शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या केरळ दौऱ्यादरम्यान अपघात; हेलिकॉप्टर उतरताच हेलिपॅड खचले, थोडक्यात टळली दुर्घटना 
2
Ladki Bahin Yojana : खूशखबर! भाऊबीजेआधी लाडक्या बहि‍णींसाठी खास ओवाळणी; ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार?
3
अवघ्या ५ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न, तरुणानं धावत्या ट्रेनसमोर मारली उडी! व्हिडीओत म्हणाला, "सगळ्यांनी ऐका, माझी बायको.."
4
Gold Silver Price Drop: सोन्या चांदीचे दर जोरदार आपटले; ४ वर्षातील सर्वात मोठी घसरण, काय आहे यामागचं कारण
5
आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी, निवडणुकांची चाचपणी
6
का रे दुरावा? सुयश टिळक आणि आयुषी भावेच्या नात्यात बिनसलं, दिवाळीलाही एकत्र दिसलं नाही जोडपं
7
ट्रम्प यांचा PM मोदींशी फोनवरून संवाद; ट्रेडवर चर्चा, रशियन तेल खरेदीसंदर्भा पुन्हा मोठा दावा!
8
"शेजाऱ्यांशी बोलताना मागून ड्रेसला लागली आग, अभिनेत्रीला...", ऐन दिवाळीत घडली दुर्घटना
9
पाकिस्तानच्या थाळीतून टोमॅटो गायब! लाहोर, कराचीत महागाईचा भडका; अफगाणिस्तानने शिकवला 'हा' धडा
10
ट्रम्प-पुतिन भेट रद्द; व्हाईट हाऊसने फेटाळले बुडापेस्ट शिखर परिषदेचे वृत्त
11
आजचे राशीभविष्य : बुधवार २२ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ संभवतो, व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील
12
PM मोदींचा स्वदेशी नारा; जनतेला पत्र; ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ बुलंद करण्यासाठी प्रयत्न करा
13
बाधित क्षेत्र ३ हेक्टर मानून मदत; राज्य सरकारचा निर्णय, पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ
14
दीपिका पादुकोण-रणवीर सिंगने पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा; लाडक्या दुआचे खास फोटो केले शेअर
15
अपात्र लाडक्या बहिणींनी उकळले १६४ कोटी रुपये, १२ हजारांवर पुरूष तर अपात्र महिला ७७ हजार
16
मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात ऐन दिवाळीत पावसाचा बार; पुढील तीन दिवस असेच वातावरण राहणार
17
उमेदवार जाहीर होताच महाआघाडीतील दरी स्पष्ट; राजद, काँग्रेस, डाव्या पक्षांनी केले दुहेरी अर्ज
18
बिहार निवडणूक २०२५: १२१ मतदारसंघांत एकूण १,३१४ उमेदवार; महिला मतदारांच्या आधारे ‘जदयु’ बळकट
19
“महाआघाडीला नव्हे, भाजप जनसुराजला घाबरतेय; आमचे उमेदवार फोडतेय”; प्रशांत किशोर यांचा आरोप
20
...तर H1B व्हिसाधारकांना वाढीव शुल्क लागणार नाही; पण वाढ कायम; ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्टता

दोन दिवसांत नऊ अपघात; पाच जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:31 IST

रस्तासुरक्षा संपताच अपघातांची मालिका सुरूच

नवी मुंबई : शहरात दोन दिवसांत अपघातांच्या नऊ घटना घडल्या आहेत. त्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून ८ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी बहुतांश घटनांमध्ये अपघाताला कारणीभूत चालकांनी पळ काढल्याचे समोर आले आहे.

वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होऊनही चालकांमध्ये शिस्त लागत नसल्याचे समोर येत आहे. यामुळे अपघातांच्या घटना घडत असून त्यात जीवितहानीही होत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांकडून नुकताच रस्ते सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला होता. तो संपताच शहरात पुन्हा अपघातांची मालिका सुरू झाल्याचे दिसून येत आहे.दोन दिवसांत परिमंडळ एक मध्ये अपघातांच्या नऊ घटना घडल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून, ८ जण जखमी झाले आहेत.

सायन-पनवेल मार्गावर वाशीतील जुई पुलावर यापूर्वीही अपघात घडले आहेत. शुक्रवारी पहाटे अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्याशिवाय वाशीतच अज्ञात कारने धडक दिल्याने झालेल्या अपघतातात वैभव महेंकर जखमी झाले. तुर्भे एमआयडीसीत तीन अपघात झाले असून, त्यापैकी एका अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत. निरज दुबे हे दुचाकीवरून जाताना वेगात आलेल्या जेसीबीने एका पादचाऱ्याला ठोकर मारली, त्यानंतर दुबे यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुबे व त्यांचा मित्र प्रभाकर शर्मा खाली पडले.

शर्मा यांच्या अंगावरून जेसीबीचे चाक गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालवणाºया सागर सागरे याने दुसºया दुचाकीला धडक दिल्याने त्यावरील अंकित चौहान यांना दुखापत झाली आहे. तर विरुद्ध दिशेने आलेल्या रिक्षाने ठोकर मारल्याने टोनी व्हिलफर्ड जखमी झाले. सीबीडी येथील उलवे मार्गावरील पुलावर लहू देशमुख यांच्या दुचाकीचा अपघात होऊन ते जखमी झाले आहेत. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पामबीच मार्गावर भरधाव कार अपघातात अजय शहा यांचा मृत्यू झाला. कारचालक स्वप्निल गंगावणे विरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मद्यपान करून कार चालवल्याने ताबा सुटून ती वीजखांबाला धडकल्याने हा अपघात घडला. तर जुईनगर रेल्वेस्थानकाच्या सर्व्हिस रोडवर विद्युत खांबाला दुचाकी धडकून घडलेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.

भरधाव वेग अपघातास कारणीभूत

मागील दोन दिवसांत घडलेल्या अपघातांप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, बहुतांश अपघात हे भरधाव वाहन चालविल्याने झाल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या बहुतांश वाहनचालकानी घटनास्थळावरून पळ काढला आहे. अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत चालकांना मार्गदर्शन करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र अपघातांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.

टॅग्स :AccidentअपघातNavi Mumbaiनवी मुंबई