शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या बसचा भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यू; ट्रॅक्टरवर आदळून ट्रॅव्हल बस खड्ड्यात कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 07:06 IST

पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांचा मोठा अपघात झाला आहे, या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला. ही ट्रॅव्हलर बस पंढरपूरकडे निघाली होती. या बसमधून ५४ वारकरी प्रवास करत होते. या अपघातात ५ जणांचा मृत्यू तर ८ जण गंभीर जखमी आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, ५४ वारकरी पंढरपूरकडे जात होते. रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरुन ट्रॅव्हल्स पंढरपूरच्या दिशेनं जात असताना भीषण अपघात झाला. वारकऱ्यांच्या ट्रॅव्बल्ससमोर एक ट्रॅक्टर जात होता. ट्रॅव्हल्सवरचा चालकाचा ताबा सुटला आणि पुढे जाणाऱ्या ट्रॅक्टरवर ट्रॅव्हल्स जाऊन आदळली. पुढे ट्रॅव्हल्स अनिंयंत्रित होऊन थेट ३० ते ४० फूट खड्ड्यात जाऊन पडली.

या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून  ८ जण गंभीर जखमी आहेत, तर २० ते ३० प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. 

ट्रॅक्टर क्रमांक एम एच 11 बिझेड 2286 वरील चालक तरवेज सलाउद्दीन अहमद (वय 28 वर्ष राहणार उत्तर प्रदेश ) हे मुंबई पुणे महामार्गावर नो एन्ट्री मध्ये पहिल्या लेनने ट्रॅक्टर चालवीत घेऊन जात होते. यावेळी जयश्री ट्रॅव्हल्स बस क्रमांक एम एच 02 एफ जी 9966 चालक संजय पाटील (वय 54 वर्ष) हे आपल्या ताब्यातील बस मुंबई ते पंढरपूर चालवीत घेऊन जात असताना भरधाव वेगाने ओव्हरटेक करण्याचे नादात पुढे जात असलेल्या ट्रॅक्टरला ट्रव्हल बस चालक यांचे बसवरील नियंत्रण सुटून ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार ठोकर मारून अपघात झाला. यावेळी शंभर फूट घासत नेऊन ट्रॅक्टरचे दोन तुकडे होऊन अपघात झाला आहे. या अपघातात ट्रॅक्टर वरील  तरवेज सलाउद्दीन अहमद आणि अनोळखी इसम जागीच मयत झाले. बस ही ट्रॅक्टरला ठोकर मारून डाव्या साईटच्या रेलिंग तोडून 10 ते 15 फूट खाली जाऊन डाव्या बाजूला पलटी झाली. 

टॅग्स :Accidentअपघात