शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

पाण्यावरून पनवेलचे राजकारण तापणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 00:27 IST

महासभेत उमटणार पडसाद; विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत

- वैभव गायकर पनवेल : महापालिकेने गुरुवारपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयावरून पनवेलमधील राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विरोधकांनी या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, दिवसाआड पाणी देण्याच्या निर्णयावरून सत्ताधारी भाजपाची कोंडी करण्याची तयारी चालविली आहे.मागील वर्षी तत्कालीन आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनीदेखील अशाच प्रकारचा निर्णय घेतला होता. त्या वेळी भाजपाने या निर्णयाला विरोध करत हा निर्णय मागे घेण्यास पालिका प्रशासनाला भाग पाडले होते. त्यानंतर शहरात प्रचंड पाणीसमस्या उद्भवली होती. यावर्षी सत्ताधारी भाजपाने अद्याप या निर्णयाला विरोध केला नसल्याने सर्वपक्षीय भाजपाविरोधात बंड पुकारण्याच्या तयारीत आहेत.पनवेल शहराला ३० एमएलडी पाण्याची गरज दररोज भासत असते. मात्र, प्रत्यक्षात २० एमएलडी पाण्यावर पनवेलकरांना आपली तहान भागवावी लागते. पालिका दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेत असेल, तर नागरिकांमध्येही या बाबत प्रचंड नाराजी आहे.विशेष म्हणजे, पनवेल परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. मात्र, आप्पासाहेब वेदक (देहरंग) धरणाची साठवणूक क्षमता गाळामुळे अपुरी असल्याने पाण्याचा अपव्ययच होत असल्याने पनवेलकरांना पाणीबाणीला सामोरे जावे लागत आहे. पालिका हद्दीतील २९ गावांमध्ये देखील पाण्याची समस्या गंभीर आहे.शहरी भागासह ग्रामीण भागात देखील पाणीपुरवठ्याबाबत पालिकेला ठोस उपाययोजना राबवावी लागणार आहे. विशेष म्हणजे, आगामी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पाणीपुरवठ्याचा विषय चांगलाच गाजणार आहे. भाजपाने महापालिकेच्या स्थापनेपूर्वी दिलेल्या २४ तास पाणीपुरवठ्याचा मुद्दा विरोधक वारंवार उपस्थित करत आहेत. पालिकेच्या महासभेतही हा विषय चांगलाच गाजणार आहे.पनवेल शहराला मुबलक पाणीपुरवठा कसा करता येईल, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. एमआयडीसी व एमजेपीकडे तशा प्रकारची बोलणीदेखील सुरू आहेत. अमृत योजनेअंतर्गत २० एमएलडी पाण्याची तरतूद आहे. ज्या तरतुदीची अंमलबजावणी करता येणार आहे का? याची चाचपणीही सुरू आहे.- विक्रांत पाटील, उपमहापौरपालिकेमार्फत उद्भवलेल्या या समस्येला सत्ताधारी जबाबदार आहेत. या संदर्भात ठोस उपाययोजना राबविण्याची गरज आहे. महासभेत या संदर्भात मुद्दा उपस्थित करणार आहोत.- सतीश पाटील, नगरसेवक, रायगड जिल्हाध्यक्षदिवासाआड पाणीपुरवठा हा काय तोडगा असू शकत नाही. पाणीचोरी, टँकर लॉबी यांच्याविरोधात पालिकेने सर्वप्रथम कठोर कारवाई करावी. प्रत्येक वेळेला नागरिकांना वेठीस धरले जात असेल तर आम्ही रस्त्यावर उतरून या निर्णयाचा विरोध करू, पालिकेने हे निर्णय त्वरित मागे घ्यावेत.- रामदास शेवाळे, शिवसेना महानगरप्रमुख, पनवेलदिवसाआड पाणीपुरवठा भाजपाचे अपयश आहे. हा निर्णय घेण्याऐवजी पालिकेने पाण्याचे इतर स्रोत जिवंत करावेत. पालिका क्षेत्रात मोठ्या संख्येने विहीर, तलाव आहेत. त्या पाण्याला कशाप्रकारे वापरात आणता येईल, या बाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.- हरेश केणी, नगरसेवक, शेकाप

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीटंचाईpanvelपनवेलMuncipal Corporationनगर पालिका