शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आता सीआरझेडची परवानगी न घेता बिनधास्त करा ३०० चौमीपर्यंतची बांधकामे

By नारायण जाधव | Updated: October 20, 2023 18:41 IST

कोकणकिनारपट्टीसह नवी मुंबई, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील मच्छीमार, कोळीवाडे, मूळ गावठाणे आणि सीआरझेड क्षेत्रामध्ये राहणाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा आहे.

नवी मुंबई : सागर किनारा प्राधिकरणाने अर्थात महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ॲथॉरिटीने केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाच्या निर्देशानुसार आता सीआरझेड क्षेत्रात तीनशे चौरस मीटरपर्यंतच्या घराच्या बांधकाम परवानगीचे अधिकार जिल्हाधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांकडे साेपविले आहेत.१८ ऑक्टोबर २०२३ रोजी सागर किनारा प्राधिकरणाने सदस्य सचिव तथा पर्यावरण संचालक अभय पिपंरकर यांच्या सहीने काढलेला हा निर्णय कोकणकिनारपट्टीसह नवी मुंबई, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील मच्छीमार, कोळीवाडे, मूळ गावठाणे आणि सीआरझेड क्षेत्रामध्ये राहणाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा आहे. यामुळे आता राज्याच्या किनारपट्टीवर ३०० चौमीपर्यंत बांधकाम करायचे झाल्यास त्याच्या परवानगीसाठी सीआरझेड प्राधिकरणाकडे जाण्याची गरज भासणार नाही. आपल्या स्थानिक नगरपालिका, महापालिकेसह जिल्हा प्रशासनस्तरावरच ती मिळणार आहे.

देशात समुद्रकिनारी तसेच खाडीकिनाऱ्यासाठी सीआरझेड हा कायदा लागू आहे. या कायद्याअंतर्गत बांधकामे, प्रकल्प तसेच इतर उपक्रम यासंदर्भात नियमावली आहे. १९८१ साली बनलेल्या या कायद्यामध्ये वेळोवेळी बदल झाले आहेत. सरकारने सीआरझेड क्षेत्रातील बांधकामासंदर्भात बांधकामाची मर्यादा नुकतीच पन्नास मीटरपर्यंत कमी केल्याचे जाहीर केली आहे.

समुद्र किनारपट्टी अथवा खाडीपासून पाचशे मीटरपर्यंत कोणतेही बांधकाम अथवा उद्योग करावयाचा असेल तर राज्य व केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाचा ना हरकत दाखला आवश्यक होता. ही प्रक्रिया वेळखाऊ आणि किचकट होती. यामुळे किनारपट्टीवरील विविध गाव, गावठाणांसह कोळीवाड्यातील रहिवासी विविध मच्छीमार व सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधींनी यासंदर्भात सरकारकडे प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी केली होती. अखेर त्यावर सरकारने सकारात्मक विचार करून किनारपट्टीसह सीआरझेड क्षेत्रात येणाऱ्या रहिवाशांसाठी हा दिलासादायक निर्णय घेतला आहे.

साडेबारा टक्केसह मूळ गावठाणांना होणार फायदानवी मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात विस्तीर्ण असा सागरकिनारा, खाडीकिनारा आहे. अख्खे नवी मुंबई शहरच सीआरझेडमध्ये मोडते. येथील प्रकल्पग्रस्तांना सिडकोने दिलेल्या साडेबारा टक्के योजनेच्या भूखंडासह सिडकोचे बहुतेक भूखंड सीआरझेडमध्ये मोडतात. यातील साडेबारा टक्केचे बहुतेक भूखंड हे ३०० चौमीपेक्षा कमी क्षेत्राचे आहेत. तसेच मूळ गावठाणातील ग्रामस्थांची वडिलोपार्जित घरेही त्यापेक्षा कमी क्षेत्रफळावर बांधलेली आहेत. कालौघात यातील अनेक घरे जीर्ण झालेली आहेत. ती तोडून नव्याने बांधायची झाल्यास सीआरझेड प्राधिकरणाची परवानगी लागते. मात्र, आता नव्या नियमानुसार ३०० चौमीपर्यंतच्या क्षेत्रफळावरील घरांना ती लागणार नाही. स्थानिक महापालिका, नगरपालिकेला याचे अधिकार केंद्र आणि राज्य शासनाने या निर्णयाद्वारे दिले आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई