शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

कर्जतमधील पाली-भूतिवली धरण ओव्हरफ्लो

By admin | Updated: July 3, 2017 06:38 IST

तालुक्यातील रेल्वेपट्टा भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पाटबंधारे विभागाने बांधलेला पाली-भूतिवली

लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : तालुक्यातील रेल्वेपट्टा भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पाटबंधारे विभागाने बांधलेला पाली-भूतिवली लघुपाटबंधारे प्रकल्प पूर्ण भरून गेला आहे. धरणाचे कालवे पूर्ण नसल्याने धरणाचे पाणी शेतीसाठी सोडले जात नाही. त्यामुळे हे धरण जुलै महिन्याच्या पहिल्या तारखेला भरून वाहू लागले. सहलीसाठी प्रसिद्ध असलेल्या कर्जत तालुक्यातील या धरणावर मात्र पर्यटकांना पूर्णत: बंदी आहे.नेरळ-कर्जत रस्त्याच्या भिवपुरी रोड गावाच्या समोर पाली भूतिवली धरण असून, २००३मध्ये या धरणाचा मुख्य बांध घातला गेल्यानंतर पावसाळ्यात जलाशयात पाण्याचा साठा झाला होता. त्या वेळी आणि आजपर्यंत धरणाचे पाणी परिसरात असलेल्या ११०० हेक्टर शेतीला सोडण्यासाठी कालवे पाटबंधारे विभागाकडून खोदण्यात आले नाहीत. त्यामुळे धरणाचे पाणी आजतागत शेतीसाठी देण्यात आले नाही. परिणामी, ते पाणी आजही तसेच पडून असते. धरणातील साठून असलेले पाणी मोठ्या प्रमाणात तसेच राहत असल्याने ३५ दशलक्षघन मीटर क्षमता असलेल्या धरणात मोठ्या प्रमाणात पाणी शिल्लक राहते. त्यामुळे या वर्षी पावसाचा जोर चांगला असल्याने अवघ्या दहा दिवसांत धरणाच्या जलाशयाने आपली पातळी गाठली आणि राज्यात कृषी दिन साजरा होत असताना रविवारी सकाळी धरण ओव्हरफ्लो झाले. तो अनुभव धरणाच्या खाली असलेल्या आसल, भूतिवली या गावांतील शेतकरी आणि ग्रामस्थांनी अनुभवला.धरणाच्या सांडव्यातून वाहून जाणारे पाणी पाहण्यासाठी असंख्य लोक जमले होते. त्या वेळी उपस्थित असलेले आरपीआय आठवले गटाचे तालुका उपाध्यक्ष किशोर गायकवाड यांनी आपण पहिल्यांदाच असा धरण भरून वाहताना अनुभव घेतला. त्या वेळी फेसाळते पाणी पाहून त्यात भिजण्याचा अनेकांना उत्साह दिसून आला; पण त्या सर्वांना ग्रामस्थांनी अडविले. कारण, ज्या सांडव्यातून पाणी रविवारी सकाळी खाली कोसळले त्या सांडव्याचे काम पूर्ण झाले नाही. परिणामी, त्या सांडव्याखाली असलेल्या पायऱ्यांवर बसून अनुभवण्यासाठी पर्यटकांना सध्यातरी बंदी आहे. कारण ते काम अपूर्ण असल्याने त्या ठिकाणी पर्यटक आणि वर्षासहलप्रेमींना बंदी आहे. धरणाच्या जलाशयात आजपर्यंत बाहेरून फिरण्यासाठी आलेल्या किमान १० जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे धरणाच्या परिसरात पर्यटकांना बंदी घातली आहे. पाटबंधारे विभागाने आणि नेरळ पोलीस दलाने या ठिकाणी पर्यटनासाठी जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे.पाली-भूतिवली धरणात यापूर्वी अनेक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. ते लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने अशा प्रकारच्या धबधब्यावर जाण्यास बंदी घातली होती. आम्ही पर्यटकांच्या जीविताला असलेला धोका लक्षात घेऊन पाली-भूतिवली धरणाच्या परिसरात जाण्यास बंदी घातली आहे. - विजय जाधव, सहायक पोलीस निरीक्षक, नेरळ पोलीस ठाणे