शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

नवी मुंबईमध्ये कोरोनामुक्तीचे प्रमाण घसरल्याने धोका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 01:29 IST

एक महिन्यात दहा टक्के घसरण : बरे होण्याचे प्रमाण ९५ वरून ८५ टक्यांवर 

- नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोरोनाची दुसरी लाट शहरवासीयांसाठी धोकादायक ठरली आहे. नवी मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. १ मार्चला कोरोनामुक्तीचे प्रमाण ९५ टक्के होेते. त्यामध्ये घसरण होऊन ते ८५ टक्यांवर आले आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत असून अशीच स्थिती राहिली तर रुग्णालयात जागा मिळणार नाही व प्रतिदिन मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने फेब्रुवारीअखेरपर्यंत कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात बऱ्यापैकी यश मिळविले होते. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांपर्यंत पोहोचले होते. मृत्यूदर दीड टक्क्यावर आला होता व फक्त साडेतीन टक्के रुग्ण उपचार घेत होते. शहरातील तीन नागरी आरोग्य केंद्राचा परिसर कोरोनामुक्त झाला होता; परंतु मार्चच्या सुरुवातीपासून झपाट्याने रुग्ण संख्या वाढू लागली व महानगरपालिकेच्या उपाययोजना अपुऱ्या पडू लागल्या. सद्य:स्थितीमध्ये रुग्णालयांमधील बेड अपुरे पडू लागले आहेत. व्हेंटिलेटर्स, आयसीयूमध्ये जागा मिळणे अशक्य होऊ लागले आहे. वेळेत उपचार मिळत नसल्याने मृत्यूचा आकडा वाढत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घसरू लागले आहे.

सद्य:स्थितीमध्ये कोरोनामुक्तीचे प्रमाण दहा टक्क्यांनी घसरून ८५ टक्क्यांवर आले आहे. वाशी गाव नागरी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात हे प्रमाण ८० टक्के झाले आहे. करावे, सीबीडी, जुहूगाव, महापे, सिवूड, पावणे, नोसील नाका, इलठाणपाडा, कातकरीपाडा, चिंचपाडा, इंदिरानगर परिसरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. कोरानामुक्तीचे प्रमाण वाढले नाही तर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. नवीन रुग्णांना उपचारासाठी बेड उपलब्ध होणार नाहीत व त्यामुळे मृत्यू होणारांची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात होती. फेब्रुवारीमध्ये सरासरी १ ते २ जणांचा प्रतिदिन मृत्यू होत होता. सद्य:स्थितीमध्ये सरासरी ५ जणांचा मृत्यू होत असून शुक्रवारी एकाच दिवशी ९ जणांचा मृत्यू झाला आहे. 

दिघासह घणसोलीमध्ये कोरोनामुक्तीचे प्रमाण ८८%शहरातील दिघा व घणसोली नागरी आरोग्य केंद्राच्या परिसरात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. दोन्ही ठिकाणी ८८ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सानपाडा व नेरूळ झाेन एकमध्ये ८७ टक्के, खैरणे, रबाळे, ऐरोली, शिरवणे, तुर्भे परिसरात ८६ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस