शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या २६ ठिकाणांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न
3
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
4
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
5
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
6
राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
7
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
8
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
9
शिवाजी साटम यांच्या कमबॅकनंतर पार्थ समथानची CID 2 मधून एक्झिट; म्हणाला, "हे आधीच..."
10
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
11
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
12
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
13
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
14
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
15
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
16
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
17
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
18
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
19
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी

शतकोत्तर परंपरा जपणारी मुंबापुरीतील जुनी मंडळे

By admin | Updated: September 21, 2015 03:08 IST

बाप्पाच्या मिरवणुकीतील ‘गणपती बाप्पा मोरया’ या आवाजाची जागा ‘डीजे’च्या गाण्यांनी घेतली, लेजीमाऐवजी हिंदी गाण्यांवरच्या नाचाला पसंती मिळू लागली़

बाप्पाच्या मिरवणुकीतील ‘गणपती बाप्पा मोरया’ या आवाजाची जागा ‘डीजे’च्या गाण्यांनी घेतली, लेजीमाऐवजी हिंदी गाण्यांवरच्या नाचाला पसंती मिळू लागली़ आपला बाप्पा वेगळा उठून दिसावा म्हणून बाप्पा उंचच उंच होत गेला. भक्तांच्या मनोरंजनाच्या बरोबरीने त्यांना ज्ञान मिळावे यासाठी चलतचित्र, देखाव्यांची स्पर्धा सुरू झाली. काळानुरूप गणेशोत्सव बदलत गेला. नव्या पिढीसमोर आलेल्या गणेशोत्सवात सात्विक, धार्मिक भाव कुठेतरी लुप्त होताना दिसू लागला. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ज्या उद्देशाने गणेशोत्सव सुरू केला त्याचा विसर पडतोय का, असा प्रश्न पडू शकतो. पण गिरगावातील जुनी मंडळे ज्या सार्वजनिक मंडळांनी शंभरी पार केली आहे, ती गणेशोत्सव मंडळे अजूनही पारंपरिक पद्धतीनेच गणेशोत्सव साजरा करतात. केशवजी नाईक चाळ गणेशोत्सव गिरगावातील केशवजी नाईक चाळीत लोकमान्य टिळक यांनी पहिल्या सार्वजनिक गणपतीची स्थापना केली. ‘श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्था, केशवजी नाईक चाळ’ हे मंडळ गणपतीच्या आगमन आणि विसर्जन सोहळ््याची मिरवणूक पालखीतून काढतात. या मिरवणुकीत वाडीतील रहिवासीच ढोल वाजवतात. लेजीमपथकही वाडीतील रहिवाशांचे आहे. पालखी धरणारे अनवाणी येतात़ प्रत्येक पुरुष टोपी घालूनच मिरवणुकीत सहभागी होतो. गणपतीचे पावित्र्य जपण्यासाठी देव्हाऱ्यात प्रवेश करताना अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते. कीर्तन असते. एकादशीच्या दिवशी अखंड नामस्मरण केले जाते़ प्रत्येक घराला एक तासाचा वेळ दिला जातो, अशी माहिती मंडळाचे स्पर्धा समन्वयक दिनेश जोशी यांनी दिली. जितेकरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ठाकूद्वार येथील जितेकरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणेश याग, सहस्त्रावर्तने केली जातात. वाडीतील जुने रहिवासी अनंत चतुर्दशीला आवर्जून विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. या मंडळात पूजेसाठी एका छोट्या गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. तर दुसरी गणेशमूर्ती विविध रूपांत साकारली जाते. गेल्या काही वर्षांपूर्वी मसाल्याचे पदार्थ, कॅडबरी, बॉल बेरिंगचे बॉल अशा विविध जीवनावश्यक वस्तूंचा वापर करून या मंडळातील कार्यकर्तेच गणेशमूर्ती साकारायचे, अशी माहिती मंडळाचे पदाधिकारी मंगेश पिटकर यांनी दिली. धर्मैक्य संरक्षक संस्था, जगन्नाथ चाळ या गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे आगमन पालखीतून होते. एक वर्ष कीर्तन आणि एक वर्ष भजनाचे आयोजन केले जाते. सध्याच्या जीवनशैलीमध्ये कोणालाही वेळ नसतो. नोकरीच्या अनिश्चित वेळामुळे एकत्र भेटता येत नाही. अशावेळी गणेशोत्सवाच्या काळात सर्व मंडळी एकत्र येतात. यासाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. मंडळातील मुलांवर विविध जबाबदाऱ्या दिल्या जातात. सध्या मंडळात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांची ही तिसरी किंवा चौथी पिढी आहे. पूर्वापार चालत आलेली परंपरा जपली जाते. उत्सवात कोणत्याही प्रकारचा अतिरेक केलेला नाही, असे मंडळाचे पदाधिकारी सदानंद खेडेकर यांनी सांगितले. आंबेवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गेल्या १०० वर्षांपासून मूर्तीत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. गणेशोत्सवात आध्यात्मिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक या तीनही गोष्टींचा समावेश आहे. लहान मुलांना, तरुणांना उत्सवात सामाजिक कार्याचे बाळकडू दिले जात असल्याचे मंडळाचे अध्यक्ष दिलीप दळवी यांनी दिली.