शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात भिकाऱ्यांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 06:16 IST

प्रशासन हतबल : रेल्वे स्थानकांसह उड्डाणपुलाखालील जागेत वाढते वास्तव्य; ठोस उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी

नवी मुंबई : शहरातील भिकाऱ्यांची वाढती संख्या वाहनचालकांसह सर्वसामान्यांची डोकेदुखी ठरू लागली आहे. महामार्गावरील पुलांखाली तसेच नोडमधील मोकळ्या जागेत त्यांचे टोळ्याटोळ्यांनी वास्तव्य पाहायला मिळत आहे; परंतु मागील काही वर्षांत वाढत चाललेल्या या भिकाºयांवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासन अपयशी ठरताना दिसत आहे.

शहरातील सर्वच नोडमध्ये भिकाºयांचा त्रासदायक वावर वाढला आहे. त्यात व्यावसायिक केंद्र असलेल्या भागांसह रहदारीच्या मार्गांचाही समावेश आहे. सिग्नलवर वाहनांची अडवणूक करून भीक मागितली जात आहे. तर बस थांबे व व्यावसायिक दुकाने असलेल्या परिसरात ग्राहकांसोबत किळसवाणे प्रकार करून भीक मागितली जात आहे. यामुळे भिकारी नजरेस पडल्यास नागरिकांना नाइलाजास्तव मार्ग बदलावा लागत आहे. यामुळे शहरवासीयांवर जणू भिकाºयांची दहशत झाल्याचा भास होत आहे. नोडमध्ये टोळ्याटोळ्यांनी वावरणाºया भिकाºयांमध्ये लहान मुलांसह महिलांचा सर्वाधिक समावेश दिसून येत आहे. त्यापैकी काही महिलांकडे नवजात बालकेही पाहायला मिळत आहेत. रेल्वेस्थानकांच्या प्रवेशद्वारावरही वयस्कर व्यक्ती भीक मागताना आढळून येत आहेत. सकाळच्या वेळी काही व्यक्तींकडून त्यांना त्या ठिकाणी बसवले जात असल्याचेही रेल्वेप्रवाशांच्या पाहणीत आले आहे, त्यामुळे शहरातील भिकाºयांमागे मोठे रॅकेट सक्रिय असल्याची दाट शक्यता आहे. तर पळवलेल्या अल्पवयीन मुलांचाही भीक मागण्यासाठी वापर होत असल्याचाही संशय होता. त्या अनुषंगाने वर्षभरापूर्वी गुन्हे शाखा पोलिसांनी तपासही केला होता; परंतु भिकाºयांमागचे कोडे अद्याप उलगडलेले नाही.

तीन वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी भिकाºयांच्या विरोधात तीव्र मोहीम हाती घेतली होती. सिग्नलच्या ठिकाणी अथवा शहरात भिकारी दिसताच त्यांची धरपकड करून बेगर्स होममध्ये रवानगी केली जात होती. या दरम्यान पोलिसांना भिकाºयांच्या हल्ल्यांनाही सामोरे जावे लागले होते. मात्र, काही महिन्यानंतर पोलिसांकडून ही मोहीम थंडावल्यानंतर पालिका प्रशासनानेही त्यात रुची घेतली नाही. परिणामी, सायन-पनवेल मार्गावरील पुलांखालील जागा, तसेच नोडमधील मोकळ्या जागेवर या भिकाºयांच्या वस्त्या तयार झाल्या आहेत. कोपरखैरणे रेल्वेस्थानकाबाहेर भिकाºयांची संख्या वाढली आहे.

भिकाºयांना हटकण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्याकडून संबंधितांवर हल्लेही होत आहेत. अशाच प्रकारातून सानपाडा येथे दुकानावर दगडफेकीचाही प्रकार घडला होता. सायन-पनवेल मार्गावर सानपाडा येथे पुलाखाली भिकाºयांचे मोठ्या संख्येने वास्तव्य आहे. त्यांच्याकडून रेल्वेस्थानकासमोरील दुकानाबाहेर ग्राहकांची अडवणूक करून भीक मागितली जात होती, यामुळे दुकानदाराने त्यांना हटकल्याचा राग आल्याने भिकाºयांच्या टोळीने हा हल्ला केला होता; परंतु भिकाºयांचे वास्तव्य असलेल्या जागेच्या हद्दीवादात प्रशासनामध्ये जबाबदारी ढकलण्याचे काम होत असल्याने त्यांना आश्रय मिळत आहे. परिणामी, शहरवासीयांना या भिकाºयांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई