शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई, पनवेलमधील ‘कथित रेड्डींचे’ काय?

By नारायण जाधव | Updated: June 9, 2025 11:45 IST

Navi Mumbai:महामुंबईतील सर्वच महानगरांत सध्या बांधकाम उद्योगाने मोठी झेप घेतली आहे. यामुळे राजधानी मुंबईपासून ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, पनवेल ते वसई-विरार महापालिकेच्या नगररचना विभागात येण्यासाठी अधिकाऱ्यांत असलेल्या स्पर्धेच्या सुरस कथा ऐकायला मिळत आहेत.

- नारायण जाधव(उपवृत्तसंपादक)

महामुंबईतील सर्वच महानगरांत सध्या बांधकाम उद्योगाने मोठी झेप घेतली आहे. यामुळे राजधानी मुंबईपासून ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, पनवेल ते वसई-विरार महापालिकेच्या नगररचना विभागात येण्यासाठी अधिकाऱ्यांत असलेल्या स्पर्धेच्या सुरस कथा ऐकायला मिळत आहेत. ते यासाठीचा ‘माल’मसाला कोठून आणत असावेत, असा प्रश्न सामान्यांना पडतो. परंतु, गेल्याच पंधरवड्यात वसई-विरार शहर महापालिकेचे नगररचना उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्या घरातून ईडीने रोकड, हिरे, सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे ३० कोटींचा ऐवज जप्त केल्यानंतर त्याचे उत्तर मिळाले आहे.

वसई-विरारच नव्हे तर मुंबई, ठाण्यासह अगदी नवी मुंबई, पनवेलपर्यंत रेड्डींसारखे अनेक महाभाग आढळतील. यामुळेच सामाजिक सुविधांसाठीच्या भूखंडांवर बिल्डरांचे इमले उभे राहत आहेत. पनवेलसह नवी मुंबईसारख्या सुनियोजित शहरांत तर खारफुटीसह पाणथळींवरही टॉवर उभे आहेत.

नवी मुंबईत तर चार ते पाच हजार अनधिकृत बांधकामांबद्दल दस्तुरखुद्द मुंबई उच्च न्यायालयानेच महापालिकेचे कान टोचले आहेत. यामुळे येथील नगररचना विभागातील कथित रेड्डींचे काय, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची गरज आहे. असा प्रकार मुंबईतही असून, चटईक्षेत्राची चोरी करून अनेक टॉवर उभे आहेत. ठाण्यात तर वन जमिनींवर एका मोठ्या विकासकाने आपली टोलेजंग वसाहत बांधली आहे. याचा सुगावा ज्यांना लागला, त्या कथित नेत्यांच्या चौकडीला त्याने बंगल्याचा प्रसाद वाटल्यावर त्यांनी त्याचा ‘नाद’ कसा सोडला, याची खमंग चर्चा आहे. कल्याण-डोंबिवलीत सुनील जोशी प्रकरणाने तेथील कारभार चव्हाट्यावर आणला होता.

सध्या नवी मुंबई, पनवेलमध्ये पुनर्विकासाचे वारे वाहत आहेत. त्याकरिता हाऊसिंग मॅन्युअल, महसूल, नगररचना नियमांसह एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीतील नियम क्र. ३.८.४ मधील तरतुदींचा गैरफायदा घेऊन काही विकासकांनी गरिबांची हजार घरे हडपून शासनाच्या आदेशांना वाशी खाडीत बुडविले आहे. रस्त्यानुसार चटईक्षेत्र, उंचीचे बंधन, रहिवाशांशी केलेला करारनामा आणि प्रत्यक्षात मिळणारे घर, आधीच गहाण असलेल्या सदनिकांना पुनर्विकासात गेल्यावर बँकांनी पुन्हा कर्ज देणे, असे प्रकार शहरात सुरू आहेत. पनवेल महापालिकेतील नगररचना खात्यात, तर ‘केशवा’-माधवांकडून ‘मागे उभा गणेश, पुढे आहे मंगेश’ ही ओवी गायिली जात आहे. यामुळे तेथील कारभारात ‘राम’ उरलेला नाही.

नवी मुंबईत तर मंत्रालयातील वरिष्ठांच्या आशीर्वादाने अनेकांनी दुकाने थाटली आहेत. यात सिडको आणि महापालिकेतील स्वेच्छानिवृत्त वा निवृत्त झालेले अनेक अधिकारी आघाडीवर आहेत. काहींनी बेलापुरात डोळे दीपतील अशी आलिशान कार्यालये थाटून टक्केवारी आणि ठेकेदारीचे आवडते ‘गुरव’वाद्य वाजवून महापालिकेसह सिडकोत ‘मनोहारी’ दबदबा निर्माण केला आहे. सल्लागाररूपी दलाल बनलेले हे अधिकारी सांगतील तीच नगररचना खात्यात पूर्वदिशा असते. यातूनच वनमंत्री गणेश नाईक यांनी, तर थेट नगरचनाकार सोमनाथ केकाण यांचे नाव घेऊन महापालिकेतील अन्य अधिकाऱ्यांचे फार्महाऊस, तेथील प्रकारांवर भाष्य करून नवी मुंबई, पनवेलमधील कथित रेड्डींचे काय, असा प्रश्न विचारला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेल