शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
5
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
6
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
7
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
8
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
9
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
10
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
11
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
12
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
13
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
14
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
15
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
16
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
17
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
18
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
19
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
20
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
Daily Top 2Weekly Top 5

शहरात पुन्हा वाढला कोरोनाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 00:27 IST

साखळी खंडित करण्याचे आव्हान : कोरोनामुक्त झालेल्या परिसरात पुन्हा रुग्ण सापडले

नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : ऑक्टोबरपासून नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली होती. परंतु १ फेब्रुवारीला लोकलसेवा सर्वांसाठी खुली झाली. त्यानंतर कोरोना रुग्णांचा आलेख पुन्हा वाढू लागला आहे. प्रत्येक नोडमध्ये प्रादुर्भाव वाढत असून कोरोनामुक्त झालेल्या इंदिरानगर, चिंचपाडा परिसरामध्येही पुन्हा रुग्ण सापडू लागले आहेत. निष्काळजीपणा करणारांचा फटका सर्व शहरवासीयांना सहन करावा लागत असून नियमांचे काटेकोरपणे पालन न केल्यास परिस्थिती अजून हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नवी मुंबई कोरोनामुक्त करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने ‘ब्रेक द चेन’ व ‘शून्य मृत्यू मोहीम’ सुरू केली होती. जूनमध्ये सुरू झालेल्या अभियानाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला व रुग्णसंख्या कमी होण्यास सुरुवात झाली. सप्टेंबरमध्ये एका महिन्यात १०,३९८ जणांना कोरोनाची लागण झाली होती. ऑक्टोबरमध्ये हे प्रमाण ८,११५ वर आले. नोव्हेंबरमध्ये ३,८०५ व डिसेंबरमध्ये २,७५८ तसेच जानेवारीमध्ये सर्वांत कमी २,०२७ रुग्ण वाढले. फेब्रुवारीच्या २८ दिवसांमध्ये तब्बल २,३०२ रुग्ण वाढले आहेत. मार्चच्या पहिल्या दिवसापासून प्रतिदिन १०० पेक्षा जास्त रुग्ण वाढत आहेत. पहिल्या तीन दिवसांत रुग्ण संख्या ५५४ झाली आहे. रुग्णवाढीचा वेग चिंताजनक असून, महानगरपालिका प्रशासन सतर्क झाले आहे. शहरातील महापालिकेचे एकच कोरोना केअर सेंटर सद्य:स्थितीमध्ये सुरू आहे. प्रशासनाने तुर्भेमधील राधास्वामी सत्संग भवनमधील केंद्र सुरू करण्याच्या हालचालीही सुरू केल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांमध्ये वाढ करण्यात आली  आहे. कोरोना चाचण्यांच्या संख्येमध्येही वाढ करण्यात आली आहे. गत आठवड्यात सरासरी २,४१५ जणांची चाचणी होत होती. बुधवारी ३,०३८ जणांची चाचणी करण्यात आली. आतापर्यंत शहरातील ८ लाख ८४ हजार १०९ जणांची चाचणी करण्यात आली असून, त्यापैकी ५ लाख ८१ हजार ६७५ जणांची आरटीपीसीआर व ३ लाख २ हजार ४३४ जणांची ॲन्टिजेन चाचणी करण्यात आली आहे. आतापर्यंत ६ लाख ७४ हजार ७२० जणांनी क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला आहे. सद्य:स्थितीमध्ये २९ हजार ७८४ जणांचे क्वारंटाईन सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनीही नियमित मास्कचा वापर करावा. वारंवार हात धुणे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. 

इंदिरानगरसह चिंचपाडामध्ये पुन्हा सापडले रुग्णnमहानगरपालिका कार्यक्षेत्रातील इंदिरानगर व चिंचपाडा नागरी आरोग्य केंद्राचा परिसर ‘कोरोनामुक्त’ झाला होता. nइंदिरानगरमध्ये जवळपास १ महिना एकही रुग्ण सापडला नव्हता. परंतु सद्य:स्थितीमध्ये या परिसरातही पुन्हा प्रादुर्भाव सुरू झाला असून तेथे पाच सक्रिय रुग्ण आहेत. nचिंचपाडामध्ये रुग्ण संख्या सातवर गेली आहे. इलठाणपाडा व कातकरीपाडासह सर्व नागरी आरोग्य केंद्रांच्या परिसरात रुग्ण वाढत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या