शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

"14 वर्षांचा वनवास जवळपास संपला; साहेब, आता अयोध्येकडे कूच करावं लागेल!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 17:23 IST

आता रामाचा वनवास संपवून साहेब आपल्याला लवकरच अयोध्येकडे कूच करावं लागणार आहे, असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.

नवी मुंबईः 14 वर्षं पूर्ण करून आपण पुढे निघत आहोत. वनवास जवळपास संपल्यात जमा आहे. आता हा रामाचा वनवास संपवून साहेब आपल्याला लवकरच अयोध्येकडे कूच करावं लागणार आहे, असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 14व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात ते बोलत होते. या पक्षाला वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आटोकाट प्रयत्न केले आहेत. 14 वर्षांचा प्रवास हा खाचखळग्यांनी भरलेला जरी असला तरी तो आपण स्वाभिमानानं पार केला आहे. राजसाहेबांची वाणी तलवारीसारखी चालत असते आणि त्या वाणीच्या आदेशानुसार महाराष्ट्र सैनिकानं धारदार कामगिरी करायला हवी, असं आवाहनच बाळा नांदगावकरांनी मनसैनिकांना केलं आहे. 23 जानेवारीला पहिलं महाराष्ट्रातलं आपलं अधिवेशन झालं. 23 जानेवारीला नवीन झेंडा महाराष्ट्राला अर्पण केला.येत्या एप्रिलमध्ये नवी मुंबईत महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत, त्या निवडणुकीत उत्तम कामगिरी करून आपला भगवा झेंडा राज्यभर नेऊ या. गेल्या 14 वर्षांत पक्षाला वाढवण्यासाठी प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांने खूप मेहनत घेतली, ह्यासाठी प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाच मनापासून अभिनंदन करतो. 23 जानेवारी 2020ला मुंबईत पक्षाचं जे पहिलं राज्यव्यापी अधिवेशन झालं, त्या अधिवेशनाच्या नियोजनात आणि त्यानंतरच्या मोर्च्यासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्या प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन करतो, असंही बाळा नांदगावकर म्हणाले आहेत. त्या अधिवेशनानंतर आजतागायत चांगलं वातावरण निर्माण होत आहे. 9 फेब्रुवारीला जो मोर्चा काढला आहे, तो आपण पाहिलेला आहे. त्यानंतर मनसेसाठी चांगलं वातावरण तयार झालेलं आहे. आता आपला प्रवास वेगळ्या दिशेनं सुरू आहे. 

या मेळाव्यास राज्यभरातून सहा हजारांहून अधिक मनसैनिक आलेले आहेत. या वेळी राज ठाकरे यांच्याकडून पक्षाची शॅडो कॅबिनेट जाहीर केली गेली आहे. त्यामध्ये 30 ते 40 जणांचा समावेश आहे. मनसेची ही शॅडो कॅबिनेट सरकारच्या विविध खात्यांवर लक्ष ठेवून राहणार आहे. त्या माध्यमातून सरकारला पावलोपावली कोंडीत पकडण्याचा प्रयत्न यापुढे मनसेचा राहणार असल्याचेही दिसून येत आहे. दरम्यान, वर्धापन दिनाच्या निमित्ताने होत असलेल्या या मेळाव्यामुळे नवी मुंबईच्या मनसैनिकांच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यापैकी अनेक जण पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. शॅडो कॅबिनेटमधल्या गृह, विधी व न्याय, जलसंपदा, सामान्य प्रशासन या विभागांवर बाळा नांदगावकर लक्ष ठेवणार आहेत.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेNavi Mumbaiनवी मुंबईMNSमनसे