शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

पनवेल पालिका करणार जप्त प्लास्टिकचे विघटन; दुकानदारांना ३९ लाख ७१ हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:22 IST

सात टनांपेक्षा जास्त प्लास्टिक

- वैभव गायकरपनवेल : महानगरपालिके चे तत्कालीन आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी प्लास्टिकबंदीच्या निर्णयाची घोषणा केली होती. या बंदीनंतर पनवेल महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बाळगणाऱ्या दुकानदार, व्यापाऱ्यांवर कारवाई केली, या वेळी जप्त के लेल्यासुमारे सात टनांपेक्षा जास्त प्लास्टिकचे पालिका व्यवस्थापन करणार आहे.

पालिकेच्या स्थापनेपासून म्हणजेच २०१७ पासून हे प्लास्टिक एकत्रित जप्त करण्यात आले आहे. ऑक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०२० पर्यंत जप्त केलेला सुमारे ७९७२.७ किलोग्रॅम प्लास्टिक शास्त्रोक्त पद्धतीने विघटनासाठी गो ग्रीन इन्वीरोटेक या रायगड जिल्ह्यातील रोहा स्थित कंपनीला देण्यात येणार आहे. प्लास्टिक पिशव्याचे सुमारे ३०० पेक्षा जास्त वर्षे विघटन होत नसल्याने पर्यावरणाला मोठा धोका आहे.

विशेष म्हणजे, प्लास्टिकमधील घातक घटकांपासून कर्करोगासारखे आजार मोठ्या प्रमाणात बळावत आहेत. अशा परिस्थितीत या प्लास्टिकची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेची आहे, याकरिता महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या माध्यमातून सूचित करण्यात आलेल्या रोहा येथील गो ग्रीन इन्विरोटेक कंपनीला हे काम देण्यात आले आहे.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कचºयातून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्याही संबंधित कंपनी वेचून त्यांचे विघटन करणार आहे. पनवेल महानगरपालिका अशा प्लास्टिक पिशव्यांच्या विघटनासाठी संबंधित कंपनीला ठरलेल्या दरानुसार बिल अदा करणार आहे. पनवेल महानगरपालिकेने स्थापनेपासून राबविलेल्या प्लास्टिक पिशव्या विरोधी मोहिमेत मोठ्या प्रमाणात दंडदेखील संबंधित दुकानदार व्यापाºयांकडून वसूल केला आहे. ही रक्कम सुमारे ३९ लाख ७१ हजार २०० रुपये एवढी आहे. या दंडाची रक्कमच या प्लास्टिकच्या योग्य विघटनासाठी संबंधित कंपनीला देण्यात येणार आहे. पालिकेने जप्त केलेल्या प्लास्टिकचे योग्य पद्धतीने विघटन होणे गरजेचे असल्याचे मत आयुक्त गणेश देशमुख यांनी व्यक्त केले.

पनवेल महानगरपालिकेने जप्त केलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांचे योग्य रीतीने विघटन होणे गरजेचे आहे. हे काम गो ग्रीन इन्विरोटेक या कंपनीला दिले आहे. शास्त्रोक्त पद्धतीने प्लास्टिकच्या विघटनामुळे पर्यावरणाची हानी होत नाही.- डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्त आयुक्त, महानगरपालिका, पनवेल

टॅग्स :panvelपनवेलNavi Mumbaiनवी मुंबईMaharashtraमहाराष्ट्र