्पर्धेलाच मैदान देणार
11
कुजबुज! रामदास आठवलेंच्या भूमिकेत एकनाथ शिंदे, गवईंच्या सत्कार सोहळ्यात सगळे हसले
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

पाण्यावरून पनवेलचे राजकारण तापणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 00:27 IST

महासभेत उमटणार पडसाद; विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत

- वैभव गायकर पनवेल : महापालिकेने गुरुवारपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयावरून पनवेलमधील राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विरोधकांनी या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, दिवसाआड पाणी देण्याच्या निर्णयावरून सत्ताधारी भाजपाची कोंडी करण्याची तयारी चालविली आहे.मागील वर्षी तत्कालीन आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनीदेखील अशाच प्रकारचा निर्णय घेतला होता. त्या वेळी भाजपाने या निर्णयाला विरोध करत हा निर्णय मागे घेण्यास पालिका प्रशासनाला भाग पाडले होते. त्यानंतर शहरात प्रचंड पाणीसमस्या उद्भवली होती. यावर्षी सत्ताधारी भाजपाने अद्याप या निर्णयाला विरोध केला नसल्याने सर्वपक्षीय भाजपाविरोधात बंड पुकारण्याच्या तयारीत आहेत.पनवेल शहराला ३० एमएलडी पाण्याची गरज दररोज भासत असते. मात्र, प्रत्यक्षात २० एमएलडी पाण्यावर पनवेलकरांना आपली तहान भागवावी लागते. पालिका दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेत असेल, तर नागरिकांमध्येही या बाबत प्रचंड नाराजी आहे.विशेष म्हणजे, पनवेल परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. मात्र, आप्पासाहेब वेदक (देहरंग) धरणाची साठवणूक क्षमता गाळामुळे अपुरी असल्याने पाण्याचा अपव्ययच होत असल्याने पनवेलकरांना पाणीबाणीला सामोरे जावे लागत आहे. पालिका हद्दीतील २९ गावांमध्ये देखील पाण्याची समस्या गंभीर आहे.शहरी भागासह ग्रामीण भागात देखील पाणीपुरवठ्याबाबत पालिकेला ठोस उपाययोजना राबवावी लागणार आहे. विशेष म्हणजे, आगामी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पाणीपुरवठ्याचा विषय चांगलाच गाजणार आहे. भाजपाने महापालिकेच्या स्थापनेपूर्वी दिलेल्या २४ तास पाणीपुरवठ्याचा मुद्दा विरोधक वारंवार उपस्थित करत आहेत. पालिकेच्या महासभेतही हा विषय चांगलाच गाजणार आहे.पनवेल शहराला मुबलक पाणीपुरवठा कसा करता येईल, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. एमआयडीसी व एमजेपीकडे तशा प्रकारची बोलणीदेखील सुरू आहेत. अमृत योजनेअंतर्गत २० एमएलडी पाण्याची तरतूद आहे. ज्या तरतुदीची अंमलबजावणी करता येणार आहे का? याची चाचपणीही सुरू आहे.- विक्रांत पाटील, उपमहापौरपालिकेमार्फत उद्भवलेल्या या समस्येला सत्ताधारी जबाबदार आहेत. या संदर्भात ठोस उपाययोजना राबविण्याची गरज आहे. महासभेत या संदर्भात मुद्दा उपस्थित करणार आहोत.- सतीश पाटील, नगरसेवक, रायगड जिल्हाध्यक्षदिवासाआड पाणीपुरवठा हा काय तोडगा असू शकत नाही. पाणीचोरी, टँकर लॉबी यांच्याविरोधात पालिकेने सर्वप्रथम कठोर कारवाई करावी. प्रत्येक वेळेला नागरिकांना वेठीस धरले जात असेल तर आम्ही रस्त्यावर उतरून या निर्णयाचा विरोध करू, पालिकेने हे निर्णय त्वरित मागे घ्यावेत.- रामदास शेवाळे, शिवसेना महानगरप्रमुख, पनवेलदिवसाआड पाणीपुरवठा भाजपाचे अपयश आहे. हा निर्णय घेण्याऐवजी पालिकेने पाण्याचे इतर स्रोत जिवंत करावेत. पालिका क्षेत्रात मोठ्या संख्येने विहीर, तलाव आहेत. त्या पाण्याला कशाप्रकारे वापरात आणता येईल, या बाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.- हरेश केणी, नगरसेवक, शेकाप

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीटंचाईpanvelपनवेलMuncipal Corporationनगर पालिका