शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

"14 वर्षांचा वनवास जवळपास संपला; साहेब, आता अयोध्येकडे कूच करावं लागेल!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 17:23 IST

आता रामाचा वनवास संपवून साहेब आपल्याला लवकरच अयोध्येकडे कूच करावं लागणार आहे, असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.

नवी मुंबईः 14 वर्षं पूर्ण करून आपण पुढे निघत आहोत. वनवास जवळपास संपल्यात जमा आहे. आता हा रामाचा वनवास संपवून साहेब आपल्याला लवकरच अयोध्येकडे कूच करावं लागणार आहे, असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 14व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात ते बोलत होते. या पक्षाला वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आटोकाट प्रयत्न केले आहेत. 14 वर्षांचा प्रवास हा खाचखळग्यांनी भरलेला जरी असला तरी तो आपण स्वाभिमानानं पार केला आहे. राजसाहेबांची वाणी तलवारीसारखी चालत असते आणि त्या वाणीच्या आदेशानुसार महाराष्ट्र सैनिकानं धारदार कामगिरी करायला हवी, असं आवाहनच बाळा नांदगावकरांनी मनसैनिकांना केलं आहे. 23 जानेवारीला पहिलं महाराष्ट्रातलं आपलं अधिवेशन झालं. 23 जानेवारीला नवीन झेंडा महाराष्ट्राला अर्पण केला.येत्या एप्रिलमध्ये नवी मुंबईत महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत, त्या निवडणुकीत उत्तम कामगिरी करून आपला भगवा झेंडा राज्यभर नेऊ या. गेल्या 14 वर्षांत पक्षाला वाढवण्यासाठी प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांने खूप मेहनत घेतली, ह्यासाठी प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाच मनापासून अभिनंदन करतो. 23 जानेवारी 2020ला मुंबईत पक्षाचं जे पहिलं राज्यव्यापी अधिवेशन झालं, त्या अधिवेशनाच्या नियोजनात आणि त्यानंतरच्या मोर्च्यासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्या प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन करतो, असंही बाळा नांदगावकर म्हणाले आहेत. त्या अधिवेशनानंतर आजतागायत चांगलं वातावरण निर्माण होत आहे. 9 फेब्रुवारीला जो मोर्चा काढला आहे, तो आपण पाहिलेला आहे. त्यानंतर मनसेसाठी चांगलं वातावरण तयार झालेलं आहे. आता आपला प्रवास वेगळ्या दिशेनं सुरू आहे. 

या मेळाव्यास राज्यभरातून सहा हजारांहून अधिक मनसैनिक आलेले आहेत. या वेळी राज ठाकरे यांच्याकडून पक्षाची शॅडो कॅबिनेट जाहीर केली गेली आहे. त्यामध्ये 30 ते 40 जणांचा समावेश आहे. मनसेची ही शॅडो कॅबिनेट सरकारच्या विविध खात्यांवर लक्ष ठेवून राहणार आहे. त्या माध्यमातून सरकारला पावलोपावली कोंडीत पकडण्याचा प्रयत्न यापुढे मनसेचा राहणार असल्याचेही दिसून येत आहे. दरम्यान, वर्धापन दिनाच्या निमित्ताने होत असलेल्या या मेळाव्यामुळे नवी मुंबईच्या मनसैनिकांच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यापैकी अनेक जण पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. शॅडो कॅबिनेटमधल्या गृह, विधी व न्याय, जलसंपदा, सामान्य प्रशासन या विभागांवर बाळा नांदगावकर लक्ष ठेवणार आहेत.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेNavi Mumbaiनवी मुंबईMNSमनसे