शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई महापालिकेचा ऐतिहासिक निर्णय, स्मशानभूमीत पर्यावरणपूरक  ‘ब्रिकेट’ वापरणार

By नारायण जाधव | Updated: February 22, 2024 12:36 IST

महापालिकेच्या या निर्णयाचे सर्व थरातून जोरदार  स्वागत होत आहे. नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे बी एन कुमार यांनी या संकल्पनेचे स्वागत करून पंतप्रधानांना ही कल्पना राष्ट्रीय स्तरावर नेण्याची विनंती केली आहे

नवी मुंबई : शहर स्वच्छता, पर्यावरण संवर्धनात अग्रेसर असलेल्या नवी मुंबई महापालिकेने अंत्यसंस्कार पर्यावरणपूरक व्हावेत यासाठी येणारी प्रेते जाळण्यासाठी ब्रिकेटचा अवलंब करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. झाडे आणि उसाच्या चिपाडापासून बनवलेल्या ब्रिकेटमुळे नवी मुंबईतील महागडे सरपण वाचवण्यास मदत होईल, असे अतिरिक्त महापालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी सांगितले. 

महापालिकेच्या या निर्णयाचे सर्व थरातून जोरदार  स्वागत होत आहे. नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे बी एन कुमार यांनी या संकल्पनेचे स्वागत करून पंतप्रधानांना ही कल्पना राष्ट्रीय स्तरावर नेण्याची विनंती केली आहे. हे राष्ट्रीय राजधानीत मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषणास कारणीभूत असलेल्या पेंढ्या जाळण्याच्या समस्येचे निराकरण करू शकते, असे  कुमार म्हणाले.  “केंद्राने उत्तरेकडील राज्यांना हा प्रकल्प तपासण्यास सांगावे कारण शेतातील कचऱ्याचा वापर करून ब्रिकेट बनवता येतात,” असे कुमार यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, मनपाने तुर्भे घनकचरा व्यवस्थापन सुविधेवर किंवा बेलापूर येथे आणि फक्त दोन कोटी रुपये खर्चून स्वतःचे ब्रिकेट प्लांट उभारण्याच्या विचारात आहे. मनपाने तुर्भे स्मशानभूमीत  ब्रिकेटसह एक पथदर्शी प्रकल्प सुरू करणार आहे. यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व स्मशानभूमीत पर्यावरणपूरक साहित्याचा वापर केला जाईल.

राज्यातील ऊस क्षेत्रामध्ये मुबलक प्रमाणात ते उपलब्ध आहे आणि शहरातील वृक्षतोड आणि छाटणीमध्ये भरपूर कचरा निर्माण होतो. यामुळे एकाच झटक्यात दोन समस्या - स्मशानभूमीत सरपण निर्माण करणारा धूर आणि कचरा विल्हेवाट - सुटतील असे कुमार म्हणाले 

काही कुटुंबांना इलेक्ट्रिक किंवा सीएनजीवर चालणारी स्मशानभूमी वापरण्यास काही कारणांमुळे संकोच करतात, त्यांचे ब्रिकेट निराकरण करतील, असा महापालिकेस विश्वास आहे.