शहरं
Join us  
Trending Stories
1
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
2
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
3
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
4
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
5
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
6
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
7
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
8
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
9
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
10
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई
11
मुंबई: ठाकरे गटाच्या पेडणेकर, दुधवडकरांसह आठ जणांची उमेदवारी धोक्यात; प्रभाग आरक्षणाचा फटका
12
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
13
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
14
अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
15
चातुर्मासाची शेवटची संकष्ट चतुर्थी: गणेश कल्याण करेल, शुभ घडेल; पाहा, व्रत विधी-चंद्रोदय वेळ
16
५ राजयोगात संकष्ट चतुर्थी: १० राशींची इच्छा पूर्ण, मान-सन्मान; यश-कीर्ती-लाभ, शुभ-वरदान काळ!
17
VIRAL : गर्लफ्रेंडच्या हातात हात घालून हॉटेल बाहेर आला; पत्नीने बघताच भर रस्त्यात धुतला! व्हिडीओ व्हायरल
18
मलायकाला झालंय तरी काय? अरबाज खानने लेकीला आणलं घरी, अभिनेत्रीने स्टोरी शेअर करत...
19
India Vs China: भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रमुख विकास इंजिन, चीनची वाढ संथ; पाहा काय म्हणाल्या IMF प्रमुख
20
वर्षाला २० लाखाचं पॅकेज, ५ महिन्यापूर्वी केले लव्ह मॅरेज; २८ वर्षीय युवकानं स्वत:ला का संपवलं?

विकासकामांमध्ये पोलिसांचा अडथळा, पदपथांची कामेही अडविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 05:13 IST

वाहतुकीला शिस्त लावण्यास अपयशी ठरलेल्या वाहतूक पोलिसांनी शहरातील विकासकामांना अडथळा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : वाहतुकीला शिस्त लावण्यास अपयशी ठरलेल्या वाहतूक पोलिसांनी शहरातील विकासकामांना अडथळा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. पदपथांची कामेही बंद पाडायला सुरुवात केली आहे. आयुक्त रामास्वामी एन. यांनी याविषयी आयुक्त व उपआयुक्तांकडे नाराजी व्यक्त केली आहे. अशीच स्थिती राहिली तर अडवणूक करणाऱ्या अधिकाºयांची थेट गृहमंत्रालयाकडे तक्रार केली जाणार आहे.नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अनेक ठिकाणी पोलिसांच्या दुर्लक्षामुळे वाहतूककोंडी वाढू लागली आहे. रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा, अवैध प्रवासी वाहतूक व इतर समस्या सोडविण्यास पोलिसांना अपयश येऊ लागले आहे. वाहतुकीला शिस्त लावण्याचे सोडून पोलिसांनी महानगरपालिकेच्या कामांमध्ये अडथळे निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपासून शहरात सुरू असलेली पदपथ दुरुस्ती व इतर कामे अडविली जात आहेत. सानपाडा सेक्टर-३० रेल्वेस्थानकासमोरील पदपथ व गटार दुरुस्तीचे काम तीन वेळा बंद करण्यात आले. ठेकेदाराचे साहित्यही उचलून नेण्यात आले आहे. वाशी, तुर्भे व इतर विभागांमध्येही पदपथांची कामे वाहतूक पोलिसांनी थांबविल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे शहरातील विकासकामे ठप्प झाली आहेत. ज्या कामांमुळे वाहतूककोंडी होत नाही. वाहतुकीवर कोणताही परिणाम होत नाही ती कामे अडविण्याचा अधिकार पोलिसांना दिला कोणी? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पोलिसांच्या मनमानीविषयी नागरिक, ठेकेदार, लोकप्रतिनिधी व पालिकेच्या अधिकाºयांनीही नाराजी व्यक्त केली आहे.बुधवारी आयुक्त रामास्वामी एन. यांनी आढावा बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्येही अभियांत्रिकी विभागाने वाहतूक पोलिसांच्या मनमानीमुळे विकासकामांवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. आयुक्तांनीही याविषयी आश्चर्य व्यक्त केले. ज्या ठिकाणी वाहतुकीमध्ये बदल करायचा आहे. रस्ता बंद करून कामे करायची असल्यास पोलिसांना त्याची माहिती देणे आवश्यक आहे; परंतु पदपथ व गटारांच्या कामासाठी त्यांना माहिती देण्याची आवश्यकता नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. वाहतूक पोलीस उपआयुक्त व पोलीस आयुक्तांशीही फोनवरून याविषयी चर्चा केली आहे. महानगरपालिकेच्या कामामध्ये विनाकारण अडथळा होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पोलीस आयुक्त मनमानी करणाºयांवर काय कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महा पालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जर वाहतूक पोलिसांनी पदपथ व गटारांची कामे अडविली, तर थेट गृहमंत्रालयाकडे संबंधितांची तक्रार केली जाणार आहे.सद्यस्थितीत३६३४ कामे सुरूमहानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये सद्यस्थितीमध्ये ३६३४ कामे सुरू आहेत. यामध्ये २५ लाखांपेक्षा जास्त रकमेची १६३ कामे, ५ ते २५ लाख रुपयांपर्यंतची ३१० कामे, ५ लाखांपेक्षा कमी रकमेची २६४६ व एक लाखपेक्षा कमी रकमेची ५१५ कामे सुरू आहेत. डिसेंबर महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये ३२२ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे. स्थायी समितीमध्ये प्रत्येक आठवड्याला कोट्यवधी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली जात आहे. सर्व कामे पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक आहे. पोलिसांनी अडथळे निर्माण केल्यास कामे वेळेत पूर्ण होणार नाहीत.मनमानीविषयी नाराजीविकासकामांना अडथळा करून मनमानी करणाºया वाहतूक पोलिसांविषयी नाराजी वाढू लागली आहे. सानपाडा रेल्वेस्थानकासमोर ओला-उबेर टॅक्सीच्या अनधिकृत पार्किंगवर तक्रारी करून कारवाई केली जात नाही. दत्तमंदिर रोडवर चुकीच्या दिशेला लावलेले नो पार्किंगचे बोर्ड हलविले जात नाहीत. तुर्भे इंदिरानगर रोडवरील डम्पर पार्किंगविरोधात कारवाई न करणारे पोलीस पदपथ व गटारांची कामे अडवून नक्की काय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा प्रश्नही नागरिक उपस्थित करत आहेत.वाहतूक पोलिसांनी पदपथ व गटारांची कामे अडविल्याचे काही अधिकाºयांनी बैठकीमध्ये निदर्शनास आणून दिले आहे. पदपथ, गटारांची कामे करताना वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होत नाही. यामुळे पोलिसांनी विनाकारण अडवणूक करू नये. यासाठी पोलीस आयुक्त व उपआयुक्तांशी चर्चा केली आहे.- डॉ. रामास्वामी एन.,आयुक्त, महानगरपालिका 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई