शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

गुरुनाथ चिंचकरांच्या आत्महत्येनंतर दोन अधिकाऱ्यांना अटक; नवी मुंबई पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 18:07 IST

व्यावसायिक गुरुनाथ चिंचकर यांच्या आत्महत्येनंतर नवी मुंबई पोलिसांनी दोन अधिकाऱ्यांना अटक केली.

Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक गुरुनाथ चिंचकर यांच्या आत्महत्येनंतर नवी मुंबईपोलिसांनी सोमवारी दोन अधिकाऱ्यांना ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. याच अधिकाऱ्यांनी ड्रग्ज प्रकरणात गुरुनाथ चिंचकर यांचा जबाब नोंदवला होता. त्यानंतर गुरुनाथ चिंचकर यांनी राहत्या घरात आत्महत्या केली होती. चिंचकर यांनी एका सुसाईड नोटमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि नवी मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांकडून छळ होत असल्याचा आरोप केला होता. या छळाला कंटाळून गुरुनाथ चिंचकर यांनी आत्महत्या केली.

एनसीबीने चिंचकर यांचा लंडनमध्ये राहणारा मुलगा नवीन हा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा सूत्रधार असल्याचा आरोप केला होता. त्यानुसार एनसीबीने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दुसरीकडे, नवी मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानेही चिचकर यांचा धाकटा मुलगा धीरज याच्यावरही गुन्हा दाखल केला होता. नवी मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात यापूर्वी दोन जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीदरम्यान दोन्ही अधिकाऱ्यांची नावे समोर आली.

शुक्रवारी सकाळी ६.४५ च्या सुमारास, बेलापूर येथील किल्ले गावठाण येथील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहणारे चिंचकर त्यांच्या तळमजल्यावरील कार्यालयात गेले होते. काही तासांनंतर त्यांच्या पत्नीला चिंचकर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. कार्यालयात चिचकर यांनी स्वतःच्या बंदूकीतून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. तपासादरम्यान, चिंचकर यांनी त्यांच्या आईला उद्देशून एक सुसाईड नोट लिहून ठेवल्याचे समोर आले. सुसाईड नोटमध्ये चिंचकर यांनी, मी एनसीबी आणि नवी मुंबई पोलिसांकडून आलेल्या समन्सला कंटाळलो आहे, असं म्हटलं होतं.

गुरुनाथ चिंचकर यांनी एनसीबीला उद्देशून तीन पानांचे पत्रही लिहीले होते. यामध्ये त्यांनी बांधकाम व्यावसायिक होण्यासाठी कठोर परिश्रम केल्याचे म्हटलं होते. "मला काही वर्षांपूर्वीच मोठ्या मुलाच्या ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागाची माहिती मिळाली होती. धाकट्या मुलालाही तो निर्दोष असतानाही ड्रग्ज प्रकरणात गोवण्यात आले होते. याप्रकरणी काही लोकांनी एजंट म्हणून काम केले आणि माझ्या मुलांविरुद्धचे सर्व खटले निकाली काढण्यासाठी १० कोटी रुपयांची मागणी माझ्याकडे केली होती. जर त्यांना पैसे दिले असते तर त्यांनी प्रकरण निकाली काढली असते," असेही चिंचकर यांनी पत्रात म्हटले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारीNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोPoliceपोलिस