शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

घणसोलीत ९०२४ कोटींचे नवे आयटी पार्क, प्रदूषण नियंत्रण मंडळाचा हिरवा कंदील

By नारायण जाधव | Updated: March 12, 2024 19:00 IST

कंपनी २५०१ काेटी १४ लाखांची गुंतवणूक करणार आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात डेटा सेंटर आणि आयटी पार्कची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, रबाले एमआयडीसीत सावली, घणसोली येथे ९०२३ कोटी ८८ लाख रुपयांची गुंतवणूक असलेले नवे आयटी पार्क उभे राहत आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपल्या २१ व्या संमती समितीच्या बैठकीत या आयटी पार्कला हिरवा कंदील दिला आहे.

एमआयडीसीने त्यासाठी दिलेल्या भूखंडावर सपोर्ट प्रापर्टी प्रा. लिमिटेड ही कंपनी पहिल्या टप्प्यात २,५१,९३४.३० चौ. मीटर क्षेत्राच्या विस्तीर्ण भूखंडावर १, ११, ३४९.०२ चौरस मीटरचे बांधकाम करणार आहे. यासाठी कंपनी २५०१ काेटी १४ लाखांची गुंतवणूक करणार आहे.

डिसेंबर २०२३ मध्ये मिळाली पर्यावरण मंजुरी

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने तर एकूण २,५१, ९३४.३० चौरस क्षेत्रावर हे ५,३७, २३३.९५ चौरस मीटर इतके विस्तीर्ण बांधकामास ११ डिसेंबर २०२३ रोजीच दाखला दिला आहे. त्यानंतर आता राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपल्या २१ व्या बैठकीत संमती दिली आहे.याठिकाणी कंपनी एकूण ९०२३ कोटी ८८ लाख इतकी गुंतवणूक करणार आहे. या आयटी पार्कला पहिल्या टप्प्यात दररोज ३० लाख लीटर पाणी लागणार आहे. तर दररोज २९ लाख लीटर सांडपाणी निर्माण होणार असून, त्यावर प्रक्रियेसाठी १० सीएमडी क्षमतेचे एसटीपी बांधण्यात येणार आहे.

राज्याच्या आयटी पॉलिसीमुळे मिळतेय चालना

महाराष्ट्र शासनाच्या आपल्या २०२३ च्या आयटी पॉलिसीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योग राज्यात यावेत यासाठी भरपूर सवलती दिल्या आहेत. त्यामुळे राज्यात पुणे, नवी मुंबईसारख्या शहरात आयटी पार्क आणि डेटा सेंटरचे मोठे जाळे उभे राहत आहे. या नवीन धोरणानुसार, आयटी कंपन्यांना महाराष्ट्र राज्यात कुठेही टेक पार्क स्थापन करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. याव्यतिरिक्त त्यांना मुद्रांक शुल्कावर ५० ते १०० टक्क्यांपर्यंत भरीव सबसिडी मिळेल आणि १० ते १५ वर्षांच्या कालावधीसाठी वीज शुल्क माफ केले जाणार आहे. एमआयडीसीकडून आवश्यक पायाभूत सुविधा जसे की रस्ते, वीज, कनेक्टिव्हिटी आणि पाणी तसेच सर्व आवश्यक परवानग्या सुरक्षित करण्यासाठी, डेटा सेंटर पार्क उभारण्यासाठी आणि (ब) राज्य सरकार डेटा सेंटर पार्कच्या पायाभूत सुविधांशी संबंधित ट्रान्समिशन लाइन आणि सबस्टेशन टाकण्यात येणार असल्याने राज्यात आयटी पार्कचा ओढा वाढला आहे.

आयटी पार्कसाठी नवी मुंबईला सर्वाधिक पसंती 

नवी मुंबईत यातील बहुतेक सुविधा आधीपासूनच असल्याने आयटी पार्क, डेटा सेंटरसाठी पोषक वातावरण आहे. ठाणे-बेलापूर रोड, सायन-पनवेल महामार्गासह ठाणे-वाशी रेल्वे मार्ग, मुंबई ते पनवेल-बेलापूर-वाशी रेल्वे मार्गामुळे कनेक्टिव्हिटीसाठी नवी मुंबई हे सर्वांत चांगले ठिकाण आहे. शिवाय मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबविली, पनवेल, उल्हासनगर-अंबरनाथ-बदलापूर ही शहरे नवी मुंबईपासून १० ते ३० किमीच्या परिघात आहेत. मुंबई विमानतळ, जेएनपीए, मुंबई पोर्ट ट्रस्ट ही बंदरेे प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी उपयुक्त आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई