शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

घणसोलीत ९०२४ कोटींचे नवे आयटी पार्क, प्रदूषण नियंत्रण मंडळाचा हिरवा कंदील

By नारायण जाधव | Updated: March 12, 2024 19:00 IST

कंपनी २५०१ काेटी १४ लाखांची गुंतवणूक करणार आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात डेटा सेंटर आणि आयटी पार्कची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, रबाले एमआयडीसीत सावली, घणसोली येथे ९०२३ कोटी ८८ लाख रुपयांची गुंतवणूक असलेले नवे आयटी पार्क उभे राहत आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपल्या २१ व्या संमती समितीच्या बैठकीत या आयटी पार्कला हिरवा कंदील दिला आहे.

एमआयडीसीने त्यासाठी दिलेल्या भूखंडावर सपोर्ट प्रापर्टी प्रा. लिमिटेड ही कंपनी पहिल्या टप्प्यात २,५१,९३४.३० चौ. मीटर क्षेत्राच्या विस्तीर्ण भूखंडावर १, ११, ३४९.०२ चौरस मीटरचे बांधकाम करणार आहे. यासाठी कंपनी २५०१ काेटी १४ लाखांची गुंतवणूक करणार आहे.

डिसेंबर २०२३ मध्ये मिळाली पर्यावरण मंजुरी

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने तर एकूण २,५१, ९३४.३० चौरस क्षेत्रावर हे ५,३७, २३३.९५ चौरस मीटर इतके विस्तीर्ण बांधकामास ११ डिसेंबर २०२३ रोजीच दाखला दिला आहे. त्यानंतर आता राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपल्या २१ व्या बैठकीत संमती दिली आहे.याठिकाणी कंपनी एकूण ९०२३ कोटी ८८ लाख इतकी गुंतवणूक करणार आहे. या आयटी पार्कला पहिल्या टप्प्यात दररोज ३० लाख लीटर पाणी लागणार आहे. तर दररोज २९ लाख लीटर सांडपाणी निर्माण होणार असून, त्यावर प्रक्रियेसाठी १० सीएमडी क्षमतेचे एसटीपी बांधण्यात येणार आहे.

राज्याच्या आयटी पॉलिसीमुळे मिळतेय चालना

महाराष्ट्र शासनाच्या आपल्या २०२३ च्या आयटी पॉलिसीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योग राज्यात यावेत यासाठी भरपूर सवलती दिल्या आहेत. त्यामुळे राज्यात पुणे, नवी मुंबईसारख्या शहरात आयटी पार्क आणि डेटा सेंटरचे मोठे जाळे उभे राहत आहे. या नवीन धोरणानुसार, आयटी कंपन्यांना महाराष्ट्र राज्यात कुठेही टेक पार्क स्थापन करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. याव्यतिरिक्त त्यांना मुद्रांक शुल्कावर ५० ते १०० टक्क्यांपर्यंत भरीव सबसिडी मिळेल आणि १० ते १५ वर्षांच्या कालावधीसाठी वीज शुल्क माफ केले जाणार आहे. एमआयडीसीकडून आवश्यक पायाभूत सुविधा जसे की रस्ते, वीज, कनेक्टिव्हिटी आणि पाणी तसेच सर्व आवश्यक परवानग्या सुरक्षित करण्यासाठी, डेटा सेंटर पार्क उभारण्यासाठी आणि (ब) राज्य सरकार डेटा सेंटर पार्कच्या पायाभूत सुविधांशी संबंधित ट्रान्समिशन लाइन आणि सबस्टेशन टाकण्यात येणार असल्याने राज्यात आयटी पार्कचा ओढा वाढला आहे.

आयटी पार्कसाठी नवी मुंबईला सर्वाधिक पसंती 

नवी मुंबईत यातील बहुतेक सुविधा आधीपासूनच असल्याने आयटी पार्क, डेटा सेंटरसाठी पोषक वातावरण आहे. ठाणे-बेलापूर रोड, सायन-पनवेल महामार्गासह ठाणे-वाशी रेल्वे मार्ग, मुंबई ते पनवेल-बेलापूर-वाशी रेल्वे मार्गामुळे कनेक्टिव्हिटीसाठी नवी मुंबई हे सर्वांत चांगले ठिकाण आहे. शिवाय मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबविली, पनवेल, उल्हासनगर-अंबरनाथ-बदलापूर ही शहरे नवी मुंबईपासून १० ते ३० किमीच्या परिघात आहेत. मुंबई विमानतळ, जेएनपीए, मुंबई पोर्ट ट्रस्ट ही बंदरेे प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी उपयुक्त आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई