शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
5
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
6
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
7
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
8
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
9
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
10
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
11
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
12
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
13
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
15
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
16
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
17
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
18
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
19
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
20
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!

नवी मुंबई महापालिकेचा ऐतिहासिक निर्णय, स्मशानभूमीत पर्यावरणपूरक  ‘ब्रिकेट’ वापरणार

By नारायण जाधव | Updated: February 22, 2024 12:36 IST

महापालिकेच्या या निर्णयाचे सर्व थरातून जोरदार  स्वागत होत आहे. नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे बी एन कुमार यांनी या संकल्पनेचे स्वागत करून पंतप्रधानांना ही कल्पना राष्ट्रीय स्तरावर नेण्याची विनंती केली आहे

नवी मुंबई : शहर स्वच्छता, पर्यावरण संवर्धनात अग्रेसर असलेल्या नवी मुंबई महापालिकेने अंत्यसंस्कार पर्यावरणपूरक व्हावेत यासाठी येणारी प्रेते जाळण्यासाठी ब्रिकेटचा अवलंब करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. झाडे आणि उसाच्या चिपाडापासून बनवलेल्या ब्रिकेटमुळे नवी मुंबईतील महागडे सरपण वाचवण्यास मदत होईल, असे अतिरिक्त महापालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी सांगितले. 

महापालिकेच्या या निर्णयाचे सर्व थरातून जोरदार  स्वागत होत आहे. नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे बी एन कुमार यांनी या संकल्पनेचे स्वागत करून पंतप्रधानांना ही कल्पना राष्ट्रीय स्तरावर नेण्याची विनंती केली आहे. हे राष्ट्रीय राजधानीत मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषणास कारणीभूत असलेल्या पेंढ्या जाळण्याच्या समस्येचे निराकरण करू शकते, असे  कुमार म्हणाले.  “केंद्राने उत्तरेकडील राज्यांना हा प्रकल्प तपासण्यास सांगावे कारण शेतातील कचऱ्याचा वापर करून ब्रिकेट बनवता येतात,” असे कुमार यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, मनपाने तुर्भे घनकचरा व्यवस्थापन सुविधेवर किंवा बेलापूर येथे आणि फक्त दोन कोटी रुपये खर्चून स्वतःचे ब्रिकेट प्लांट उभारण्याच्या विचारात आहे. मनपाने तुर्भे स्मशानभूमीत  ब्रिकेटसह एक पथदर्शी प्रकल्प सुरू करणार आहे. यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व स्मशानभूमीत पर्यावरणपूरक साहित्याचा वापर केला जाईल.

राज्यातील ऊस क्षेत्रामध्ये मुबलक प्रमाणात ते उपलब्ध आहे आणि शहरातील वृक्षतोड आणि छाटणीमध्ये भरपूर कचरा निर्माण होतो. यामुळे एकाच झटक्यात दोन समस्या - स्मशानभूमीत सरपण निर्माण करणारा धूर आणि कचरा विल्हेवाट - सुटतील असे कुमार म्हणाले 

काही कुटुंबांना इलेक्ट्रिक किंवा सीएनजीवर चालणारी स्मशानभूमी वापरण्यास काही कारणांमुळे संकोच करतात, त्यांचे ब्रिकेट निराकरण करतील, असा महापालिकेस विश्वास आहे.