एनएमएमटीचा प्रवास महागणार

By Admin | Updated: May 12, 2014 05:42 IST2014-05-12T05:42:59+5:302014-05-12T05:42:59+5:30

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच दुसर्‍या दिवसापासून एनएमएमटीचा प्रवास महागणार आहे. परिवहन व्यवस्थापनाच्या तिकिट दरवाढीसंदर्भातील प्रस्तावाला राज्य शासनाने नुकतीची मंजुरी दिली आहे.

NMMT's journey will be expensive | एनएमएमटीचा प्रवास महागणार

एनएमएमटीचा प्रवास महागणार

शनिवारपासून अंमलबजावणी : परिवहन उपक्रमाच्या प्रस्तावाला राज्य शासनाची मंजुरी

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच दुसर्‍या दिवसापासून एनएमएमटीचा प्रवास महागणार आहे. परिवहन व्यवस्थापनाच्या तिकिट दरवाढीसंदर्भातील प्रस्तावाला राज्य शासनाने नुकतीची मंजुरी दिली आहे. त्यामुळे आचारसंहिता संपताच त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. अपुरा कर्मचारीवर्ग व नियोजनशून्य कारभारामुळे नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाला (एनएमएमटी) दरमहा सुमारे अडीच कोटीचा तोटा सहन करावा लागत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी परिवहन व्यवस्थापनाने तिकीट दरात वाढ करण्याचे प्रस्तावित केले होते. सदरचा प्रस्ताव मागील सहा महिन्यांपासून राज्य परिवहन प्राधिकरणाकडे (एमएमआरटीए) मान्यतेसाठी पडून होता. परिवहन प्राधिकरणाने त्यास नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यामुळे येत्या शनिवारपासून त्यावर प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. दरम्यान महापालिका परिवहन उपक्रम आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी, रोजंदारीवर नियुक्त होणारे कर्मचारी यांचे वेतन, महागाई भत्त्यात वाढ, कर्मचारी वार्षिक वेतनवाढ, बसेसकरिता इंधन, सुटे भाग, नवीन टायर्स, तिकिट छपाई, जुने टायर्स रिमोल्डिंग, आॅटो इलेक्ट्रीकल साहित्य, वाहनांचा विमा आणि नूतनीकरण, मार्ग परवाने/नूतनीकरण, विविध प्रकारचे शासकीय कर यावर परिवहन उपक्रमाचा किमान सरासरी मासिक खर्च ९३८.७८ लाख रुपये इतका होत आहे. त्यानुसार प्रति किमी खर्च ४३.४६ रुपये इतका होत आहे. त्यामुळे एनएमएमटी उपक्रमाचा तोटा कमी करण्यासाठी एनएमएमटी बसच्या तिकीट दरात वाढ करणे, प्रशासनास अपरिहार्य ठरले होते. त्या अनुषंगाने तिकिट दरवाढीचा प्रस्ताव परिवहन समितीने व सर्वसाधारण सभेने मंजूर क रून राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठविला होता. त्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने एनएमएमटी उपक्रमाने तिकिट दरवाढीची अंमलबजावणी केली नाही. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच दुसर्‍या दिवशी एनएमएमटीची तिकिट दरवाढ लागू केली जाईल, अशी माहिती परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी दिली आहे. परिवहन उपक्रमाने एनएमएमटीच्या सर्वसाधारण तिकीट दरात २ ते ४ रुपये तर वातानुकूलित एनएमएमटी बसच्या तिकीट दरात ५ ते १० रुपये वाढ केली आहे. त्यामुळे एनएमएमटी बसचे किमान भाडे ५ वरून ७ रुपये तर एसी एनएमएमटी बसचे किमान भाडे १५ वरून २० रुपये होणार आहे. मासिक अडीच कोटींचा तोटा ४परिवहन उपक्रमाला प्रवासी तिकीट, जाहिरात आणि इतर मिळून सरासरी मासिक उत्पन्न ७६४.०३ लाख रुपये मिळत आहे. ४सरासरी मासिक खर्च यांचा ताळमेळ केला असता परिवहन उपक्रमाला सरासरी मासिक तोटा अडीच कोटी रुपये होत आहे. ४प्रति किमी उत्पन्न ३५.३७ रुपये आणि खर्च प्रति किमी ४३.४६ रुपये असल्याने परिवहन उपक्रमास प्रति किलोमीटर ८.०९ रुपये तोटा सहन करावा लागत आहे. ४परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात सध्या डिझेलवर चालणार्‍या १४५ बस, २ मिनि बस, वातानुकूलित व्होल्वो ३० आणि सीएनजीवर चालणार्‍या १६१ अशा एकूण ३३८ बसेस आहेत. ४या बसेसच्या माध्यमातून मुंबई, ठाणे, पनवेल, डोंबिवली, बदलापूर, कल्याण, उरण, खोपोली, मुलुंडसह नवी मुंबई अशा ३३ मार्गांवर प्रवासी सेवा देण्यात येत आहे. ४उपक्रमाने यापूर्वी २५ सप्टेंबर २०१२ रोजी तिकीट दरात वाढ केली होती. त्यावेळी डिझेल ४४.२९ प्रति लिटर तर सीएनजी प्रतिकिलो ३३.४१ रुपये होते. सध्या डिझेल ६७ रुपये तर सीएनजीमध्ये प्रति किलोमागे ६.०३ रुपये वाढ झाली आहे.

Web Title: NMMT's journey will be expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.