शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

नवी मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा, मोरबेत ५ महिन्यांचा पाणीसाठा; महापालिकेचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 01:54 IST

मोरबेत पाच महिने पुरेल इतका पाणीसाठा; पाणीकपात नाही, पाण्याचा जपून वापर करण्याचे महापालिकेचे आवाहन

नवी मुंबई : जागतिक जल दिनाच्या मुहूर्तावर नवी मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. कारण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या मोरबे धरणात पुढील पाच महिने म्हणजेच ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरवासीयांना सध्या तरी कोणत्याही प्रकारच्या पाणीकपातीला सामोरे जावे लागणार नाही. असे असले तरी नवी मुंबईकरांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

नवी मुंबई महापालिका स्वतःच्या मालकीच्या मोरबे धरणातून शहरवासीयांना चोवीस तास पाणीपुरवठा करते. असे असले तरी मान्सूनचा अंदाज बांधता येत नसल्याने दरवर्षी मार्च महिन्यात पाण्याचे नियोजन केले जाते. गरज पडल्यास पाणीकपातीचा पर्याय निवडला जातो. परंतु या वर्षी तशी गरज पडणार नाही. कारण मोरबे धरणात ६० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. उपलब्ध पाणी किमान पाच महिने पुरेल, असा विश्वास महापालिकेच्या संबंधित विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. असे असले तरी देशाच्या अनेक भागांत आजही पाण्याचे दुर्भिक्ष आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईकरांना पाण्याचा अपव्यय टाळून आवश्यक तेव्हढेच पाणी वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

मोरबेची पाणीसाठवण क्षमता ८८ मीटर इतकी आहे. म्हणजेच मोरबेत एकूण १९०.८९ दशलक्ष घनमीटर पाणी साठविण्याची क्षमता आहे. सध्या मोरबे धरणात ११४.९० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस न पडल्याने धरण पूर्णत: भरले नाही. त्यामुळे या वर्षी पाणीकपातीची शक्यता वर्तविली जात होती. मात्र धरणात सध्या पुरेसा पाणीसाठा असल्याने तूर्तास पाणीकपातीची कोणतीही शक्यता नसल्याचे महापालिकेच्या संबंधित विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

टॅग्स :WaterपाणीNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका