शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

विकासकामांमध्ये पोलिसांचा अडथळा, पदपथांची कामेही अडविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 05:13 IST

वाहतुकीला शिस्त लावण्यास अपयशी ठरलेल्या वाहतूक पोलिसांनी शहरातील विकासकामांना अडथळा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : वाहतुकीला शिस्त लावण्यास अपयशी ठरलेल्या वाहतूक पोलिसांनी शहरातील विकासकामांना अडथळा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. पदपथांची कामेही बंद पाडायला सुरुवात केली आहे. आयुक्त रामास्वामी एन. यांनी याविषयी आयुक्त व उपआयुक्तांकडे नाराजी व्यक्त केली आहे. अशीच स्थिती राहिली तर अडवणूक करणाऱ्या अधिकाºयांची थेट गृहमंत्रालयाकडे तक्रार केली जाणार आहे.नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अनेक ठिकाणी पोलिसांच्या दुर्लक्षामुळे वाहतूककोंडी वाढू लागली आहे. रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा, अवैध प्रवासी वाहतूक व इतर समस्या सोडविण्यास पोलिसांना अपयश येऊ लागले आहे. वाहतुकीला शिस्त लावण्याचे सोडून पोलिसांनी महानगरपालिकेच्या कामांमध्ये अडथळे निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपासून शहरात सुरू असलेली पदपथ दुरुस्ती व इतर कामे अडविली जात आहेत. सानपाडा सेक्टर-३० रेल्वेस्थानकासमोरील पदपथ व गटार दुरुस्तीचे काम तीन वेळा बंद करण्यात आले. ठेकेदाराचे साहित्यही उचलून नेण्यात आले आहे. वाशी, तुर्भे व इतर विभागांमध्येही पदपथांची कामे वाहतूक पोलिसांनी थांबविल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे शहरातील विकासकामे ठप्प झाली आहेत. ज्या कामांमुळे वाहतूककोंडी होत नाही. वाहतुकीवर कोणताही परिणाम होत नाही ती कामे अडविण्याचा अधिकार पोलिसांना दिला कोणी? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पोलिसांच्या मनमानीविषयी नागरिक, ठेकेदार, लोकप्रतिनिधी व पालिकेच्या अधिकाºयांनीही नाराजी व्यक्त केली आहे.बुधवारी आयुक्त रामास्वामी एन. यांनी आढावा बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्येही अभियांत्रिकी विभागाने वाहतूक पोलिसांच्या मनमानीमुळे विकासकामांवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. आयुक्तांनीही याविषयी आश्चर्य व्यक्त केले. ज्या ठिकाणी वाहतुकीमध्ये बदल करायचा आहे. रस्ता बंद करून कामे करायची असल्यास पोलिसांना त्याची माहिती देणे आवश्यक आहे; परंतु पदपथ व गटारांच्या कामासाठी त्यांना माहिती देण्याची आवश्यकता नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. वाहतूक पोलीस उपआयुक्त व पोलीस आयुक्तांशीही फोनवरून याविषयी चर्चा केली आहे. महानगरपालिकेच्या कामामध्ये विनाकारण अडथळा होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पोलीस आयुक्त मनमानी करणाºयांवर काय कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महा पालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जर वाहतूक पोलिसांनी पदपथ व गटारांची कामे अडविली, तर थेट गृहमंत्रालयाकडे संबंधितांची तक्रार केली जाणार आहे.सद्यस्थितीत३६३४ कामे सुरूमहानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये सद्यस्थितीमध्ये ३६३४ कामे सुरू आहेत. यामध्ये २५ लाखांपेक्षा जास्त रकमेची १६३ कामे, ५ ते २५ लाख रुपयांपर्यंतची ३१० कामे, ५ लाखांपेक्षा कमी रकमेची २६४६ व एक लाखपेक्षा कमी रकमेची ५१५ कामे सुरू आहेत. डिसेंबर महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये ३२२ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे. स्थायी समितीमध्ये प्रत्येक आठवड्याला कोट्यवधी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली जात आहे. सर्व कामे पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक आहे. पोलिसांनी अडथळे निर्माण केल्यास कामे वेळेत पूर्ण होणार नाहीत.मनमानीविषयी नाराजीविकासकामांना अडथळा करून मनमानी करणाºया वाहतूक पोलिसांविषयी नाराजी वाढू लागली आहे. सानपाडा रेल्वेस्थानकासमोर ओला-उबेर टॅक्सीच्या अनधिकृत पार्किंगवर तक्रारी करून कारवाई केली जात नाही. दत्तमंदिर रोडवर चुकीच्या दिशेला लावलेले नो पार्किंगचे बोर्ड हलविले जात नाहीत. तुर्भे इंदिरानगर रोडवरील डम्पर पार्किंगविरोधात कारवाई न करणारे पोलीस पदपथ व गटारांची कामे अडवून नक्की काय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा प्रश्नही नागरिक उपस्थित करत आहेत.वाहतूक पोलिसांनी पदपथ व गटारांची कामे अडविल्याचे काही अधिकाºयांनी बैठकीमध्ये निदर्शनास आणून दिले आहे. पदपथ, गटारांची कामे करताना वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होत नाही. यामुळे पोलिसांनी विनाकारण अडवणूक करू नये. यासाठी पोलीस आयुक्त व उपआयुक्तांशी चर्चा केली आहे.- डॉ. रामास्वामी एन.,आयुक्त, महानगरपालिका 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई