शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

नवी मुंबईत  मान्सूनपूर्व कामांचा धडाका सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 4:18 AM

दोन दिवसांपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

नवी मुंबई - दोन दिवसांपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. असे असतानाही महापालिकेकडून सुरू करण्यात आलेली मान्सूनपूर्व कामे अद्याप सुरूच असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत असल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी पावसाळ्याच्या अगोदर शहरातील नालेसफाई आणि रस्त्यांच्या डागडुजीची कामे हाती घेतली जातात. मे महिन्याच्या अखेरीस ही कामे पूर्ण होणे अपेक्षित असते. परंतु यावर्षी ही कामे उशिरा सुरू करण्यात आली. त्यामुळे अनेक भागात नालेसफाईच्या कामाचा बोजवारा उडाला आहे. विशेषत: ऐरोली व दिघा परिसरात पहिल्याच पावसात नाले तुडुंब भरल्याचे पाहावयास मिळाले. विशेष म्हणजे यावर्षी पावसाने लवकरच हजेरी लावली. त्यामुळे सुरू असलेल्या कामांना खीळ बसली.दोन दिवस मुसळधार पाऊस पडल्याने झालेल्या कामांचे पितळही उघडे पडले. अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या. वृक्ष छाटणी न झाल्याने शहराच्या विविध भागात वृक्ष पडल्याच्या दुर्घटना घडल्या.पावसाच्या पहिल्याच सरीत रस्त्यांवरील डागडुजी तकलादू ठरली. त्यामुळे ठिकठिकाणचे रस्ते उखडल्याचे दृश्य पाहावयास मिळत आहे. रविवारी पावसाने काहीशी उसंत घेतल्याने महापालिकेने पुन्हा या कामांना गती दिली आहे. रस्ते व पदपथांच्या दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे.शहरात पाणी तुंबण्याची शक्यतानालेसफाईचा पुरता बोजवारा उडाला आहे. अनेक ठिकाणी वसाहतीअंतर्गत छोट्या नाल्यांतील गाळ उपसण्याचा सोपस्कार पूर्ण केल्याचे दिसून येते. तसेच मोठ्या नाल्यांतील गाळ यावर्षी उपसण्यात आलेला नाही. त्यामुळे पावसाळ्यात नाले तुंबून त्यातील पाणी वसाहतीत घुसण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईnewsबातम्या