शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

घणसोलीत ९०२४ कोटींचे नवे आयटी पार्क, प्रदूषण नियंत्रण मंडळाचा हिरवा कंदील

By नारायण जाधव | Updated: March 12, 2024 19:00 IST

कंपनी २५०१ काेटी १४ लाखांची गुंतवणूक करणार आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात डेटा सेंटर आणि आयटी पार्कची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, रबाले एमआयडीसीत सावली, घणसोली येथे ९०२३ कोटी ८८ लाख रुपयांची गुंतवणूक असलेले नवे आयटी पार्क उभे राहत आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपल्या २१ व्या संमती समितीच्या बैठकीत या आयटी पार्कला हिरवा कंदील दिला आहे.

एमआयडीसीने त्यासाठी दिलेल्या भूखंडावर सपोर्ट प्रापर्टी प्रा. लिमिटेड ही कंपनी पहिल्या टप्प्यात २,५१,९३४.३० चौ. मीटर क्षेत्राच्या विस्तीर्ण भूखंडावर १, ११, ३४९.०२ चौरस मीटरचे बांधकाम करणार आहे. यासाठी कंपनी २५०१ काेटी १४ लाखांची गुंतवणूक करणार आहे.

डिसेंबर २०२३ मध्ये मिळाली पर्यावरण मंजुरी

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने तर एकूण २,५१, ९३४.३० चौरस क्षेत्रावर हे ५,३७, २३३.९५ चौरस मीटर इतके विस्तीर्ण बांधकामास ११ डिसेंबर २०२३ रोजीच दाखला दिला आहे. त्यानंतर आता राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपल्या २१ व्या बैठकीत संमती दिली आहे.याठिकाणी कंपनी एकूण ९०२३ कोटी ८८ लाख इतकी गुंतवणूक करणार आहे. या आयटी पार्कला पहिल्या टप्प्यात दररोज ३० लाख लीटर पाणी लागणार आहे. तर दररोज २९ लाख लीटर सांडपाणी निर्माण होणार असून, त्यावर प्रक्रियेसाठी १० सीएमडी क्षमतेचे एसटीपी बांधण्यात येणार आहे.

राज्याच्या आयटी पॉलिसीमुळे मिळतेय चालना

महाराष्ट्र शासनाच्या आपल्या २०२३ च्या आयटी पॉलिसीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योग राज्यात यावेत यासाठी भरपूर सवलती दिल्या आहेत. त्यामुळे राज्यात पुणे, नवी मुंबईसारख्या शहरात आयटी पार्क आणि डेटा सेंटरचे मोठे जाळे उभे राहत आहे. या नवीन धोरणानुसार, आयटी कंपन्यांना महाराष्ट्र राज्यात कुठेही टेक पार्क स्थापन करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. याव्यतिरिक्त त्यांना मुद्रांक शुल्कावर ५० ते १०० टक्क्यांपर्यंत भरीव सबसिडी मिळेल आणि १० ते १५ वर्षांच्या कालावधीसाठी वीज शुल्क माफ केले जाणार आहे. एमआयडीसीकडून आवश्यक पायाभूत सुविधा जसे की रस्ते, वीज, कनेक्टिव्हिटी आणि पाणी तसेच सर्व आवश्यक परवानग्या सुरक्षित करण्यासाठी, डेटा सेंटर पार्क उभारण्यासाठी आणि (ब) राज्य सरकार डेटा सेंटर पार्कच्या पायाभूत सुविधांशी संबंधित ट्रान्समिशन लाइन आणि सबस्टेशन टाकण्यात येणार असल्याने राज्यात आयटी पार्कचा ओढा वाढला आहे.

आयटी पार्कसाठी नवी मुंबईला सर्वाधिक पसंती 

नवी मुंबईत यातील बहुतेक सुविधा आधीपासूनच असल्याने आयटी पार्क, डेटा सेंटरसाठी पोषक वातावरण आहे. ठाणे-बेलापूर रोड, सायन-पनवेल महामार्गासह ठाणे-वाशी रेल्वे मार्ग, मुंबई ते पनवेल-बेलापूर-वाशी रेल्वे मार्गामुळे कनेक्टिव्हिटीसाठी नवी मुंबई हे सर्वांत चांगले ठिकाण आहे. शिवाय मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबविली, पनवेल, उल्हासनगर-अंबरनाथ-बदलापूर ही शहरे नवी मुंबईपासून १० ते ३० किमीच्या परिघात आहेत. मुंबई विमानतळ, जेएनपीए, मुंबई पोर्ट ट्रस्ट ही बंदरेे प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी उपयुक्त आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई