शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

Navi Mumbai: मुंबई महानगर विभागात १०१३ हेक्टर खारफुटींचे संरक्षण अजूनही प्रलंबित, उच्च न्यायालयाच्या ५ वर्षांपूर्वीच्या आदेशाचे उल्लंघन

By नारायण जाधव | Updated: June 23, 2023 16:36 IST

Navi Mumbai: मुंबई उच्च न्यायालया्ने अंदाजे पाच वर्षांपूर्वी आदेश देऊन देखील, अजूनही सर्व खारफुटी वन विभागाला त्यांचे जतन करण्यासाठी सुपूर्द करण्यात आलेल्या नाहीत.

- नारायण जाधव नवी मुंबई - मुंबई उच्च न्यायालया्ने अंदाजे पाच वर्षांपूर्वी आदेश देऊन देखील, अजूनही सर्व खारफुटी वन विभागाला त्यांचे जतन करण्यासाठी सुपूर्द करण्यात आलेल्या नाहीत. शासनाच्या विविध प्राधिकरणांच्या अखत्यारीमध्ये अजून देखील १,०१३ हेक्टर खारफुटी आहेत, ज्यांचा विस्तार शंभरहून जास्त आझाद मैदानांएवढा आहे.

यात सिडकोच्या ताब्यामधील नवी मुंबईतील ६२८.६८ हेक्टर्सएवढे खारफुटी क्षेत्र आहे, एमएमआरडीएच्या नियंत्रणात १९९ हेक्टर्स, तर मुंबई शहर जिल्ह्याच्या अंतर्गत १८४.१४ हेक्टर क्षेत्र आहे. कोकणचे तत्कालिन प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सर्व शासकीय एजन्सींना वन विभागाला खारफुटी सुपूर्द करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आणि एका महिन्याच्या आत अनुसरण केल्याचा अहवाल प्रस्तुत करण्याचे निर्देश मार्च २०२३ मध्ये दिले होते.

यावर  प्रतिक्रिया देताना पर्यावरण वाद्यांनी मुंबई उच्च न्यायालयाने २०१८ मध्ये आदेश देऊनदेखील खारफुटी समितीच्या या कूर्मगती कारभारीवर जोरदार टीका केली आहे. राज्य शासन आणि खारफुटी समितीने सर्व शासकीय एजन्सींना आणि जिल्हाधिका-यांना अनेक वेळा वन विभागाला खारफुटी सुपूर्द करण्याची खात्री करण्याचे निर्देश देऊन देखील, आजमितीपर्यंत कोणतीही प्रक्रिया केली गेलेली नाही, असे नॅटकनेक्ट फाउंडेशनने सांगितले.पर्यावरणवाद्यांकडून अनेकदा तक्रार होऊन देखील खारफुटींच्या रक्षणासाठी संबंधित अधिका-यांकडून  कोणतीही कारवाई केली गेली नाही.

खारफुटींच्या स्थानांतरणाला होत असलेल्या विलंबामुळे खारफुटींचा नाश होत आहे, असे नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी एन कुमार म्हणाले.श्री एकवीरा आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार पवार म्हणाले की, उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीच्या बैठकांच्या मिनिट्सना पाहिल्यास खारफुटींच्या विनाशाचा आकडा आपल्याला आढळून येईल. पाच वर्षांपूर्वी दाखल केलेल्या तक्रारींवरदेखील अजूनही तोडगा निघालेला नाही. प्रत्येक बैठकीत तक्रारींना विचारात घेतले जाते आणि संबंधित जिल्हाधिका-यांनी किंवा इतर अधिका-यांनी केलेल्या कारवाईचा अहवाल प्रलंबित असल्याचा शेरा दिला जातो.

तक्रारींवर कारवाई करण्यात आणि खारफुटी वन खात्याला सुपूर्द करण्यात होणारा अवाजवी विलंब न्यायालयाचा अपमान आहे, कारण यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे स्पष्टपणे उल्लंघन होत आहे, अशी टीका कुमार यांनी केली. नुकतीच १६ मे रोजी बैठक घेण्यात आली होती, जिचे मिनिट्स खारफुटी समितीच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आले आहेत.

समितीने खारघर येथील खारफुटींच्या –हासाच्या संदर्भात कुमार, पवार आणि प्रदीप पाटोळे यांनी नुकत्याच दाखल केलेल्या तक्रारींची दखल घेतली असून, रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिका-यांना चौकशी करण्याचे आणि पॅनलच्या पुढील बैठकीच्या आत अहवाल प्रस्तुत करण्याचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMumbaiमुंबई