शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत नऊ अपघात; पाच जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:31 IST

रस्तासुरक्षा संपताच अपघातांची मालिका सुरूच

नवी मुंबई : शहरात दोन दिवसांत अपघातांच्या नऊ घटना घडल्या आहेत. त्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून ८ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी बहुतांश घटनांमध्ये अपघाताला कारणीभूत चालकांनी पळ काढल्याचे समोर आले आहे.

वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होऊनही चालकांमध्ये शिस्त लागत नसल्याचे समोर येत आहे. यामुळे अपघातांच्या घटना घडत असून त्यात जीवितहानीही होत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांकडून नुकताच रस्ते सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला होता. तो संपताच शहरात पुन्हा अपघातांची मालिका सुरू झाल्याचे दिसून येत आहे.दोन दिवसांत परिमंडळ एक मध्ये अपघातांच्या नऊ घटना घडल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून, ८ जण जखमी झाले आहेत.

सायन-पनवेल मार्गावर वाशीतील जुई पुलावर यापूर्वीही अपघात घडले आहेत. शुक्रवारी पहाटे अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्याशिवाय वाशीतच अज्ञात कारने धडक दिल्याने झालेल्या अपघतातात वैभव महेंकर जखमी झाले. तुर्भे एमआयडीसीत तीन अपघात झाले असून, त्यापैकी एका अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत. निरज दुबे हे दुचाकीवरून जाताना वेगात आलेल्या जेसीबीने एका पादचाऱ्याला ठोकर मारली, त्यानंतर दुबे यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुबे व त्यांचा मित्र प्रभाकर शर्मा खाली पडले.

शर्मा यांच्या अंगावरून जेसीबीचे चाक गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालवणाºया सागर सागरे याने दुसºया दुचाकीला धडक दिल्याने त्यावरील अंकित चौहान यांना दुखापत झाली आहे. तर विरुद्ध दिशेने आलेल्या रिक्षाने ठोकर मारल्याने टोनी व्हिलफर्ड जखमी झाले. सीबीडी येथील उलवे मार्गावरील पुलावर लहू देशमुख यांच्या दुचाकीचा अपघात होऊन ते जखमी झाले आहेत. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पामबीच मार्गावर भरधाव कार अपघातात अजय शहा यांचा मृत्यू झाला. कारचालक स्वप्निल गंगावणे विरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मद्यपान करून कार चालवल्याने ताबा सुटून ती वीजखांबाला धडकल्याने हा अपघात घडला. तर जुईनगर रेल्वेस्थानकाच्या सर्व्हिस रोडवर विद्युत खांबाला दुचाकी धडकून घडलेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.

भरधाव वेग अपघातास कारणीभूत

मागील दोन दिवसांत घडलेल्या अपघातांप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, बहुतांश अपघात हे भरधाव वाहन चालविल्याने झाल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या बहुतांश वाहनचालकानी घटनास्थळावरून पळ काढला आहे. अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत चालकांना मार्गदर्शन करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र अपघातांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.

टॅग्स :AccidentअपघातNavi Mumbaiनवी मुंबई