शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नवी मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा, मोरबेत ५ महिन्यांचा पाणीसाठा; महापालिकेचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 01:54 IST

मोरबेत पाच महिने पुरेल इतका पाणीसाठा; पाणीकपात नाही, पाण्याचा जपून वापर करण्याचे महापालिकेचे आवाहन

नवी मुंबई : जागतिक जल दिनाच्या मुहूर्तावर नवी मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. कारण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या मोरबे धरणात पुढील पाच महिने म्हणजेच ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरवासीयांना सध्या तरी कोणत्याही प्रकारच्या पाणीकपातीला सामोरे जावे लागणार नाही. असे असले तरी नवी मुंबईकरांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

नवी मुंबई महापालिका स्वतःच्या मालकीच्या मोरबे धरणातून शहरवासीयांना चोवीस तास पाणीपुरवठा करते. असे असले तरी मान्सूनचा अंदाज बांधता येत नसल्याने दरवर्षी मार्च महिन्यात पाण्याचे नियोजन केले जाते. गरज पडल्यास पाणीकपातीचा पर्याय निवडला जातो. परंतु या वर्षी तशी गरज पडणार नाही. कारण मोरबे धरणात ६० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. उपलब्ध पाणी किमान पाच महिने पुरेल, असा विश्वास महापालिकेच्या संबंधित विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. असे असले तरी देशाच्या अनेक भागांत आजही पाण्याचे दुर्भिक्ष आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईकरांना पाण्याचा अपव्यय टाळून आवश्यक तेव्हढेच पाणी वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

मोरबेची पाणीसाठवण क्षमता ८८ मीटर इतकी आहे. म्हणजेच मोरबेत एकूण १९०.८९ दशलक्ष घनमीटर पाणी साठविण्याची क्षमता आहे. सध्या मोरबे धरणात ११४.९० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस न पडल्याने धरण पूर्णत: भरले नाही. त्यामुळे या वर्षी पाणीकपातीची शक्यता वर्तविली जात होती. मात्र धरणात सध्या पुरेसा पाणीसाठा असल्याने तूर्तास पाणीकपातीची कोणतीही शक्यता नसल्याचे महापालिकेच्या संबंधित विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

टॅग्स :WaterपाणीNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका