शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

पनवेल-पंढरपूर प्रवासी रेल्वे सेवा सुरू व्हावी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 7:50 PM

पनवेल-पंढरपूर रेल्वे सेवा सुरू करावी अशी महत्वपूर्ण मागणी पनवेल संघर्ष समितीने रेल्वे मंत्री पियुश गोयल यांना पाठविल्या पत्रातून केली.

पनवेल -महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या पंढरीच्या विठूरायचे दर्शन आणि गळाभेट घेण्यासाठी वैष्णव सदैव व्याकूळ असतात. पनवेल तालुक्यात वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणावर असून त्यांना पंढरपूरला जाण्यासाठी सार्वजनिक प्रवासी व्यवस्था व्हावी म्हणून तात्काळ पनवेल-पंढरपूर रेल्वे सेवा सुरू करावी अशी महत्वपूर्ण मागणी पनवेल संघर्ष समितीने रेल्वे मंत्री पियुश गोयल यांना पाठविल्या पत्रातून केली. यासंदर्भात समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी गोयल यांना ट्व्विट  केले आहे.पनवेल तालुका आणि आजुबाजुच्या परिसरातून लाखो वारकरी वर्षभर पंढरीला जात असतात. राज्य परिवहन मंडळाची प्रवासी सेवा अपुरी आणि सोयीस्कर ठरत नसल्याने व्यापक प्रमाणात पंढरपूरला जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाने व्यवस्था करणे उपयुक्त ठरणार असल्याने वारकरी संप्रदाय, भक्त आणि वैष्णव पंथाची ही फार जुनी मागणी आहे. त्यामुळे रेल्वे मंत्री आणि एक मुंबईकर म्हणून आपण महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताच्या भक्तांची हाक ऐकाल, अशी अपेक्षा कडू यांनी व्यक्त केली आहे. सध्या वारीचे दिवस सुरू झाले आहेत. वर्षानुवर्ष वारी करणारे काही वैष्णव वयोपरत्वे वयोवृध्द झाले आहेत. त्यांचे शरीर थकले असले तरी एकदा डोळे भरून विठूरायाला पाहण्याची आस त्यांना लागून राहिलेली आहे. ही त्यांची मनाची वारी पूर्ण करण्यासाठी पनवेल ते पंढरपूर रेल्वे सेवा अतिशय महत्वाची ठरणार आहे. पनवेल रेल्वे स्टेशनहून दररोज किमान एक हजार भक्त पंधरपूरला निश्चित रेल्वेने जाऊ शकतील. त्याशिवाय वर्षभर या प्रवासी सेवेला उत्तम प्रतिसाद लाभेल, असा विश्वासही गोयल यांना देवून ही सेवा लोकार्पण करण्याची संधी साधावी, अशी विनंती समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीने कांतीलाल कडू यांनी केली आहे. वारीचे दिवस भारलेले असतात. सगळीकडून दिंड्या पंढरीच्या दिशेने कुच करतात. आरोग्य अथवा इतर काही कारणांनी वारीसेवा न करणाऱ्या वैष्णवांच्या मनाला त्यामुळे आघात पोहचतो. मनाला ते सल्य बोचत असते. त्यांच्या मन:स्थितीतीचा विचार करून त्यांना विठूरायाचा चरणस्पर्श व्हावा, वैकुंठरायाच्या मंदिराचे कळस दॄष्टीस पडावे, वैष्णवांची बहीण असलेल्या चंद्रभागेत स्नान करता यावे, ही माफक अपेक्षा ठेवून ते पंढरीच्या वाटेवर डोळे लावून असतात. त्यामुळे या रेल्वे सेवेचा विचार करणे उचित ठरेल, असा दावा कडू यांनी केला आहे.याशिवाय सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या अजमेर येथील शरिफ गरीब नवाज़ बाबा दर्ग्यास भेट देण्यास अथवा आशीर्वाद घेण्यासाठी नागरिक पनवेलहून सतत मिळेल त्या वाहनांतून जात आहेत. त्यांचा सुखरूप आणि सुरक्षित प्रवास व्हावा म्हणून पनवेल ते अजमेर रेल्वे सेवेसाठी त्या मार्गावर प्रवासी सेवा सुरू करून सहकार्य करावे, अशी संयुक्तपणे मागणी कांतीलाल कडू यांनी केली आहे.पनवेल ते पंढरपूर आणि पनवेल ते अजमेर ही महाराष्ट्राच्या जनतेची दोन्ही श्रध्दास्थाने आहेत. अध्यात्मिक विभूती किंवा प्रचिती देणारी पवित्र स्थाने असल्याने रेल्वे मंत्री या नात्याने पनवेलच्या एकात्मिकतेची श्रध्दा अखंडित रहावी यांकरीता दोन्ही मार्गावर पनवेलपासून सार्वजनिक प्रवासी सेवा सुरू करावी अशी कळकळीची मागणी कडू यांनी केली आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेpanvelपनवेलPandharpurपंढरपूर