शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात भिकाऱ्यांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 06:16 IST

प्रशासन हतबल : रेल्वे स्थानकांसह उड्डाणपुलाखालील जागेत वाढते वास्तव्य; ठोस उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी

नवी मुंबई : शहरातील भिकाऱ्यांची वाढती संख्या वाहनचालकांसह सर्वसामान्यांची डोकेदुखी ठरू लागली आहे. महामार्गावरील पुलांखाली तसेच नोडमधील मोकळ्या जागेत त्यांचे टोळ्याटोळ्यांनी वास्तव्य पाहायला मिळत आहे; परंतु मागील काही वर्षांत वाढत चाललेल्या या भिकाºयांवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासन अपयशी ठरताना दिसत आहे.

शहरातील सर्वच नोडमध्ये भिकाºयांचा त्रासदायक वावर वाढला आहे. त्यात व्यावसायिक केंद्र असलेल्या भागांसह रहदारीच्या मार्गांचाही समावेश आहे. सिग्नलवर वाहनांची अडवणूक करून भीक मागितली जात आहे. तर बस थांबे व व्यावसायिक दुकाने असलेल्या परिसरात ग्राहकांसोबत किळसवाणे प्रकार करून भीक मागितली जात आहे. यामुळे भिकारी नजरेस पडल्यास नागरिकांना नाइलाजास्तव मार्ग बदलावा लागत आहे. यामुळे शहरवासीयांवर जणू भिकाºयांची दहशत झाल्याचा भास होत आहे. नोडमध्ये टोळ्याटोळ्यांनी वावरणाºया भिकाºयांमध्ये लहान मुलांसह महिलांचा सर्वाधिक समावेश दिसून येत आहे. त्यापैकी काही महिलांकडे नवजात बालकेही पाहायला मिळत आहेत. रेल्वेस्थानकांच्या प्रवेशद्वारावरही वयस्कर व्यक्ती भीक मागताना आढळून येत आहेत. सकाळच्या वेळी काही व्यक्तींकडून त्यांना त्या ठिकाणी बसवले जात असल्याचेही रेल्वेप्रवाशांच्या पाहणीत आले आहे, त्यामुळे शहरातील भिकाºयांमागे मोठे रॅकेट सक्रिय असल्याची दाट शक्यता आहे. तर पळवलेल्या अल्पवयीन मुलांचाही भीक मागण्यासाठी वापर होत असल्याचाही संशय होता. त्या अनुषंगाने वर्षभरापूर्वी गुन्हे शाखा पोलिसांनी तपासही केला होता; परंतु भिकाºयांमागचे कोडे अद्याप उलगडलेले नाही.

तीन वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी भिकाºयांच्या विरोधात तीव्र मोहीम हाती घेतली होती. सिग्नलच्या ठिकाणी अथवा शहरात भिकारी दिसताच त्यांची धरपकड करून बेगर्स होममध्ये रवानगी केली जात होती. या दरम्यान पोलिसांना भिकाºयांच्या हल्ल्यांनाही सामोरे जावे लागले होते. मात्र, काही महिन्यानंतर पोलिसांकडून ही मोहीम थंडावल्यानंतर पालिका प्रशासनानेही त्यात रुची घेतली नाही. परिणामी, सायन-पनवेल मार्गावरील पुलांखालील जागा, तसेच नोडमधील मोकळ्या जागेवर या भिकाºयांच्या वस्त्या तयार झाल्या आहेत. कोपरखैरणे रेल्वेस्थानकाबाहेर भिकाºयांची संख्या वाढली आहे.

भिकाºयांना हटकण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्याकडून संबंधितांवर हल्लेही होत आहेत. अशाच प्रकारातून सानपाडा येथे दुकानावर दगडफेकीचाही प्रकार घडला होता. सायन-पनवेल मार्गावर सानपाडा येथे पुलाखाली भिकाºयांचे मोठ्या संख्येने वास्तव्य आहे. त्यांच्याकडून रेल्वेस्थानकासमोरील दुकानाबाहेर ग्राहकांची अडवणूक करून भीक मागितली जात होती, यामुळे दुकानदाराने त्यांना हटकल्याचा राग आल्याने भिकाºयांच्या टोळीने हा हल्ला केला होता; परंतु भिकाºयांचे वास्तव्य असलेल्या जागेच्या हद्दीवादात प्रशासनामध्ये जबाबदारी ढकलण्याचे काम होत असल्याने त्यांना आश्रय मिळत आहे. परिणामी, शहरवासीयांना या भिकाºयांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई